शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जळगावात अनुदानासाठी फिरवाफिरव : मायबाप सरकार अनुदानाचं तेवढं बघा, शेतकऱ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:49 IST

कृषी विभागाची चालढकल

ठळक मुद्देतीन वर्षांपासून अनुदान मिळेना कार्यालयाकडे पायपीट

विलास बारीजळगाव : शेतीचे उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकरी सबलीकरणासाठी शासनाकडून प्रयत्न होत असताना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत तयार केलेल्या पॅक हाऊसच्या अनुदानासाठी शिरसोली येथील शेतक-याला तब्बल तीन वर्षांपासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पायपीट करावी लागत आहे. न्याय देण्याच्या भूमिकेत असलेल्या कृषी विभागाकडूनच शेतकºयावर अन्याय होत असताना ‘मायबाप सरकार अनुदानाचं तेवढं बघा’अशी आर्त हाक या शेतकºयाकडून दिली जात आहे.शिरसोली येथील पुंडलिक बाबूराव खलसे (बारी) यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत २०१४/१५ मध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत पॅक हाऊस उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार या कार्यालयाकडून २२ जानेवारी २०१५ रोजी पूर्व संमती देण्यात आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पॅक हाऊसच्या कामाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर पुंडलिक खलसे यांनी फळपिक व फुलांच्या पिकांच्या पॅक हाऊसच्या कामाला सुरुवात केली. त्यानुसार तीन लाख १० हजार रुपयांचे बांधकाम, एक लाखांची मशनरी व २५ हजारांचे साहित्य असा चार लाख ३५ हजारांचा खर्च करीत प्रकल्पाची उभारणी केली.तीन वर्षांपासून अनुदान मिळेनाअनुदानासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर या शेतकºयाने कृषी विभागाकडे वारंवार फेºया मारल्यानंतरही रक्कम मिळाली नाही. शेवटी ११ जानेवारी २०१८ रोजी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या चौघांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यात निवडलेली जागा, बांधकाम व पिक समुहाची लागवड योग्य असल्याचा अहवाल देत खर्च झालेल्या रकमेपैकी एक लाख ७२ हजार ४५५ रुपयांच्या अनुदानाची रक्कम देण्याबाबत शिफारस करण्यात आली. अनुदानासाठी ते कृषी साहाय्यक ते सहकार राज्यमंत्री या सर्वांना भेटले. मात्र त्यानंतरही अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत पॅक हाऊससाठी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयाच्या प्रस्तावाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती घेतो. पॅक हाऊसचे काम पूर्ण झाले असेल तर शेतकºयाला अनुदानाची रक्कम दिली जाईल. यात टाळाटाळ करणाºयांची चौकशी केली जाईल.- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्रीपॅक हाऊससाठीचे प्रकरण २०१४/१५ या वर्षातील आहे. या प्रकरणाबाबत आपल्या माहिती नाही. माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पॅक हाऊससाठी पूर्वसंमती मिळाल्यानंतर काम सुरु केले. त्यावर चार लाख ३५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तीन वर्षांपासून अनुदानासाठी सर्व अधिकाºयांकडे फिरलो आहे. मात्र मुद्दाम टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.-पुंडलिक खलसे, शेतकरी, शिरसोली.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव