शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रावेर शहर हद्दवाढीचा चार चौरस कि.मी. क्षेत्रफळाचा पुनर्रचित प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 15:38 IST

रावेर शहराच्या क्षेत्रफळाच्या दुपटीने अर्थात चार चौरस कि. मी. क्षेत्रफळाचा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरावेर शहरातील नवीन वसाहती समाविष्ट करण्यासाठी प्राधान्यसार्वत्रिक निवडणुकांपूर्वी शहरहद्दवाढीचे डोहाळेत्रुटींची पूर्तता करून पुन्हा नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार : मुख्याधिकारी रवींद्र लांडे

रावेर, जि.जळगाव : शासनाच्या अध्यादेशान्वये आता शहराच्या क्षेत्रफळाच्या दुपटीने अर्थात चार चौरस कि. मी. क्षेत्रफळाचा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, त्यातील त्रुटींची पूर्तताही लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रावेर शहराच्या हद्दीबाहेर चहूबाजूंनी ग्रामीण हद्दीत तब्बल २२ वसाहती गेल्या तीन ते चार दशकांपासून वसलेल्या आहेत. आहेत. असे असताना, या वसाहतींमधील चाकरमाने नागरिक शहराचं उसणं नागरिकत्वाचाच अवसान घेऊन आपले अडगळीतील जीवन व्यतित करीत आहेत. शहरातील रस्ते, पाणी, गटार व पथदिवे या किमान मूलभूत नागरी सुविधांचाही वाणवा या वसाहतांमध्ये नसल्याच्या यमयातना उभय नागरिक सोसत आहेत. न.पा.चे नागरिकत्व नाही, ना चहूबाजूंच्या महसुली सजांच्या ग्रामपंचायतचे नागरिकत्व नाही. त्यामुळे फक्त विवरे पं.स.गण व विवरे-वाघोदा जि.प.गटातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावून दोन प्रतिनिधींना आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची नाहक हौस भागवली जात असल्याची गंभीर वास्तवता आहे.या पार्श्वभूमीवर गत तीन ते चार दशकांपासून रावेर न.पा.ने नगरविकास मंत्रालयात प्रस्तावित केलेला शहर हद्दवाढीचा प्रस्ताव मंत्रालयाच्या आगीत भस्मसात झाला होता. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी रावेरच्या हद्दीबाहेरील वसाहतींचे प्रत्यक्ष स्थळनिरीक्षण करून नवीन शहर हद्दवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी या प्रस्तावाचेही भिजत घोंगडे पडल्याने उभय वसाहतीतील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून महसुली गावाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी चळवळ उभी केली.लोकाभिमुख प्रशासनाची पावती देत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी तत्संबंधी थेट रावेरला प्रत्यक्ष भेट देऊन हद्दीबाहेरील ग्रामीण वसाहतींची पाहणी करून उभय नागरिकांची व नगरपालिका प्रशासनाची बाजू ऐकून घेत वास्तविकता तपासून पाहिली. त्याअनुषंगाने त्यांनी शहरात अकृषक रोजगाराची संख्या ४५ टक्के असल्याचे स्पष्ट करून महसूली क्षेत्र समाविष्ट करून शहर हद्दवाढीचा प्रस्ताव सन २०१४ मध्ये प्रस्तावित करण्यात आल्याने स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून महसुली गावाचा दर्जा देण्याची मागणी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी मार्च २०१८ च्या आदेशानुसार निकाली काढली होती.दरम्यान, शासनाच्या धोरणात्मक निर्णयान्वये शहराच्या क्षेत्रफळाच्या दुप्पटीने अर्थात चार चौरस कि.मी. क्षेत्रफळाचा पुनर्रचित शहर हद्दवाढीचा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. तथापि, त्या प्रस्तावांतर्गत काही कृषी क्षेत्राचाही असलेला समावेश नगरविकास मंत्रालयाने अमान्य केल्याने न.पा. करास पात्र असलेल्या क्षेत्राचाच अंतर्भाव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सदर त्रुटींची पूर्तता करून पुन्हा नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती न.पा.मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली.सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी शहरहद्दवाढीचे डोहाळेरावेर शहर हद्दवाढीचा चार चौरस कि.मी. क्षेत्रफळाचा पुनर्रचित प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. आता त्रुटींची पूर्तताही करून बहुतांश वसाहतींचा शहर हद्दवाढीसाठीत समाविष्ट करण्याबाबत न.पा.चा कसोशीने प्रयत्न आहे. तत्संबंधी, आगामी लोकसभा वा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतल्यास शहरहद्दवाढीचा प्रश्न धसास लागू शकतो, असा अंदाज मुख्याधिकारी लांडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शहर हद्दीबाहेरील रहिवाशांना सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी शहर हद्दवाढीचे डोहाळे लागले आहेत. जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचे निकटचे मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी राजकीय इच्छाशक्ती दृढ करून उभय वंचित रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, असा जनमानसातून सूर व्यक्त होत आहे.