शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

सही पुलंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:32 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी लिहिलेला लेख ‘सही पुलंची’

धरणगाव हे माझे गाव. वडिलांचे लेख आचार्य अत्रे यांच्या मराठामध्ये सातत्याने प्रकाशित व्हायचे. हाच वारसा घेऊन मी कविता लिहू लागलो. दहावीत असताना माझी पहिली कविता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. १९८२-८३ च्या काळात मी धरणगावपासून जवळ असलेल्या अमळनेर या पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून शहरी भागात आल्याने प्रथमत: लाजरा बुजरा असणारा मी सातत्याने लिहू लागलो. अमळनेरमधील तो काळ 'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे' असा होता. अमळनेर हे त्या काळात शैक्षणिक दृष्ट्या प्रगत तर होतेच पण साहित्य आणि सांस्कृतिक चळवळसुद्धा जोमाने सुरू होती. या चळवळीचा प्रभाव माझ्यावर होता. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, अरुण साधू, यदुनाथ थत्ते, बाबा आढाव, श्रीराम लागू, संगीतकार राम कदम, दादा कोंडके, नरेंद्र दाभोलकर अशी अनेक गणमान्य लोक अमळनेरला यायचे. त्यांची भाषणे, त्यांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकायची संधी मला मिळाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक वा.रा. सोनार यांच्या घराजवळ राहत असल्याने आणि ‘लोकमत’चा पत्रकार म्हणून काम करत असल्याने वा.रा. तात्या मला घरी बोलावून घेत. बव्हशी त्यांच्याकडेच या मंडळींची उठबस असायची. तात्या कामात असले की, मग मला या मंडळींशी बोलायला मिळायचे.नोव्हेंबर १९८४ मध्ये अमळनेरला साने गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पु.ल.देशपांडे यांना पालिकेने बोलावले होते. मला अजूनही आठवते, नगरपालिका समोरील मैदानात पु.ल देशपांडे यांची सभा होती. अफाट जनसमुदाय पु.लं.चे भाषण ऐकण्यासाठी कान टवकारून बसला होता. पुतळ्याच्या अनावरणानंतर पुलं बोलायला उभे राहिले, ते म्हणाले होते की, ‘मी हे निमंत्रण मिळाल्यापासून विचार करतोय की मी काय पुण्य केलं होतं म्हणून माझ्या आयुष्यात हा प्रसंग आला. जुन्या पद्धतीचा मी जर आस्तिक असतो तर गत जन्मी मी चांगले काही तरी चांगले केलेय वगैरे मानून माझं समाधान करून घेतले असतं. पण गतजन्म वगैरेवर माझा काही फारसा विश्वास नाहीये आणि या जन्मात जे-जे काही माझ्या हातून घडलंय त्यावरून गतजन्मी मी फारसे काही चांगले केलं असेल असं वाटण्या इतकंसुद्धा मला काही वाटत नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षात नसल्यानं व्यावसायिक उद्घाटक पण नाही. तेव्हा पहिल्यांदा माझ्या लक्षात आले की, साने गुरुजी हे तत्त्व, साने गुरुजी हा विचार जरी आपल्याला नाहीसा झालेला दिसतो, तरी आजचा समारंभ नि आजचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की, अमळनेरमध्ये साने गुरुजींचं तत्त्व स्पिरीट ज्याला म्हणतात साने गुरुजींचे चेतन अजूनही जिवंत आहे.'पु लं सांगत होते,पुलंचे हे भाषण माझ्यासाठी आयुष्यभरची वैचारिक शिदोरीच होती. भाषण आटोपल्यानंतर पुलं गर्दीतून वाट काढत पालिका कार्यालयात मुख्याधिकारी चेंबरमध्ये बसले. मला त्याची सही हवी होती. पण गर्दी इतकी होती की, त्यांच्यापर्यंत जाणं एक दिव्यच होतं. पण काहीही करून पुलंची सही घ्यायचीच, असा निश्चय करून मी गर्दीतून रेंगत रेंगत मी थेट त्यांच्यापर्यत पोहोचलो आणि अचानक त्यांच्यासमोर येऊन वही पुढे करून उभा राहिलो. मला असा आकस्मिक उभा राहिलेला पाहून त्यांनी माझ्याकडे खाली वर पाहिले आणि विचारले, ‘तू असा अचानक कसा आला..? ’ मी म्हणालो, ‘दरवाज्यातून..!!’ त्यांना कौतुक वाटले असावे, ते हसले आणि माझी वही हातात घेऊन त्यातल्या आधीच्या सह्या पाहिल्या आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पुलंची झोकदार सही माझ्या वहीच्या पानावर उमटली..!!-डॉ.संजीवकुमार सोनवणे, धरणगाव

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव