शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा बंद असताना नदी पात्रांना ओरबडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:02 IST

महसूलच्या पथकावर नजर ठेवून दिला जातो चकमा

जळगाव : वाळू ठेके बंद होऊन उपशावर बंदी असतानाही शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच असून वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे. सोबतच ठिकठिकाणी साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांमधूनही वाळूची चोरी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महसूलचे पथक नदीपात्राकडे जाऊन वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यावर वाळू वाहतूकदारांची नजर असते. त्यामुळे वाळूची वाहने पथकास चकमा देऊन पसार होत असल्याचेही प्रकार सुरू आहे. मुळात खरोखर पथकाकडून कारवाई केली जाते की केवळ सोपस्कार म्हणून पाहणी होत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.वाळू गटांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही वाळू गटातून वाळूचा उपसा करू शकत नाही. असे असले तरी दररोज मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याचे चित्र आहे. गिरणा नदीपात्रात तर वाळू उपशासाठी वाहनांची जत्राच भरल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे या ठिकाणी वाहनांच्या चाकांचे निशाण मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यावरूनच उपशाचा अंदाज येतो.आव्हाणे, खेडी, वडनगरी, निमखेडी, सावखेडा, बांभोरी या भागातून सर्रासपणे वाळू उपसा सुरु आहे. ही वाहतूक रात्रीच्या वेळी तर मोठ्या प्रमाणात होतेच सोबतच आता दिवसाही वाळूची वाहने वाळू भरुन नेत असल्याचे दिसून येते.शुक्रवारीदेखील गिरणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने वाळू भरत होती. त्या ठिकाणी वाळू भरून-भरुन नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे. या खेरीज मोहाडी परिसरातही चार डंपरद्वारे बेसुमार वाळूचा उपसा केली जात असल्याची तक्रार आहे.वाळू येते कोठून?नदी पात्रातून वाळूचा उपसा तर सुरूच आहे, सोबतच निमखेडीत वाळूचा मोठा साठा प्रशासनाला आढळून आला. अशाच प्रकारे आव्हाणे परिसरातही हा साठा असल्याचे समोर आले. जर उपसा बंद आहे तर हा साठा येतो कोठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे वाळू साठा कोणाचा आहे, यासाठीदेखील कोणी पुढे यायला तयार नाही. त्यामुळे महसूलच्या पथकाने निमखेडी येथील २०० ब्रास वाळू जप्त केली. त्यानंतर तर एका जणाने साठवून ठेवलेली वाळू दुसऱ्यानेच पळवून नेल्याचाही प्रकार घटला. त्यामुळे वाळूचा प्रश्न किती तापत आहे, हे सर्वांना समजत असले तरीमहसूलविभागाकडून वाळूचीवाहतूककारोखलीजातनाही,याबद्दलआश्चर्यव्यक्तकेलेजातआहे.अवैध वाळू वाहतुकीने घेतले बळीअवैध वाळू उपशामुळे गेल्या वर्षी धरणगाव तालुक्यातील आव्हाणी शिवारात गिरणा नदी पात्राजवळ गुराख्याला तर शिवाजीनगरात एका बालका[ी वाळू वाहतूक करणाºया वाहनाने चिरडले होते. असे गंभीर प्रकार घडूनही अवैध वाळू वाहतूकदारांवर महसूल विभाग मेहरनजर का दाखवित आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक असून ते वाहतुकीवर नजर ठेवून आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा मोबदला देण्याचे सध्या काम सुरू असून त्यास प्राधान्य दिले जात आहे. महसूलचे पथक कारवाईस निघताच वाळू वाहतूकदारांकडून पाठलाग सुरू असतो.- वैशाली हिंगे, तहसीलदार.

टॅग्स :Jalgaonजळगाव