शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातपुड्यात आढळली दुर्मिळ जाथारी किटकभक्षी वनस्पती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:31 IST

जळगावच्या डॉ.तन्वीर खान यांना यश

ठळक मुद्देदेशभरात केवळ ३५ प्रजाती असल्याचा दावा‘इंडियन फॉरेस्टर’ साठी शोध निबंध पाठविला

अजय पाटीलजळगाव - खान्देशातील सातपुडा पर्वतरांग ही जैवविविधतेने नटलेली आहे. या पर्वतरांगेत आतापर्यंत अनेक दुर्मिळ वनस्पती आढळून आल्या आहेत. एच.जे.थीम महाविद्यालयातील प्राध्यापक, वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान यांनी नुकतीच जाथारी नामक दुर्मिळ किटकभक्षी वनस्पती नंदुरबार जिल्ह्णातील तोरणमाळ तसेच डाब या भागात आढळून आली आहे.जाथीरा ही अत्यंत दुर्मिळ किटकभक्षी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘युट्रीक्युलाररीया जनार्थनामी’ असे आहे. डॉ.तन्वीर खान यांनी सांगितले की, भारतात या वनस्पतीच्या केवळ ३५ प्रजाती आहेत. त्या देखील आता नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. ३५पैकी २२ प्रजाती या महाराष्टÑात आढळून येतात. कासच्या पठारावर सर्वाधिक नोंद होते. सातपुड्यात या वनस्पतीचा आतापर्यंत शोध घेण्यात आलेला नव्हता. पुणे विद्यापीठाचे डॉ.मिलिंद सरदेसाई यांनी या प्रजातीची सर्व प्रथम नोंद २००० मध्ये पश्चिम घाटात केली होती. डॉ.तन्वीर खान हे सातपुड्यात अभ्यासासाठी गेले असता त्यांना ही वनस्पती आढळून आली.‘इंडियन फॉरेस्टर’ साठी शोध निबंध पाठविलाडॉ.खान यांनी डॉ. सरदेसाई यांच्याकडून या वनस्पतीची खात्री करून घेतली. त्यानंतर डॉ.खान यांनी या वनस्पतीवर तयार केलेला शोधनिबंध ‘इंडियन फॉरेस्टर’ या विज्ञान पत्रिकेला पाठविला आहे. यासाठी डॉ.विनोद कुमार गोसावी व अजहर शेख यांचे सहकार्य डॉ.खान यांना लाभले.काय आहे, या वनस्पतीचे वैशिष्ट्य?जाथीरा या वनस्पतीला आकर्षक निळे फुल असते. या वनस्पतीच्या तळाशी एक पिशवी असते. किटकांना त्यामध्ये भक्ष करून या वनस्पतीची वाढ होत असते. पर्वत उताराच्या पानथळ जागा तसेच पर्वतांवरील पाणी साचलेल्या जागेवर ही वनस्पती आढळून येते. डॉ.तन्वीर खान यांनी आतापर्यंत सातपुड्यातील अनेक दुर्मिळ वनस्पतींचा शोध घेतला आहे. तसेच नामशेष होत जाणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी ते अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.जाथीरा या वनस्पतीसह सातपुड्यातील इतर दुर्मिळ वनस्पतीच्या संवर्धनासाठी जंगलांवर प्रेम करणाºया नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. वनस्पतींचे अस्तित्व कायम राहण्यासाठी प्रशासनाकडून विशेष संवर्धन मोहीम राबविण्याची गरज आहे.-डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक

टॅग्स :forestजंगलJalgaonजळगाव