शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या ४८५ पाणी योजनांचे अहवाल मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 15:49 IST

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून दोषींवर कारवाईबाबत दिरंगाई१५ दिवस उलटल्यानंतरही अहवाल प्राप्त नाहीअहवालानंतर कारवाईबाबतचा निर्णय

जळगाव : गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे. यातच याचा पाठपुरावाही संथ गतीने सुरू आहे. या कामांचा अहवाल आठवडाभरात पाठविण्याच्या सूचना जि.प. प्रशासनाने केल्या असताना १५ दिवस उलटूनही हे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाही.या पाणी योजनांंबाबत नुकत्याच झालेल्या जळगाव दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत योजना रखडत ठेवणाºया दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ८ आॅक्टोबर रोजी दिले होते. यानंतर दोन दिवसात संबंधित सर्व उप अभियंत्यांना पाणी योजनेच्या कामांबाबत एका आठवड्यात अहवाल पाठवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात भारत निर्माण, महाजल, स्वजलधारा, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आदी विविध योजनांमधून अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर झाले व निधीही दिला. मात्र अनेक वर्ष होऊनही एकूण ४८५ ठिकाणी पाणी योजनांचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यासर्व योजना पूर्ततेसाठी मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या २ वर्षात केवळ २०९ योजनांचे काम पूर्ण झाले आहे.अपूर्ण पाणी योजनांबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या समित्या मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करू शकतील व तशी तयारी दाखवतील अशांना मात्र यातून सूट मिळू शकते. तथापी किती पाणी योजना समित्यांवर गुन्हे दाखल होतात, याकडे संबंधित गावांचेही लक्ष लागून असून तातडीने ही कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव