शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

सही पुलंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:32 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी लिहिलेला लेख ‘सही पुलंची’

धरणगाव हे माझे गाव. वडिलांचे लेख आचार्य अत्रे यांच्या मराठामध्ये सातत्याने प्रकाशित व्हायचे. हाच वारसा घेऊन मी कविता लिहू लागलो. दहावीत असताना माझी पहिली कविता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. १९८२-८३ च्या काळात मी धरणगावपासून जवळ असलेल्या अमळनेर या पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून शहरी भागात आल्याने प्रथमत: लाजरा बुजरा असणारा मी सातत्याने लिहू लागलो. अमळनेरमधील तो काळ 'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे' असा होता. अमळनेर हे त्या काळात शैक्षणिक दृष्ट्या प्रगत तर होतेच पण साहित्य आणि सांस्कृतिक चळवळसुद्धा जोमाने सुरू होती. या चळवळीचा प्रभाव माझ्यावर होता. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, अरुण साधू, यदुनाथ थत्ते, बाबा आढाव, श्रीराम लागू, संगीतकार राम कदम, दादा कोंडके, नरेंद्र दाभोलकर अशी अनेक गणमान्य लोक अमळनेरला यायचे. त्यांची भाषणे, त्यांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकायची संधी मला मिळाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक वा.रा. सोनार यांच्या घराजवळ राहत असल्याने आणि ‘लोकमत’चा पत्रकार म्हणून काम करत असल्याने वा.रा. तात्या मला घरी बोलावून घेत. बव्हशी त्यांच्याकडेच या मंडळींची उठबस असायची. तात्या कामात असले की, मग मला या मंडळींशी बोलायला मिळायचे.नोव्हेंबर १९८४ मध्ये अमळनेरला साने गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पु.ल.देशपांडे यांना पालिकेने बोलावले होते. मला अजूनही आठवते, नगरपालिका समोरील मैदानात पु.ल देशपांडे यांची सभा होती. अफाट जनसमुदाय पु.लं.चे भाषण ऐकण्यासाठी कान टवकारून बसला होता. पुतळ्याच्या अनावरणानंतर पुलं बोलायला उभे राहिले, ते म्हणाले होते की, ‘मी हे निमंत्रण मिळाल्यापासून विचार करतोय की मी काय पुण्य केलं होतं म्हणून माझ्या आयुष्यात हा प्रसंग आला. जुन्या पद्धतीचा मी जर आस्तिक असतो तर गत जन्मी मी चांगले काही तरी चांगले केलेय वगैरे मानून माझं समाधान करून घेतले असतं. पण गतजन्म वगैरेवर माझा काही फारसा विश्वास नाहीये आणि या जन्मात जे-जे काही माझ्या हातून घडलंय त्यावरून गतजन्मी मी फारसे काही चांगले केलं असेल असं वाटण्या इतकंसुद्धा मला काही वाटत नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षात नसल्यानं व्यावसायिक उद्घाटक पण नाही. तेव्हा पहिल्यांदा माझ्या लक्षात आले की, साने गुरुजी हे तत्त्व, साने गुरुजी हा विचार जरी आपल्याला नाहीसा झालेला दिसतो, तरी आजचा समारंभ नि आजचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की, अमळनेरमध्ये साने गुरुजींचं तत्त्व स्पिरीट ज्याला म्हणतात साने गुरुजींचे चेतन अजूनही जिवंत आहे.'पु लं सांगत होते,पुलंचे हे भाषण माझ्यासाठी आयुष्यभरची वैचारिक शिदोरीच होती. भाषण आटोपल्यानंतर पुलं गर्दीतून वाट काढत पालिका कार्यालयात मुख्याधिकारी चेंबरमध्ये बसले. मला त्याची सही हवी होती. पण गर्दी इतकी होती की, त्यांच्यापर्यंत जाणं एक दिव्यच होतं. पण काहीही करून पुलंची सही घ्यायचीच, असा निश्चय करून मी गर्दीतून रेंगत रेंगत मी थेट त्यांच्यापर्यत पोहोचलो आणि अचानक त्यांच्यासमोर येऊन वही पुढे करून उभा राहिलो. मला असा आकस्मिक उभा राहिलेला पाहून त्यांनी माझ्याकडे खाली वर पाहिले आणि विचारले, ‘तू असा अचानक कसा आला..? ’ मी म्हणालो, ‘दरवाज्यातून..!!’ त्यांना कौतुक वाटले असावे, ते हसले आणि माझी वही हातात घेऊन त्यातल्या आधीच्या सह्या पाहिल्या आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पुलंची झोकदार सही माझ्या वहीच्या पानावर उमटली..!!-डॉ.संजीवकुमार सोनवणे, धरणगाव

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव