शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नदीला पूर, गावाला पूल नाही, पुनर्वसन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST

अमळनेर : सात्री गावात ७० ते ८० व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण आहेत. बोरी नदीला पूर आल्याने व गावाला पूल ...

अमळनेर : सात्री गावात ७० ते ८० व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण आहेत. बोरी नदीला पूर आल्याने व गावाला पूल नसल्याने रुग्णांना दवाखान्यात नेता येत नाही. डॉक्टरांना गावात येता येत नाही, पुनर्वसनही होत नाही. आम्ही जगावे की मरावे? अशी संतप्त भावना पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी सात्री गावच्या पुनर्वसन गावठाणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक व जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांसमोर भावना व्यक्त केल्या.

अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक प्रवीण महाजन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रवींद्र भारदे, निम्न तापी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, तहसीलदार मिलिंद वाघ, जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे प्रशासकीय सदस्य महेंद्र बोरसे, ठेकेदार दिनेश शिसोदे यांनी पुनर्वसित सात्री गावठाणला भेट दिली. यावेळी महेंद्र बोरसे यांनी तक्रार केली की, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सात्री गावाला जायला बोरी नदीवर पूल नाही. आताही बोरीला पूर आल्याने जीव धोक्यात घालून खाटेवर नदी पार करावी लागते. २०१३ पासून पुनर्वसन प्रक्रिया रखडली असून, फक्त ६० ते ६५ टक्के काम झाले आहे. अद्याप गृह संपादन झालेले नाही. बाधितांची संख्या निश्चित झालेली नाही. त्यानंतर पुनर्स्थापना करायची असते. मात्र, भूसंपादन अधिकाऱ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे तीन वेळा प्रस्ताव व्यपगत झाले आणि कुटुंब संख्येतील तफावत लक्षात आणून दिल्यानंतर १० जून १४ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीतील उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही, अशीही तक्रार बोरसे यांनी केली.

अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तेथून आल्यावर सायंकाळी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात बैठक घेऊन भूमिअभिलेख अधिकारी अहिरे यांना पण मुदतीत कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

040921\04jal_2_04092021_12.jpg

अधिकाऱ्यांच्या पाहणीच्यावेळी अशासकीय सदस्यांची संतप्त भावना