शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सत्तासंघर्षाच्या धाग्यात अडकले ‘रेमण्ड’चे आंदोलन; १० अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:50 IST

चार वर्षांपूर्वी केलेला वेतन करार ‘रेमण्ड’ कंपनीने यंदाही कायम ठेवला. त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न चव्हाट्यावर आला.

जळगाव :  

चार वर्षांपूर्वी केलेला वेतन करार ‘रेमण्ड’ कंपनीने यंदाही कायम ठेवला. त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न चव्हाट्यावर आला. तशातच ‘रेमण्ड’च्या पडद्यामागे सत्तासंघर्ष पेटला आणि कामगारांवर दबावतंत्र सुरु झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी दुसऱ्यादिवशीही ‘काम बंद’ आंदोलन सुरु ठेवले. या आंदोलनात सहभागी होण्यावरुन वाद पेटल्याने एमआयडीसी पोलिसांनी दहा जणांना अटक केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दरम्यान, सत्ताधारी मंत्र्यांच्या पाठबळातूनच कामगारांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

जगदीश तुकाराम बोरोले (वय ५०, ओमनगर), किशोर मुकूंदा पाटील, (५५, विठ्ठल पेठ), अनील भास्कर चौधरी (५५, अयोध्यानगर), चंद्रकांत पीतांबर लोखंडे (४४, नशिराबाद रोड), चेतन विनोद पाटील (३७, मेहरुण), योगेश्वर क्रिष्णा कोल्हे (५९, कोल्हेवाडा), हर्षल वासुदेव नेहते (३४, खेडीशिवार), संदीप पुंडलिक कोल्हे (४६, कोल्हेवाडा), मयूर किसन चौधरी (३३, भादली), राकेश पुंडलिक कोल्हे (५०, कोल्हेवाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  त्यांच्याविरोधात भा.दं.वि.३४१, ३४२, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद ‘रेमण्ड’ कंपनीचे सुरक्षा अधिकारी गिरधारी मारोती कुर्वे यांनी दिली आहे. आरोपींनी जितेंद्र जोशी अध्यक्ष असलेल्या कामगार उत्कर्ष संघटनेशी करार केल्याचा राग आल्याने ‘रेमण्ड’विरोधात घोषणाबाजी केली आणि मशिनरी बंद करुन कामगारांना काम करण्यास मज्जाव केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव