शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय हळद आणि गोड मक्यापासून घेतले विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:32 IST

कृषीभूषण राजेश पाटील यांचा उपक्रम : जळके येथे शेतीत यशस्वी प्रयोग, पांरपारिक पीक पध्दतीला फाटा

सुनील पाटीलजळगाव : पारंपारिक पीक पध्दतीला फाटा देत सेंद्रीय पध्दतीची शेती करुन जळके (ता.जळगाव) येथील शेतकरी कृषीभूषण राजेश पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सेंद्रीय हळद, पपईसोबत गोड मधू मका या पिकांचे विक्रमी उत्पादन राजेश पाटील यांनी घेतले असून सेंद्रीय शेतीमुळे त्यांना राज्य शासनाने कृषीभूषण पुरस्कारानेही गौरविले आहे.राजेश पाटील यांच्याकडे स्वत:ची ६० एकर तर कराराची ४५ एकर अशी एकूण १०५ एकर शेती आहे. पाटील यांचा नेहमीच पांरपारिक पीक पध्दतीला फाटा देत नवीन पध्दत अवलंबण्याकडे कल असतो. रासायनिक पिकांचा आरोग्यावर होणार दुष्पपरिणाम पाहता त्यांनी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडला.डाळींब, पपई आणि हळद हे तीन पीके त्यांनी सेंद्रीय पध्दतीने लागवड करुन विक्रमी उत्पादन घेतले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल कृषी विभागाने घेतली. २००६ मध्ये तत्कालिन राज्यपाल, मुख्यमंत्री विलासराव देशमुख व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते त्यांना नागपूर येथे कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. २००३ पासून ते सेंद्रीय हळदीचे उत्पादन घेत आहेत.

योग्य नियोजन करुन संयम राखणे आवश्यकआदर्श शेतकरी व कमी खर्चात विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असेल तर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करुन संयम राखणे आवश्यक आहे. उत्पादीत झालेल्या मालाला भाव नसेल तर त्याची साठवण करुन मागणीच्या वेळी पीक विक्रीला काढले तर चांगला भाव मिळतो. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. सेंद्रीय हळद व गोड मधू मक्याचे उत्पादन घेणारे राजेश पाटील हे तालुक्यातील पहिले शेतकरी आहेत. सद्यस्थितीत त्यांनी साडे चार एकरात गोड मक्याची लागवड केली असून तितक्यात एकरात हळदीची लागवड केली आहे. कोरडी झाल्यानंतरच हळद बाजारात विक्री काढली तर उत्तम भाव मिळतो असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी ३० एकर सेंद्रीय उसाची लागवड करुन स्वत:च गुळ निर्मिती केली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव