शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वाकडीतील पीडित मुलांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:21 IST

चारपैकी दोन मुले जळगावी बालनिरीक्षणगृहात, उर्वरित दोघांचेही लवकरच

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : वाकडीतील पीडित कुटुंबियांतील मुलांसाठी जिल्हा बालकल्याण समिती पुढे सरसावली असून, शैक्षणिक जबाबदारीसह या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ठामपणे उभी राहिली आहे. शनिवारी समितीच्या सदस्यांनी वाकडीत या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. पीडित मुलांसह त्यांचा अल्पवयीन भाऊ व बहिण यांना घेऊन जळगाव येथील बालनिरीक्षकगृहात दाखल केले असून, या पीडित कुटुंबाचे पुनर्वसन केले आहे.वाकडी येथे गेल्या महिन्यात विहिरीत पोहल्याच्या शुल्लक कारणावरुन मातंग समाजाच्या दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार यांना अटक करण्यात आली आहे, तर अजित तडवी व शकनूर तडवी यांना गावबंदीच्या शर्तीवर जामीन मिळाला आहे. याठिकाणी अनेक मंत्री, आमदार व सामाजिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन काहीनी तुटपुंजी मदत देऊन आपल्या पद्धतीने सोयीचे राजकारण केल्याचे दिसून आले आहे.या समितीचा मूळ उद्देश एकच की, अनाथ, पीडित, गोरगरीब मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्याचा आहे. या हेतूने जिल्हा बालकल्याण समितीने संवेदनशील मन जपून वाकडीतील पीडित कुटुंबांच्या घरी शनिवारी नितीन विसपुते व डॉ.शैलेजा चव्हाण या सदस्यांनी भेटी देऊन या कुटुंबांची व्यथा जाणून घेतली. या पीडित मुलांसह त्यांच्या कुटुंंबातील अल्पवयीन भाऊ-बहिण यांच्या शिक्षणासह त्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.शनिवारी दोन पीडित मुलांना या सदस्यांनी वाकडी गावातून सोबत घेऊन जळगावातील बालनिरीक्षकगृहात दाखल केले आहे. अशी एकूण पीडित चार मुले असून, यांच्यासह १८ वर्षांखालील भाऊ-बहिण यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन ते तीन दिवसात राहिलेले पीडित दोन मुलांनादेखील निरीक्षणगृहात दाखल केले जाणार आहे. आज एक कुटुंब शेतात गेलेले होते. यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे या सदस्यांच्या संपर्कात आहेत.व्यावसायिक शिक्षण मुंबईतया पीडित मुलांसह त्यांच्या भाऊ बहिणींचे अठरा वर्षांपर्यंत शिक्षण जळगाव येथे होईल. त्यानंतर अठरा ते एकविस वर्षापर्यंत पुढील शिक्षण हे मुंबईत दिले जाणार आहे. या काळात या मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले जाणार आहे.पीडित मुलांसह त्यांच्या भाऊ बहिणींची काळजी, संरक्षण, शिक्षण देण्याच्या दृष्टीने समिती कार्य करीत आहे. या पीडित कुटुंबातील अठरा वर्षांखालील मुलांची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी समितीने निर्णय घेतला आहे.-नितीन विसपुते, सदस्य, जिल्हा बालकल्याण समिती, जळगाव

टॅग्स :Crimeगुन्हाJamnerजामनेर