शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

तीन आठवड्यानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:26 IST

गुरुवारी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह जनमानस सुखावले आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी वाढ खुंटलेल्या पिकांना जीवदाननद्या -नाल्यांना पूर आल्याने झाले प्रवाहित

जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले आहे. ऐन वाढीच्या काळात पावसाने रुसवा धरल्याने पिकांची स्थिती नाजूक बनली होती. मात्र गुरुवारी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह जनमानस सुखावले आहे. चिंतेचे सावट दूर झाले असून नदी- नाले प्रवाहीत झाले आहेत. येत्या शनिवारपासून जिल्ह्यात कानबाईचा उत्सव सुरू होणार असून पावसाच्या पुनरागमनाने आता खऱ्या अर्थाने उत्साहाला उधाण येणार आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली असून पिकांना जीवदान मिळाले आहे.भुसावळला दमदार पाऊसभुसावळ शहर व परिसरात गुरुवारी सकाळी सहापासून दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पाहिजे तसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. तसेच पाण्याचीही समस्या निर्माण झाली होती. आज पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली व दिवसभर पाऊस सुरूच होता . यामुळे या पावसाळ्यात १६ रोजी सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.शेतकरी आनंदितगत महिन्यात पावसामुळे पिकांची वाढ योग्य पद्धतीने होत असताना पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. तसेच अनेक रोगराईंचा सामना पिकांना करावा लागत होता. सकाळपासूनच जोरदार व मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी राजा आनंदित झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान, न्हावी परीसरात रात्री ९ वाजेपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. 

टॅग्स :Rainपाऊस