शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या ४८५ पाणी योजनांचे अहवाल मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 15:49 IST

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून दोषींवर कारवाईबाबत दिरंगाई१५ दिवस उलटल्यानंतरही अहवाल प्राप्त नाहीअहवालानंतर कारवाईबाबतचा निर्णय

जळगाव : गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे. यातच याचा पाठपुरावाही संथ गतीने सुरू आहे. या कामांचा अहवाल आठवडाभरात पाठविण्याच्या सूचना जि.प. प्रशासनाने केल्या असताना १५ दिवस उलटूनही हे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाही.या पाणी योजनांंबाबत नुकत्याच झालेल्या जळगाव दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत योजना रखडत ठेवणाºया दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ८ आॅक्टोबर रोजी दिले होते. यानंतर दोन दिवसात संबंधित सर्व उप अभियंत्यांना पाणी योजनेच्या कामांबाबत एका आठवड्यात अहवाल पाठवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात भारत निर्माण, महाजल, स्वजलधारा, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आदी विविध योजनांमधून अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर झाले व निधीही दिला. मात्र अनेक वर्ष होऊनही एकूण ४८५ ठिकाणी पाणी योजनांचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यासर्व योजना पूर्ततेसाठी मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या २ वर्षात केवळ २०९ योजनांचे काम पूर्ण झाले आहे.अपूर्ण पाणी योजनांबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या समित्या मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करू शकतील व तशी तयारी दाखवतील अशांना मात्र यातून सूट मिळू शकते. तथापी किती पाणी योजना समित्यांवर गुन्हे दाखल होतात, याकडे संबंधित गावांचेही लक्ष लागून असून तातडीने ही कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव