शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चाळीसगाव परिसरात नदी - नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 13:36 IST

बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला.वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देशहरात बाजारपेठेतही शिरले पाणी, पशुधनाचे नुकसान.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शहर व ग्रामीण भागात मंगळवार पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या  दक्षिणेला असणाऱ्या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.

मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले असून जनावरे दगावली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी सकाळी सहा वाजताच महसुल प्रशासनाला नुकसानीसह परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सुचना केल्या आहे. तहसिलदार अमोल मोरे हेही स्थितीचा आढावा घेत आहे.

तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाले आहे. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला असून शिवाजी घाट परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तितूर नदीलाही पूर आल्याने घाट रोडवरील जुन्या पुलावरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गत २४ तासात ५४६ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक १४५ मिमी पाऊस तळेगाव मंडळात त्याखालोखाल चाळीसगाव मंडळात ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

मन्याड धरणातूनही पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदी - नाले दूथडी भरुन वाहू लागल्याने गिरणा नदीही वाहू लागली आहे. सकाळपासून जामदा बंधाऱ्यावरुन १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुपारनंतर पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गिरणा पाटबंधारे विभागाने नदीकाठालगतच्या रहिवाश्यांना सर्तकतेच्या सुचना दिल्या आहे. दरम्यान या पावसामुळे पीकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.चाळीसगावला तुफान पाऊस...डोंगरी व तितूर नदीला पूर...पाणी शिरले मुख्य बाजारपेठेत....पाटणादेवी रोड लगतचा बामोशी बाबा दर्गाह परिसर...जलमय...डोंगरी नदीला  मोठा पूर...सर्तक राहण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन...कोदगाव धरण भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु.. पाटणादेवी येथील नदी नाले तुंडुब भरुन वाहु लागले, राञभर मुसळधार पाऊस..

वाघडू वाकडी गावात नदीचे पाणी शिरले गुरे म्हशी वाहून गेले.

चाळीसगावला तितूर नदीलाही पूर...पुराचे पाणी...डॉ. पुर्णपात्रे हाॕस्पीटल पर्यंत...

रोकडे, ता. चाळीसगाव येथे म्हशी वाहून मेल्या.

मजरे गावातही पाणी शिरले.

वाघडू नदी पुलावरून पाणी चाळीसगाव ते नागद चाळीसगाव जाणारा मार्ग संपर्क तुटला.

गणेशपूर तितूर नदीला सकाळी दोन वाजता पूर चितेगाव धरण १००% भरण्याची शक्यता.

कन्नड घाटातही ठिकठिकाणी भूस्सखलन... वाहतूक ठप्प...

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावfloodपूरRainपाऊस