शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

वाकडीतील पीडित मुलांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:21 IST

चारपैकी दोन मुले जळगावी बालनिरीक्षणगृहात, उर्वरित दोघांचेही लवकरच

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : वाकडीतील पीडित कुटुंबियांतील मुलांसाठी जिल्हा बालकल्याण समिती पुढे सरसावली असून, शैक्षणिक जबाबदारीसह या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ठामपणे उभी राहिली आहे. शनिवारी समितीच्या सदस्यांनी वाकडीत या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. पीडित मुलांसह त्यांचा अल्पवयीन भाऊ व बहिण यांना घेऊन जळगाव येथील बालनिरीक्षकगृहात दाखल केले असून, या पीडित कुटुंबाचे पुनर्वसन केले आहे.वाकडी येथे गेल्या महिन्यात विहिरीत पोहल्याच्या शुल्लक कारणावरुन मातंग समाजाच्या दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार यांना अटक करण्यात आली आहे, तर अजित तडवी व शकनूर तडवी यांना गावबंदीच्या शर्तीवर जामीन मिळाला आहे. याठिकाणी अनेक मंत्री, आमदार व सामाजिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन काहीनी तुटपुंजी मदत देऊन आपल्या पद्धतीने सोयीचे राजकारण केल्याचे दिसून आले आहे.या समितीचा मूळ उद्देश एकच की, अनाथ, पीडित, गोरगरीब मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्याचा आहे. या हेतूने जिल्हा बालकल्याण समितीने संवेदनशील मन जपून वाकडीतील पीडित कुटुंबांच्या घरी शनिवारी नितीन विसपुते व डॉ.शैलेजा चव्हाण या सदस्यांनी भेटी देऊन या कुटुंबांची व्यथा जाणून घेतली. या पीडित मुलांसह त्यांच्या कुटुंंबातील अल्पवयीन भाऊ-बहिण यांच्या शिक्षणासह त्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.शनिवारी दोन पीडित मुलांना या सदस्यांनी वाकडी गावातून सोबत घेऊन जळगावातील बालनिरीक्षकगृहात दाखल केले आहे. अशी एकूण पीडित चार मुले असून, यांच्यासह १८ वर्षांखालील भाऊ-बहिण यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन ते तीन दिवसात राहिलेले पीडित दोन मुलांनादेखील निरीक्षणगृहात दाखल केले जाणार आहे. आज एक कुटुंब शेतात गेलेले होते. यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे या सदस्यांच्या संपर्कात आहेत.व्यावसायिक शिक्षण मुंबईतया पीडित मुलांसह त्यांच्या भाऊ बहिणींचे अठरा वर्षांपर्यंत शिक्षण जळगाव येथे होईल. त्यानंतर अठरा ते एकविस वर्षापर्यंत पुढील शिक्षण हे मुंबईत दिले जाणार आहे. या काळात या मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले जाणार आहे.पीडित मुलांसह त्यांच्या भाऊ बहिणींची काळजी, संरक्षण, शिक्षण देण्याच्या दृष्टीने समिती कार्य करीत आहे. या पीडित कुटुंबातील अठरा वर्षांखालील मुलांची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी समितीने निर्णय घेतला आहे.-नितीन विसपुते, सदस्य, जिल्हा बालकल्याण समिती, जळगाव

टॅग्स :Crimeगुन्हाJamnerजामनेर