शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

बाधितांचे अहवाल आले मृत्यूनंतर : १२ दिवसातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:07 IST

आनंद सुरवाडे । जळगाव : कोरोना संशयितांचे अहवाल उशिरा येणे जिल्ह्यात कळीचा मुद्दा बनत आहे. गेल्या १२ दिवसात ३३ ...

आनंद सुरवाडे ।जळगाव : कोरोना संशयितांचे अहवाल उशिरा येणे जिल्ह्यात कळीचा मुद्दा बनत आहे. गेल्या १२ दिवसात ३३ बाधितांचे अहवाल हे मृत्यूनंतर प्राप्त झाले आहेत. उशिरा करण्यात आलेल्या नोंदीवरून ही बाब समोर आली आहे़ यात २९ मे रोजी चोपडा तालुक्यातील एका ४५ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला होता़ १६ जून रोजी या मृत्यूची नोंद बाधितांच्या मृत्यूमध्ये करण्यात आली आहे़ यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़जळगावात गेल्या १२ दिवसात ५५ जणांचे मृत्यू झालेले आहेत़ अशातच जळगावातील मृत्यूदर गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आला आहे़ गेल्या काही दिवसांपासून एक वेगळाच प्रकार समोर आला असून मृत्यू झाल्यानंतर अनेक बाधितांची चार ते पाच दिवसांनी नोंद केली जात आहे़ मृत्यूनंतर अहवाल येत असल्याने त्यांची नोंद उशिरा होत असल्याचे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांचे म्हणणे आहे़एकही मृत्यू नाही़़़़४१३ व २३ जून रोजी एकही मृत्यू झालेला नसताना संख्या मात्र प्रत्येकी ३ नोंदविण्यात आली होती़ १०, ११ व १२ जून रोजी झालेल्या मृत्यूची नोंद १३ जूनला झाली आहे तर २३ जून रोजी १९ आणि २२ जूनच्या प्रत्येकी १ व २० जूनच्या दोन मृत्यृची नोंद करण्यात आली आहे़ मृत्यू नसतानाही त्या दिवशी ६ मृत्यूची नोंद झाली आहे.१३ जून रोजी मृत्यू झालेल्या जळगावातील एका ५५ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद १९ जून रोजी तर १३ रोजीच मृत्यू झालेल्या धरणगाव तालुक्यातील ५८ वर्षीय प्रौढाच्या मृत्यूची नोंद २१ जून रोजी झाली ़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव