शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन आठवड्यानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:26 IST

गुरुवारी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह जनमानस सुखावले आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी वाढ खुंटलेल्या पिकांना जीवदाननद्या -नाल्यांना पूर आल्याने झाले प्रवाहित

जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले आहे. ऐन वाढीच्या काळात पावसाने रुसवा धरल्याने पिकांची स्थिती नाजूक बनली होती. मात्र गुरुवारी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह जनमानस सुखावले आहे. चिंतेचे सावट दूर झाले असून नदी- नाले प्रवाहीत झाले आहेत. येत्या शनिवारपासून जिल्ह्यात कानबाईचा उत्सव सुरू होणार असून पावसाच्या पुनरागमनाने आता खऱ्या अर्थाने उत्साहाला उधाण येणार आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली असून पिकांना जीवदान मिळाले आहे.भुसावळला दमदार पाऊसभुसावळ शहर व परिसरात गुरुवारी सकाळी सहापासून दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पाहिजे तसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. तसेच पाण्याचीही समस्या निर्माण झाली होती. आज पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली व दिवसभर पाऊस सुरूच होता . यामुळे या पावसाळ्यात १६ रोजी सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.शेतकरी आनंदितगत महिन्यात पावसामुळे पिकांची वाढ योग्य पद्धतीने होत असताना पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. तसेच अनेक रोगराईंचा सामना पिकांना करावा लागत होता. सकाळपासूनच जोरदार व मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी राजा आनंदित झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान, न्हावी परीसरात रात्री ९ वाजेपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. 

टॅग्स :Rainपाऊस