शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या ४८५ पाणी योजनांचे अहवाल मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 15:49 IST

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून दोषींवर कारवाईबाबत दिरंगाई१५ दिवस उलटल्यानंतरही अहवाल प्राप्त नाहीअहवालानंतर कारवाईबाबतचा निर्णय

जळगाव : गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे. यातच याचा पाठपुरावाही संथ गतीने सुरू आहे. या कामांचा अहवाल आठवडाभरात पाठविण्याच्या सूचना जि.प. प्रशासनाने केल्या असताना १५ दिवस उलटूनही हे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाही.या पाणी योजनांंबाबत नुकत्याच झालेल्या जळगाव दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत योजना रखडत ठेवणाºया दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ८ आॅक्टोबर रोजी दिले होते. यानंतर दोन दिवसात संबंधित सर्व उप अभियंत्यांना पाणी योजनेच्या कामांबाबत एका आठवड्यात अहवाल पाठवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात भारत निर्माण, महाजल, स्वजलधारा, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आदी विविध योजनांमधून अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर झाले व निधीही दिला. मात्र अनेक वर्ष होऊनही एकूण ४८५ ठिकाणी पाणी योजनांचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यासर्व योजना पूर्ततेसाठी मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या २ वर्षात केवळ २०९ योजनांचे काम पूर्ण झाले आहे.अपूर्ण पाणी योजनांबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या समित्या मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करू शकतील व तशी तयारी दाखवतील अशांना मात्र यातून सूट मिळू शकते. तथापी किती पाणी योजना समित्यांवर गुन्हे दाखल होतात, याकडे संबंधित गावांचेही लक्ष लागून असून तातडीने ही कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव