शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रिक्षा चालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांचा वैताग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST

जळगाव : सध्या शहरात वाहतूक कोंडीला मुख्यत्वे जबाबदार असतील तर काही मोजक्या रक्षा चालकांचा बेशिस्तपणाच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन ...

जळगाव : सध्या शहरात वाहतूक कोंडीला मुख्यत्वे जबाबदार असतील तर काही मोजक्या रक्षा चालकांचा बेशिस्तपणाच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात रिक्षा चालक आघाडीवर असून प्रवाशांच्या पळवापळवीमुळे रिक्षा भर रस्त्यावर आणल्या जातात तर कधी कधी दुसऱ्या वाहनाच्या समोर रिक्षा थांबवतात. काही रिक्षा चालक प्रामाणिकपणे नियमही पाळतात आणि प्रवाशांना सौजन्याची वागणुकही देत असल्याचे देखील उदाहरणे आहेत. पोलीस अधीक्षक व शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या समोरच रिक्षाचालकांकडून प्रवाशांची पळवापळवी होते. नवीन बसस्थानकातून बाहेर आलेल्या प्रवाशाला थेट घेरलेच जाते, काही जण तर हात धरुन प्रवाशाला घेऊन जातात.

दरम्यान, शहरात एका मार्गावर खरे तर पंधरा रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. परंतु काही मोजके रिक्षा चालक हे भाडे आकारतात. मुख्य रस्ता सोडून उपरस्ता किंवा कॉलनीत जायचे असेल तर अगदी मनमानी पध्दतीने भाडे आकारले जाते. एखादी व्यक्ती परजिल्ह्यातून शहरात आला असेल व त्याला तेथून यायला जितके भाडे लागत नाही, त्यापेक्षाही जास्त भाडे रिक्षा चालक शहरात कॉलन्यांमध्ये जाण्यासाठी आकारतात. संपूर्ण शहर पाच ते सात किलोमीटर अंतरात सामावलेले आहे, त्यामुळे त्याचे दर कसे असावेत यावर नियमच नाही, त्यामुळे मनमानी पध्दतीला वाव मिळत आहे. प्रवासी मिळविण्यासाठी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जाते. आपल्यामुळे वाहतूक कोंडी होईल, किंवा कोणाला अडथळा निर्माण होईल, याचा विचार अजिबात केला जात नाही. वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाई होते, मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. पोलीस डोळ्यासमोर असले की नियमांचे पालन करायचे नंतर ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती आहे.