शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

जळगावात अनुदानासाठी फिरवाफिरव : मायबाप सरकार अनुदानाचं तेवढं बघा, शेतकऱ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:49 IST

कृषी विभागाची चालढकल

ठळक मुद्देतीन वर्षांपासून अनुदान मिळेना कार्यालयाकडे पायपीट

विलास बारीजळगाव : शेतीचे उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकरी सबलीकरणासाठी शासनाकडून प्रयत्न होत असताना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत तयार केलेल्या पॅक हाऊसच्या अनुदानासाठी शिरसोली येथील शेतक-याला तब्बल तीन वर्षांपासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पायपीट करावी लागत आहे. न्याय देण्याच्या भूमिकेत असलेल्या कृषी विभागाकडूनच शेतकºयावर अन्याय होत असताना ‘मायबाप सरकार अनुदानाचं तेवढं बघा’अशी आर्त हाक या शेतकºयाकडून दिली जात आहे.शिरसोली येथील पुंडलिक बाबूराव खलसे (बारी) यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत २०१४/१५ मध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत पॅक हाऊस उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार या कार्यालयाकडून २२ जानेवारी २०१५ रोजी पूर्व संमती देण्यात आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पॅक हाऊसच्या कामाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर पुंडलिक खलसे यांनी फळपिक व फुलांच्या पिकांच्या पॅक हाऊसच्या कामाला सुरुवात केली. त्यानुसार तीन लाख १० हजार रुपयांचे बांधकाम, एक लाखांची मशनरी व २५ हजारांचे साहित्य असा चार लाख ३५ हजारांचा खर्च करीत प्रकल्पाची उभारणी केली.तीन वर्षांपासून अनुदान मिळेनाअनुदानासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर या शेतकºयाने कृषी विभागाकडे वारंवार फेºया मारल्यानंतरही रक्कम मिळाली नाही. शेवटी ११ जानेवारी २०१८ रोजी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या चौघांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यात निवडलेली जागा, बांधकाम व पिक समुहाची लागवड योग्य असल्याचा अहवाल देत खर्च झालेल्या रकमेपैकी एक लाख ७२ हजार ४५५ रुपयांच्या अनुदानाची रक्कम देण्याबाबत शिफारस करण्यात आली. अनुदानासाठी ते कृषी साहाय्यक ते सहकार राज्यमंत्री या सर्वांना भेटले. मात्र त्यानंतरही अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत पॅक हाऊससाठी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयाच्या प्रस्तावाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती घेतो. पॅक हाऊसचे काम पूर्ण झाले असेल तर शेतकºयाला अनुदानाची रक्कम दिली जाईल. यात टाळाटाळ करणाºयांची चौकशी केली जाईल.- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्रीपॅक हाऊससाठीचे प्रकरण २०१४/१५ या वर्षातील आहे. या प्रकरणाबाबत आपल्या माहिती नाही. माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पॅक हाऊससाठी पूर्वसंमती मिळाल्यानंतर काम सुरु केले. त्यावर चार लाख ३५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तीन वर्षांपासून अनुदानासाठी सर्व अधिकाºयांकडे फिरलो आहे. मात्र मुद्दाम टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.-पुंडलिक खलसे, शेतकरी, शिरसोली.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव