शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवे यांचा पराभव केल्याशिवाय केसांचा भांग पाडणार नाही : माजी मंत्री अब्दुल सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:34 IST

प्रत्येकाने आयुष्यात संकल्प केला पाहिजे. केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रबळ आत्मविश्वास आणि मेहनत आवश्यक आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाख मतांनी पराभूत केल्याशिवाय आपण भांग पाडणार नाही असा संकल्प केल्याची माहिती माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जळगाव शहर काँग्रेसच्या मेळाव्यात दिली.

ठळक मुद्देजळगावात शहर काँग्रेसच्या मेळाव्यात प्रतिपादनकाँग्रेस कार्यकर्त्यांना दिले बळ

जळगाव : प्रत्येकाने आयुष्यात संकल्प केला पाहिजे. केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रबळ आत्मविश्वास आणि मेहनत आवश्यक आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाख मतांनी पराभूत केल्याशिवाय आपण भांग पाडणार नाही असा संकल्प केल्याची माहिती माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जळगाव शहर काँग्रेसच्या मेळाव्यात दिली.काँग्रेस भवनात शुक्रवारी दुपारी ३ वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जळगावातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी भाजपाकडे देशात केवळ दोन खासदार होते. भाजपाचे नेते ज्यावेळी गावात जायचे त्यावेळी त्यांना कार्यकर्ते मिळायचे नाही. मात्र त्यांनी आम्ही सत्तेवर येणार असा संकल्प त्यांनी केला आणि ते सत्तेत आले. तसाच संकल्प मी देखील केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाख मतांनी पराभूत करीत नाही तोपर्यंत केसांचा भांग पाडणार नाही असा संकल्प केल्याची माहिती त्यांनी दिली. मी केलेला संकल्प आणि २०१९ मध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे त्यांनी सांगितले.सर्वाधिक मराठा मतदार असलेल्या सिल्लोड मतदार संघासाठी ज्यावेळी मी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली. त्यावेळी काही लोक हसले होते. मात्र स्वत:चा आत्मविश्वास कायम ठेवत निवडणूक लढलो आणि काही मतांनी पराभूत झालो. नंतर ज्यांनी तिकिट नाकारले त्यांनी मला उमेदवारी दिली आणि आमदार झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगावcongressकाँग्रेस