शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

सही पुलंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:32 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी लिहिलेला लेख ‘सही पुलंची’

धरणगाव हे माझे गाव. वडिलांचे लेख आचार्य अत्रे यांच्या मराठामध्ये सातत्याने प्रकाशित व्हायचे. हाच वारसा घेऊन मी कविता लिहू लागलो. दहावीत असताना माझी पहिली कविता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. १९८२-८३ च्या काळात मी धरणगावपासून जवळ असलेल्या अमळनेर या पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून शहरी भागात आल्याने प्रथमत: लाजरा बुजरा असणारा मी सातत्याने लिहू लागलो. अमळनेरमधील तो काळ 'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे' असा होता. अमळनेर हे त्या काळात शैक्षणिक दृष्ट्या प्रगत तर होतेच पण साहित्य आणि सांस्कृतिक चळवळसुद्धा जोमाने सुरू होती. या चळवळीचा प्रभाव माझ्यावर होता. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, अरुण साधू, यदुनाथ थत्ते, बाबा आढाव, श्रीराम लागू, संगीतकार राम कदम, दादा कोंडके, नरेंद्र दाभोलकर अशी अनेक गणमान्य लोक अमळनेरला यायचे. त्यांची भाषणे, त्यांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकायची संधी मला मिळाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक वा.रा. सोनार यांच्या घराजवळ राहत असल्याने आणि ‘लोकमत’चा पत्रकार म्हणून काम करत असल्याने वा.रा. तात्या मला घरी बोलावून घेत. बव्हशी त्यांच्याकडेच या मंडळींची उठबस असायची. तात्या कामात असले की, मग मला या मंडळींशी बोलायला मिळायचे.नोव्हेंबर १९८४ मध्ये अमळनेरला साने गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पु.ल.देशपांडे यांना पालिकेने बोलावले होते. मला अजूनही आठवते, नगरपालिका समोरील मैदानात पु.ल देशपांडे यांची सभा होती. अफाट जनसमुदाय पु.लं.चे भाषण ऐकण्यासाठी कान टवकारून बसला होता. पुतळ्याच्या अनावरणानंतर पुलं बोलायला उभे राहिले, ते म्हणाले होते की, ‘मी हे निमंत्रण मिळाल्यापासून विचार करतोय की मी काय पुण्य केलं होतं म्हणून माझ्या आयुष्यात हा प्रसंग आला. जुन्या पद्धतीचा मी जर आस्तिक असतो तर गत जन्मी मी चांगले काही तरी चांगले केलेय वगैरे मानून माझं समाधान करून घेतले असतं. पण गतजन्म वगैरेवर माझा काही फारसा विश्वास नाहीये आणि या जन्मात जे-जे काही माझ्या हातून घडलंय त्यावरून गतजन्मी मी फारसे काही चांगले केलं असेल असं वाटण्या इतकंसुद्धा मला काही वाटत नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षात नसल्यानं व्यावसायिक उद्घाटक पण नाही. तेव्हा पहिल्यांदा माझ्या लक्षात आले की, साने गुरुजी हे तत्त्व, साने गुरुजी हा विचार जरी आपल्याला नाहीसा झालेला दिसतो, तरी आजचा समारंभ नि आजचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की, अमळनेरमध्ये साने गुरुजींचं तत्त्व स्पिरीट ज्याला म्हणतात साने गुरुजींचे चेतन अजूनही जिवंत आहे.'पु लं सांगत होते,पुलंचे हे भाषण माझ्यासाठी आयुष्यभरची वैचारिक शिदोरीच होती. भाषण आटोपल्यानंतर पुलं गर्दीतून वाट काढत पालिका कार्यालयात मुख्याधिकारी चेंबरमध्ये बसले. मला त्याची सही हवी होती. पण गर्दी इतकी होती की, त्यांच्यापर्यंत जाणं एक दिव्यच होतं. पण काहीही करून पुलंची सही घ्यायचीच, असा निश्चय करून मी गर्दीतून रेंगत रेंगत मी थेट त्यांच्यापर्यत पोहोचलो आणि अचानक त्यांच्यासमोर येऊन वही पुढे करून उभा राहिलो. मला असा आकस्मिक उभा राहिलेला पाहून त्यांनी माझ्याकडे खाली वर पाहिले आणि विचारले, ‘तू असा अचानक कसा आला..? ’ मी म्हणालो, ‘दरवाज्यातून..!!’ त्यांना कौतुक वाटले असावे, ते हसले आणि माझी वही हातात घेऊन त्यातल्या आधीच्या सह्या पाहिल्या आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पुलंची झोकदार सही माझ्या वहीच्या पानावर उमटली..!!-डॉ.संजीवकुमार सोनवणे, धरणगाव

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव