शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

हिवाळी सुट्ट्यांचे रिशेड्युलिंग होईना, प्राध्यापक संघटना संतप्त!

By अमित महाबळ | Updated: November 1, 2023 18:53 IST

विद्यापीठ आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील रिशेड्युलिंगचा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत.

जळगाव : विद्यापीठाने एन. मुक्ता संघटनेला पत्र देऊन सुट्ट्यांच्या रिशेड्युलिंगसंदर्भात चर्चेला बोलविले होते, परंतु बैठकीच्या सुरुवातीलाच प्र कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे यांनी दिवाळी सुट्यांचे रिशेड्युलिंग न करण्यावर विद्यापीठ ठाम असल्याचे सांगितले. यामुळे विद्यापीठ आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील रिशेड्युलिंगचा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत.

एन. मुक्ता संघटना दिवाळीच्या अनुषंगाने सुट्यांचे रिशेड्युलिंग करून मिळावे या मागणीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे पाठपुरावा करत आहे. या संदर्भात प्रशासनाने मंगळवारी, चर्चेसाठी संघटनेला बोलावले होते. यावेळी रिशेड्युलिंगसह डिसेंबरमधील हिवाळी सुट्ट्यांमध्ये परीक्षेचे कामकाज प्राध्यापकांना बंधनकारक न करता ऐच्छिक करावे, त्याचे पत्र विद्यापीठाने निर्गमित करावे, अशी भूमिका एन. मुक्ताच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने विचार करून कळवू, असे सांगितले. तसेच सुट्यांचे रिशेड्युलिंग न करण्यावर विद्यापीठ ठाम असल्याचे सांगण्यात आले. परीक्षा नियंत्रक डॉ. योगेश पाटील, उपकुलसचिव डॉ. जी. एन. पवार, एन-मुक्ता संघटनेचे अध्यक्ष डॉ. नितीन बारी, सिनेट सदस्य डॉ. अजय पाटील, डॉ. कांचन महाजन, प्रा. डॉ . मनोज चोपडा, सचिव डॉ. पवन पाटील बैठकीतील चर्चेत सहभागी झाले होते.

परीक्षा पुढे ढकलतात, मग रिशेड्युलिंग का नाही ?बी.कॉम.च्या परीक्षा विद्यापीठाने अडचण येताच बरोबर १५ दिवस पुढे ढकललेल्या आहेत, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमुळे जनरल नॉलेज व एन्व्हायरमेंटचा पेपरही पुढे ढकलला आहे. या सगळ्या परीक्षा विद्यापीठ पुढे ढकलू शकते. परंतु, सुट्ट्यांचे रिशेड्युलिंग करण्याची मागणी फक्त एन. मुक्ताने केल्यामुळेच सुट्या द्यायला विद्यापीठ टाळाटाळ करत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हिवाळी परीक्षा २०२३ च्या नियोजित तारखेत बदल करून ही परीक्षा दिवाळी सुट्टीनंतर घेण्यात यावी अशी मागणी स्वामुक्टा संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. त्यांची मागणी झाली तर मग आपल्या विद्यापीठाला काय अडचण आहे, असा प्रश्नही डॉ. नितीन बारी यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव