शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोनाचा वाढता संसर्ग, कोणत्या आजाराच्या रुग्णांनी घ्यावी अधिक काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 13:16 IST

प्रतिकारशक्ती कमी असल्याने लवकर होते बाधा, १०० पैकी २० मृत्यू मधुमेहाचे

आनंद सुरवाडे जळगाव : कोरोना विषाणूचा मधुमेह रुग्णांना अधिक धोका असल्याचे चित्र एकंदरित जिल्ह्याच्या परिस्थिती व आकडेवारीनुसार समोर येत आहे़ शासनाने काही दिवसांपूर्वी बैठकीतही मृत्यूचे विश्लेषण मांडले असता ६६ टक्के रुग्णांना अन्य व्याधी होत्या, असे सांगितले होते़ त्यातही मधुमेह असलेल्यांची संख्या अधिक असल्याचे आता समोर येत आहे़जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहेत़ त्यातच अन्य व्याधी असलेल्या रुग्णांवर प्रामुख्याने यंत्रणा लक्ष ठेवून आहे़ अन्य व्याधींमध्येही मधुमेह असलेल्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे़मधुमेहामुळे शरीराची प्रतिकार क्षमता अगदीच कमी असते, त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे़ शंभर मृत्यूमागे किमान २० रुग्णांना केवळ मधूमेह होता, अशीही माहिती डॉक्टरांकडून समोर येत आहे़पुरुषांना अधिक धोकाशासनाने केलेल्या विश्लेषणानुसार १८१ मृत्यूंमध्ये १२७ हे पुरुष असून ५४ महिला आहेत़ त्यानुसार पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक हे या आकडेवारीवरून समोर येत आहे़मधुमेह असणाऱ्यांची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी असते़ अशा स्थितीत त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना अधिकच धोका असतो़ आपल्याकडील मृत्यूचे प्रमाण बघितले तर पंधरा ते वीस टक्के रुग्णांना मधुमेह होता़ मधुमेहामुळे शरीराच्या अन्य अवयवयांवर परिणाम होत असतो़ त्यामुळे बाधित रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे़- डॉ़ भाऊराव नाखले, विभागप्रमुख औषधवैद्यक शास्त्रज्या रुग्णांना मधुमेह आहे व रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशांना कोरोनाची लागण झाल्यास आॅक्सिडेटिव स्ट्रेस वाढल्यामुळे त्यांची आॅक्सिजनची क्षमता खालावते़ यासह रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण अशा रुग्णांमध्ये अधिक असते़ सोबत ईन्फ्लमेशन, वाढल्यामुळे सिरम फेरीटीन, सिरम सीआरपी, सिरम ईएसआर, सिरम फ्राबोनोजेन, सिरम ईन्टलुकिनचे प्रमाण वाढून मधुमेहाचे रुग्ण लवकर दगावतात़ हे पूर्ण जगात निदर्शनास आलेले आहे़ शंभरपैकी २७ रुग्ण उशीर केल्यामुळे साखर नियंत्रणात नसल्याने मृत्यूमुखी पडतात़- डॉ़ परिक्षित बाविस्कर, मधुमेह तज्ज्ञ

टॅग्स :Jalgaonजळगाव