शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार जनतेचे प्रतिनिधी मात्र जि.प.सदस्यांना अधिकार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ३ ते ४ हजार लोकसंख्येतून निवडून येणाऱ्या नगरसेवकांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ३ ते ४ हजार लोकसंख्येतून निवडून येणाऱ्या नगरसेवकांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार तसेच निधीही अधिक असे असताना ३५ ते ४० हजार लोकसंख्येतून निवडून येणाऱ्या जिल्हा परिषदे सदस्यांना काय अधिकार? साधे जिल्हा नियोजनच्या सभेत ऐकून घेतले जात नाही, अशी विदारक अवस्था असून याबाबत राज्यभर सर्वांनी एकत्र येऊन हा आवाज सरकारडे पोहचविला पाहिजे असा सूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हास्तरीय बैठकीत उमटला.

या बैठकीला असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीला जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने, राज्य उपाध्यक्ष जयमंगल जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा नीलम पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, सीईओ डॉ.पंकज आशिया आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. अधिकाऱ्यांकडून सदस्यांना मानसन्मान मिळावा, असे मत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी व्यक्त केले. जि. प. सदस्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचे मत जयमंगल जाधव यांनी व्यक्त केले. सदस्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडा, असे जि.प.अध्यक्षा रंजना पाटील म्हणाल्या. यावेळी मुदतवाढीची मागणीही करण्यात आली.

नाहीतर पंचायत समित्या बरखास्त करा

जिल्हा परिषद सदस्यांना अधिकार काय हा विचार केल्यावर आम्हालाही प्रश्न पडतो. जि. प. सदस्यांचा थेट ग्रामीण जनतेशी संवाद असल्याने त्यांना नेमकी उत्तरे काय द्यावी असा प्रश्न असतो. यापेक्षा बिकट अवस्था पंचायत समिती सदस्यांची असते. कुठलेच अधिकार नसल्याने लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. जर अधिकारच नाही तर पंचायत समित्याच बरखास्त करा, अशी संतप्त मागणी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केली. सदस्यांच्या पायाला बेडी बांधून पुढे जा असा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रावेर पंचायत समिती सदस्या प्रतिभा बोरोले यांनीही मनोगत व्यक्त करीत पंचायत समिती सदस्यांना अधिकार नसल्याचा मुद्दा मांडला.

मंत्री, आमदारांना व्यासपीठ आहे

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्हा परिषदेचे सर्वाधिक ३७ सदस्य हे निवडून गेलेले असतात. आमदार त्या ठिकाणी निमंत्रीत सदस्य असतात, असे असताना जि.प.सदस्यांना त्या ठिकाणी किती अधिकार असता, आमदार, मंत्री यांना अन्य व्यासपीठ असतात, अशा वेळी जिल्हा नियोजनच्या सभेत जि. प. सदस्यांना अधिकार देणे, मान देणे या बाबी होणे अपेक्षित असल्याचे मतही यावेळी उपस्थितांनी मांडला.