शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

नोंदणी ६ हजार शेतकऱ्यांची खरेदी मात्र ८०० शेतकऱ्यांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

ज्वारी खरेदी थांबविल्याने शेतकरी संतापले : निम्म्या भावात व्यापाऱ्यांकडे विक्री करण्याची आली वेळ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात ...

ज्वारी खरेदी थांबविल्याने शेतकरी संतापले : निम्म्या भावात व्यापाऱ्यांकडे विक्री करण्याची आली वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात यावर्षी तब्बल दीड महिना उशिराने रबी धान्यांची खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, उद्दिष्टाचे कारण देत शासकीय खरेदी केंद्र महिनाभरातच बंद झाले असून, जिल्ह्यात ज्वारी विक्रीसाठी तब्बल ६ हजार ५७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना केवळ ८५१ शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आला आहे. त्यातच शासकीय खरेदी केंद्र बंद करून, उर्वरित ५ हजार शेतकऱ्यांचा तोंडाला शासनाने परत एकदा पाने पुसली आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच शासनाकडून देखील शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम सुरू आहे. गेल्यावर्षी मका खरेदीमध्ये थट्टा केल्यानंतर यावर्षी ज्वारी खरेदीत शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील, या आशेने शेतकऱ्यांनी तब्बल तीन महिने धान्य घरातच साठवून ठेवले. एप्रिल महिन्यात नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ६ हजार ५७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना, खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर केवळ ८५१ शेतकऱ्यांकडूनच माल खरेदी करण्यात आला. त्यामुळे उर्वरित ५ हजार शेतकऱ्यांना शासनाने अक्षरश: वाऱ्यावर सोडून दिल्याने ज्वारी लागवड केलेल्या शेतकऱ्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात असून, शासकीय खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

हमीभावापेक्षा निम्मे भावात माल विक्री करण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ

शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करून माल विक्री केल्यास शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे भाव मिळत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा भर शासकीय खरेदी केंद्रावरच माल विक्री करण्यावर असतो. जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली होती. त्यामुळे ज्वारी खरेदीचे उद्दिष्टदेखील ६० हजार क्विंटलपर्यंत असणे गरजेचे होते. मात्र, जिल्ह्यात केवळ २५ हजार ३६६ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात आता खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा निम्म्या भावात आपला माल विक्री करावा लागत आहे. हमीभाव २६०० रुपये क्विंटल इतका असताना, शेतकऱ्यांना १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल या दराने आपला माल विक्री करावा लागत आहे.

कोट...

शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असून, जर माल खरेदी करायचा नव्हता तर नोंदणी करण्याची गरजच काय होती, निदान ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्या शेतकऱ्यांचा माल तरी शासनाने खरेदी करावा, शासनाने उद्दिष्ट वाढवून, जिल्ह्यात पुन्हा ज्वारी खरेदीला सुरुवात करायला हवी.

-ॲड. हर्षल चौधरी, ज्वारी उत्पादक शेतकरी, तथा पंचायत समिती सदस्य