शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सक्षम युवा पिढीसाठी वाचन संस्कृती रुजणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 19:41 IST

डॉ. आशुतोष पाटील : मू़जे़ महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन

जळगाव : जग बघण्यासाठी आणि सक्षम युवा पिढी घडण्यासाठी समाजात वाचन संस्कृती रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. आशुतोष पाटील यांनी केले.अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-जळगाव व मू़जे़ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यावेळी केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, युवराज माळी आदींची उपस्थिती होती़आशुतोष पाटील पुढे म्हणाले की, वाचनाने व्यक्तिमत्व विकासाबरोबरच दैनंदिन जीवनात आत्मभान आणि जीवनभान येते. हृदय, हात व मेंदुचा विकास होण्यासाठी वाचन आवश्यक आहे़ तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृतीचे स्वरूप हे बदलले असून युवा पिढीवर फार मोठी जबाबदारी आहे़ तर प्रकाशक सुध्दा व्यवसाय म्हणून का होईना़ मात्र, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नेहमीच कार्य करित असतात़ तसेच ज्ञानसंपन्न होण्यासाठी श्रवण आणि वाचन महत्वाचे आहे़ त्यामुळे प्रेम करायचे असेल तर ते पुस्तकांवर करा, असे मत सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले़ सूत्रसंचालन डॉ. अतुल पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांनी केले़व्यक्त होण्याचं सोशल मीडिया मोठं साधन !प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रानंतर ‘सोशल मिडिया : वाचनाचे नवे आयाम’ या विषावर दुसरे सत्र पार पडले़ त्यावेळी व्यासपीठावर लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व मू़जे़ महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे डॉ़ पंडित चव्हाण यांची उपस्थिती होती़ त्यावेळी वाचनाची गोडी निर्माण झाली की, आपण हळूहळू पुस्तकाकडे वळतो़ दरम्यान, विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या पलीकडे जाऊन वाचन करणे आवश्यक आहे़ आधी व्यक्त होण्यासाठी मर्यादीत साधने होती़ आज सोशल मीडियामुळे व्यक्त होणे सोपं झालेले आहे, असे मत मिलिंद कुलकर्णी यांनी मांडले़ सोशल मीडियावर आलेल्या पोस्टचे समर्थन कराल किंवा त्यावर मत मांडाल तर त्यासाठी अभ्यासूपणा असायला हवा़ तरचं त्या मताला महत्व असते़ आज तर मला जेवढे हवे आहेत़़़मला जेवढे आवडतील किंवा पुरक ठरतील तेवढेच महापुरूष माझे, असे झाले असून मात्र, महापुरषांचा संपूर्ण अभ्यास असायला हवा़ जर अभ्यास नसेल तर मुद्दा मांडत असताना आपण उघडे पडतो असेही त्यांनी सांगितले़वाचन संस्कृतीत बदल़़वाचन संस्कृती ही लयाला चालली नसून त्यात फक्त बदल होत चालला आहे़ तंत्रज्ञामुळे वाचकाला चॉईस मिळाली असून तो विविध भाषांमध्ये वाचन करित आहे़ त्यामुळे सोशल मीडियाचा वाचन संस्कृतीवर कुठलाही फरक पडत नाही़ उलट पुस्तके घरा-घरात पोहोचली़ मी डिजीटल माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलो असे, प्रा़ पंडित चव्हाण यांनी मत व्यक्त करताना सांगितले़प्रदर्शनात ७५ प्रकाशकांची पुस्तकेया प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध ७५ नामवंत प्रकाशकांची पुस्तके लावण्यात आली आहेत. प्रदर्शनानिमित्त मू़जे़ महाविद्यालयात साहित्यिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यावेळी डॉ. किसन पाटील, चंद्रकांत भंडारी, डॉ. सी. पी. लभाणे, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ. एल. पी. वाघ, डॉ. सविता नंदनवार, सुखदेव वाघ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. योगेश महाले, प्रा. गोपिचंद धनगर, प्रा. दीनानाथ पाठक, प्रा. अजित पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव