शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

हीच गती राहिली तर कोरोना लसीकरण पूर्ण व्हायला लागतील ३६ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST

जळगाव : २०२० मध्ये कहर केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग जिल्ह्यात सद्यस्थितीत अत्यंत कमी आहे. लसीकरणाला ...

जळगाव : २०२० मध्ये कहर केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग जिल्ह्यात सद्यस्थितीत अत्यंत कमी आहे. लसीकरणाला ३५ दिवस उलटले असून जिल्ह्यातील केवळ ०.२५ टक्के लोकसंख्या यात कव्हर झालेली आहे. जिल्ह्यात याच गतीने सर्वांना लस द्यायचे म्हटल्यास ३६ वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात शासकीय यंत्रणा कमी पडत असल्याने आता खासगी यंत्रणांचा सहभाग वाढविणे क्रमप्राप्त असून तसा पर्याय विचाराधीन असू शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यातही १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातील २४ हजार ३०० डोस प्राप्त झाले होते. त्यामुळे केंद्र कमी ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर १९ हजार डोस प्राप्त झाल्याने केंद्र वाढविण्यात आले. पहिला टप्पा काही अंशी आटोपण्याचे चित्र असताना लागलीच महसूल व पोलीस प्रशासनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.

अशी स्थिती असे भवितव्य

लसीकरणाला झाले : ३५ दिवस

एकूण लसीकरण : ११६६३

एकूण लोकसंख्या : २०११च्या जनगणनेनुसार ४२२४४४२ (२०२१ मध्ये अंदाजित वाढ होऊन ४५०००००)

लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाची टक्केवारी : ०.२५ टक्के

जिल्ह्यातील केंद्र : १८

उदिष्ट : ३६०० प्रतिदिवस

प्रत्यक्ष लसीकरण : सरासरी ८०० प्रतिदिवस

समजा २५ टक्के लोकांनी लस घेतली नाही तरीही ७५ टक्के लोकसंख्येला लस देण्यासाठी २६ वर्षे लागतील.

कोट

कोरोना लसीकरणासाठी येणाऱ्या लसीचे डोस यांची उपलब्धता यानुसार टप्प्याटप्प्याने केंद्राची संख्या वाढवून प्रत्येक उपकेंद्र, तसेच शक्य झाले तर गावागावात लसीकरण केले जाईल. दिवसाला किमान ५० हजार लोकसंख्येला लस दिली जाईल, असेही नियोजन होऊ शकते आणि शंभर दिवसात जिल्ह्यात लसीकरण पूर्ण होऊ शकते. यात खासगी यंत्रणांना सहभागी करून घेता येऊ शकते, मार्गदर्शक सूचनानुसार तसा निर्णयही घेण्यात येईल.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सद्यस्थितीत जळगाव शहरात आधीच खासगी यंत्रणांची केंद्रे सुरू आहेत. तांत्रिक अडचणी दूर करून नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरणाची मोहीम राबविणे आवश्यक आहे. यावर संपूर्णत: सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे खासगी यंत्रणेची भूमिका नाही. एका दिवसात शंभर लोकांना एसएमएस पाठविण्याऐवजी दीडशे लोकांना पाठवावे, याने अधिक लोक येऊ शकतात.

- डॉ. स्नेहल फेगडे, सचिव, आयएमए

कुठे ५ तर कुठे ७ जणांचे लसीकरण

लसीकरणाचा वेग अत्यंत थंडावल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून काही केंद्रांवर आहे. यात पारोळा, पाचोरा, एरंडोल येथील केंद्रांवर तर दिवसभरात केवळ ५ किंवा ७ लोकांचे लसीकरण होत आहे. यंत्रणा मात्र, तेवढीच कामाला लागली आहे. त्यामुळे हा वेग वाढविणे, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, केंद्र वाढविणे आदी बाबींवर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे.