शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोशल मिडियावर टाकलेल्या गाण्यावरून दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 20:12 IST

रावेर तालुक्यातील रसलपूरची घटना : ११ जणांना अटक

रावेर : तालूक्यातील रसलपूर येथील गजेंद्र काशिनाथ शहाणे याने सोशेल मिडियावर धार्मिक भावना दुखावणारे गाणे टाकल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होवून त्यास अटक व सुटका झाल्यानंतर सायंकाळी शेख नुरा शेख कलाम याच्यासह १५ जणांच्या जमावाने शहाणे याच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात घराच्या खिडक्या व दरवाजे तोडून घरात असलेल्या त्याच्या पत्नीचा विनयभंग केला. गुरूवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी शुक्रवारी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण होऊन मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.सदर पिडीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व मंगळसूत्र ओढाताणीत तोडून, सर्वांना घराबाहेर काढून जिवंत जाळून मारून टाका.. चिनावलचा इरफान शेठ सर्व काही पाहून घेईन.. भिऊ नका.. अशी धमकी व चिथावणी देवून घरावर दगडफेक केल्याचा प्रकार रसलपूर गावात घडला. दरम्यान, फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी रावेर पोलिसांची कुमक, शीघ्र कृती दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी वेळीच घटनास्थळी पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवून दाखल गुन्ह्यातील ११ आरोपींना अटक केली आहे.या संदर्भात सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रसलपूर येथील गजेंद्र काशिनाथ शहाणे यांनी सोशल मिडियावर धार्मिक भावना दुखावतील अशा गाण्याची आॅडियो क्लिप व्हायरल केल्याने, चिनावल येथील इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपीला गुरूवारी रात्री अटक करून रावेर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याची पोलिसांनी सुटका केली होती.घरी परतल्यावर आला जमावशहाणे हे सायंकाळी घरी परतल्यानंतर शेख नुरा शेख कलाम याने त्याचे साथीदाराहसह शहाणे याच्या घरावर हल्ला चढविला. शेख नुरा शेख कलाम याने त्याचे साथीदारांसह गजेंद्र शहाणे यांच्या घरात धुडघूस करताना धमक्या देत त्यांच्या पत्नीचा विनयभंग करत सोन्याची चेनही ओढून नेली असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीही जमावाने तोडफोड केली. ८ रोजी सायंकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती समजताच फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दंगा नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यासंबंधी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून रसलपूर गावात तणावपूर्ण शांतता आहे.