शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रावेर : केळी नुकसानीचा अंतिम अहवाल पोहचला ८० कोटी रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

रावेर : वादळी पावसाच्या तडाख्यात दि. २५, २७, २९ व ३० मे व २ जून रोजी तालुक्यातील ५८ ...

रावेर : वादळी पावसाच्या तडाख्यात दि. २५, २७, २९ व ३० मे व २ जून रोजी तालुक्यातील ५८ गावांतील ४ हजार ७१४ शेतकर्‍यांच्या १ हजार ८५३.९२ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन ८० कोटी ६४ लाख ४८ हजार रुपये नुकसानीचा अंतिम अहवाल तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी. भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी मोहगण, अहिरवाडी, पाडळे व तापीकाठच्या खिर्डी, रेंभोटा, वाघाडी, धामोडी, सुलवाडी, कोळोदा, भामलवाडी, कळमोदा, ऐनपूर, निंबोल, विटवे व निंभोरासीम तथा सुकी काठच्या उटखेडा, भाटखेडा, सावखेडा, बलवाडी, सिंगत, मस्कावद व दसनूर परिसरातील ४४ गावांमधील ३ हजार ६२६ शेतकऱ्यांच्या १ हजार २८४ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा दि २५, २७ ,२९ व ३० मे रोजी वादळी पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त होऊन ५७ कोटी ९० लाख ७२ हजार रु.चे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल यापूर्वीच तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता.

दरम्यान, त्यापाठोपाठ दि ३१ मे रोजी रायपूर व सुदगाव शिवारातील ४५ शेतकऱ्यांच्या ३६.२६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन १ कोटी ४५ लाख ०४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ दि २ जून रोजी पाडळे, अहिरवाडी, मोहगण, पिंप्री, केऱ्हाळे, मंगरूळ, जुनोने, रावेर, भोकरी व कर्जोद शिवारातील १ हजार ४३ शेतकऱ्यांच्या ५३२.८६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन २१ कोटी २८ लाख ७२ हजार रु.चे नुकसान झाल्याचे पंचनामे पूर्णत्वास आले आहेत.

त्या अनुषंगाने ५८ गावातील ४ हजार ७१४ शेतकऱ्यांच्या १ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन ८० कोटी ६४ लाख ४८ हजार रु. नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.