शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

खान्देशात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:29 IST

पूर ओसरले : उघडीपमुळे मिळाला दिलासा

जळगाव/ धुळे/ नंदुरबार : खान्देशात सुमारे आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विश्रांती घेतल्याने पूर ओसरले आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर सूर्यदर्शनही झाले. यामुळे सर्वाना दिलासा मिळाला असून नुकसानीच्या पंचनाम्यांचे कामही सुरु झाले आहे.नंदुरबार जिल्ह्यात मृतांची संख्या तीननंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीने शेकडो हेक्टर शेती आणि ५०० पेक्षा अधिक घरांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री चिखली, ता.धडगाव येथील नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने गणेश राजेंद्र पाडवी (वय ४) याचा मृत्यू झाला. यामुळे पावसाच्या थैमानातील मृतांची संख्या तीन झाली आहे. याशिवाय सहा जनावरे आणि ३० मेंढ्या मरण पावल्या आहेत.साक्रीच्या एकाचा मृतदेह आढळलाधुळे जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला असून शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला. तसेच आठवडाभरानंतर सूर्यदर्शन झाले. पाऊस थांबल्याने विसर्ग कमी करण्यात आल्याने पांझरा, बुराई, अरुणावती आदी नद्यांचा पूर ओसरला आहे. पुरात वाहून गेलेल्यांपैकी शिरपूर येथील रशीद जमशेर मेहतर (५०) यांचा मृतदेह सापडला. तर सामोडे, ता.साक्री येथील गुलाब पांडुरंग घरटे (५७) यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनातर्फे सुरूच आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून या कामास गती दिल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.मुक्ताईनगरला सर्वाधिक तर चाळीसगावला सर्वात कमी पाऊसजळगाव जिल्ह्यात शनिवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतीकामांची लगबग सुरु झाली असून शनिवारी शहरातील नागरिकांनी सकाळी काही वेळ उन दुपारी पाऊस आणि सावली असा श्रावणाचा अनुभव घेतला. शुक्रवारी जिल्ह्यात पावसाने पासष्टी गाठली आहे़ जिल्हयात सर्वाधिक पाऊस मुक्ताईनगर ७७़ ५ टक्के येथे नोंदविण्यात आला. यावल ७५़५ टक्के, जामनेर ७४़३ टक्के, भुसावळ ७१़ ८, रावेर ७०़१ तर सर्वात कमी पावसाची नोंद ४९ टक्के इतकी चाळीसगाव तालुक्यात झाली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पंचनामे सुरु झाले असून जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या चारपैकी अमळनेर तालुक्यात पंचनाम्यांची प्रतीक्षाच आहे. गुरुवारी अमळनेर, चोपडा, यावल व धरणगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली.