शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

खाद्यतेलाचा पुर्नवापर हा तर गुन्हा : होऊ शकतो कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST

डमी १२१४ आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खाद्यतेलाचा पदार्थ बनविण्यासाठी पुन्हा पुन्हा वापर करणे आणि अशा तेलाच्या ...

डमी १२१४

आनंद सुरवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : खाद्यतेलाचा पदार्थ बनविण्यासाठी पुन्हा पुन्हा वापर करणे आणि अशा तेलाच्या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास शरीराला मोठी हानी होऊ शकते, यात कर्करोगासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय हॉटेलमध्ये ५० लिटरच्या रोज वापर असताना अशा तेलाचा वापर करणे हा गुन्हा ठरतो, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खाद्यतेलाच्या अतिरिक्त सेवनाने शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. यात कोलेस्ट्रॉल वाढणे, मधुमेह, रक्तदाब तसेच पोटाचे विकार उद्भवतात. मात्र, जर तुम्ही वारंवार वापरलेल्या तेलाच्या पदार्थांचे जास्त सेवन करीत असल्यास तुम्हाला कर्करोगाचाही धोका असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासह घरीही तेलगट पदार्थ कमीच खावे असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोलेस्ट्रॉल वाढते

तेलाच्या अतिरिक्त सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे विकार जडू शकतात. त्यामुळे शक्यतोवर वारंवार बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तुम्ही सतत बाहेरचे खात असाल तर धोका उद्भवू शकतो. - डॉ. विजय गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, मेडिसीन

कर्करोगाचा धोका

पुन्हा पुन्हा वापरात येणाऱ्या तेलाच्या पदार्थांमुळे तुम्हाला पोटाचे व तातडीने दिसणारे विकार होतात. शिवाय वारंवार अशा पदार्थांचे सेवन केल्यास तुम्हाला अन्ननलिकेचा कर्करोग, पोटात ट्युमर होऊ शकतो. बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे, घरी ताजे बनवून खाणे योग्य त्यातही तेलाचा वापर कमी करावा. - डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख, मेडिसीन

आरोग्याला घातक

एकदा तेलाचा वापर हा योग्य मात्र, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केल्यास यातून तुम्हाला पोटाचे विकार उद्भवू शकतात. यात अपचन, पोट फुगल्यासारखे वाटणे, मळमळ, असे ताबडतोब दिसणारे परिणाम समोर येतात. तेलाच्या अतिरिक्त वापर हा शरीराला हानीकारक असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बाहेरचे पदार्थ वारंवार खाणे टाळा

- अन्न हे नेहमी ताजे व स्वच्छ असावे, अन्यथा यातून पोटात विविध विषाणू, जीवानुंचा तुमच्या शरीरात प्रवेश होऊ शकतो.

- शिळे व उघड्यावरचे खाल्ल्याने विविध विकार उद्भवू शकतात. याचा परिणाम थेट तुमच्या प्रतिकारक्षमतेवर होऊ शकतो.

- बाहेरचे पदार्थ वारंवार खाणे हे आरोग्याला धोकादायक असते. यातून विकार उद्भवू शकतात. त्यामुळे रस्त्यावरचे न खाल्लेलेच बरे असे डॉक्टर सांगतात.

कोट

दिवसाला ५० लिटरपेक्षा जास्त तेलाचा ज्यांचा वापर आहे. त्यांच्या बाबतीत हा गुन्हा ठरतो. आम्ही सहा ठिकाणी अशा तपासण्या केल्या असून जिल्हाभरात या तपासण्या सुरू आहेत. - योगेश बेंडकुळे, उपायुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग