शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

अर्थ मंत्रालयातील काम जबाबदारीचे आणि आव्हानात्मक-सुनील चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 00:08 IST

शरदकुमार बन्सी धरणगाव , जि.जळगाव : अर्थ मंत्रालयातील आर्थिक कार्य विभाग भारत सरकारची आर्थिक धोरणे ठरविणारा असा महत्त्वाचा विभाग ...

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत- चर्चेतील व्यक्तींशी थेट संवादअर्थ मंत्रालयातील उपसचिव सुनील चौधरी यांची माहिती

शरदकुमार बन्सीधरणगाव, जि.जळगाव : अर्थ मंत्रालयातील आर्थिक कार्य विभाग भारत सरकारची आर्थिक धोरणे ठरविणारा असा महत्त्वाचा विभाग आहे. यात माझ्याकडे आपल्या देशाचे ‘राजकोशीय धोरण’ तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधी कार्य आहे. सोप्या भाषेत, भारत सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणाऱ्या मुख्य टीमचा मी एक घटक आहे. कार्य राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. यामुळे मोठ्या जबाबदारीचे आणि आव्हानात्मक तर आहेच, पण त्यासोबत समाधान देणारेही असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिव सुनील भागवत चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.त्यांची १ जून रोजी आर्थिक कार्य विभागात उपसचिव म्हणून निवड झाली. झुरखेडा, ता.धरणगाव येथील ते मूळ रहिवासी आहेत. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : या पदावर निवड कशी झाली?पदवी मिळवल्यानंतर पुण्यात खासगी कंपनीत दोन वर्ष काम केले. पुढे भारतीय स्टेट बँकेत पुणे, औरंगाबाद, मुंबई येथे चार वर्षे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नोकरी केली. २००८ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. केंद्र सरकारमध्ये इंडियन सिव्हिल अकौंटस सर्व्हिस (आय.सी.ए.एस.) या वित्तीय प्रबंधन संबंधित कार्य करणाºया सेवेत निवड झाली. यामुळे सुरुवातीपासून नवी दिल्ली येथे नियुक्ती आहे.प्रश्न : आतापर्यंत कोणत्या जबाबदाºया पार पाडल्या?आतापर्यंत केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालय, अर्थ मंत्रालय, रसायन आणि खते मंत्रालय या ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाºया हाताळल्या आहेत.प्रश्न : यू.पी.एस.सी. परिस्थिती उत्तीर्ण होण्यासाठी काय प्रयत्न केले?ठरवलेल्या ध्येयापासून विचलीत न होता, अभ्यासात सातत्य ठेवले. स्टेट बँकेत नोकरी करीत असतानाच यू.पी.एस.सी.चा अभ्यास सुरू केला. यशस्वी झालेल्या तरुणांच्या अनुभव कथनातून शिकत गेलो आणि स्वत:ला मोटिव्हेट करत गेलो.प्रश्न : तुमचा आदर्श कोण आहे?प्रामाणिक तथा जबाबदारीने आपली कर्तव्ये करणारी प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही स्तरावरील असो, ती माझ्यासाठी आदर्शवत आहे.प्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणाईला काय सांगणार?केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे नव्हे तर सर्वच तरुणांना सांगायला मला आवडेल की, आजचे जग हे स्पर्धात्मक आणि धावपळीचे आहे. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो, स्पर्धा ही अटळ आहे. स्पर्धा इतरांशी कमी आणि स्वत:शी जास्त करा. यातून जादा तणाव येणार नाही आणि स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून ध्येयापर्यंत जलद पोहोचता येईल. दुसरे असे की, सेल्फ मोटिव्हेशन आवश्यक आहे. त्यासाठी मनाने, विचारांनी व शरीराने सुदृढ राहा. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता तुमच्या व्यक्तिमत्वात भिनू द्या. शेवटचे आणि अति महत्त्वाचे मेहनतीला पर्याय नाही. म्हणून या सर्व गोष्टी सोबत घेऊन, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहा, यश नक्की मिळेल.प्रश्न : ग्रामीण भागातून आलेला अधिकारी म्हणून अर्थ मंत्रालयात काम करतानाचा आपला अनुभव?ग्रामीण पार्श्वभूमी ही माझ्यासाठी नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. ग्रामीण भागात अजूनही सोयी-सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे आपल्या ध्येय मार्गावर चालत असताना येणाºया अडचणी आणि आव्हानांवर मात करीत पुढे वाटचाल करण्याची सवय होऊन जाते. यातून आत्मविश्वासही उंचावतो. भारत सरकारच्या आर्थिक आणि इतर धोरणांचा ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अधिक चांगला विचार करता येतो. त्यामुळे अर्थ मंत्रालयात काम करताना नक्कीच छान वाटते.प्रश्न : आपली कौटुंबिक पार्श्वभूमीजन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात. आई-वडिलांचे शालेय शिक्षण झालेले नसले तरी त्यांच्याकडे इतर अनुभवांचे शिक्षण मोठे होते. शिक्षणाचे महत्व त्यांना चांगले माहीत होते, म्हणून त्यांनी आम्हा भावंडांना शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मोठे भाऊ प्राथमिक शिक्षक, तर लहान भाऊ शेती करतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पत्नी रुपालीचे नेहमीच सहकार्य असते.

टॅग्स :interviewमुलाखतDharangaonधरणगाव