शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
2
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
3
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
4
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
5
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
6
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
7
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
8
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
9
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
10
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
11
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
12
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
13
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
15
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
16
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
17
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
18
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
19
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
20
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...

पावसाने पाच तालुक्यात ओलांडली ५० टक्क्यांची सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:53 IST

पावसाची जोरदार हजेरी : मात्र अद्यापही ७ मध्यम प्रकल्पात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा

जळगाव : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावूनही पावसाने सलग व जोरदार हजेरी लावत मागील वर्षीची आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरीही अद्यापही जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.५ तालुक्यांनी ओलांडली सरासरीची पन्नाशीमागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात सरासरी ३८.९ मिमी पाऊस झाला होता. मात्र यंदा पावसाचे आगमन उशीरा होऊनही जोरदार हजेरी लावल्याने पावसाने ही सरासरी ओलांडली असून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४७.४ टक्के पाऊस झाला आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ६५.४ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस या तालुक्यात झाला होता. तर एरंडोल ५३.४ टक्के, भुसावळ ५१.२, मुक्ताईनगर ५७.०० टक्के तर पाचोरा तालुक्यात ५०.२ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यात ३९ टक्क्यांच्यावर पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ४२.९ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी केवळ ३६.६ टक्के पाऊस झाला होता.एकाच दिवसांत २५ मिमी पाऊसजळगाव तालुक्यात शनिवारी दिवसभर व रात्रीतून २४.९ मिमी पाऊस झाला. तर धरणगावला ३१.१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १० मिमी पाऊस एका दिवसांत झाला. मात्र चाळीसगाव, बोदवड तालुका मात्र काल कोरडा होता.मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकटमात्र दुसरीकडे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र बिकट आहे. १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यात बहुळा मध्ये ०.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड या धरणांमध्ये आजही शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उर्वरीत प्रकल्पांमध्ये सरासरी १८.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर ९६ लघु प्रकल्पांमध्ये ७.९७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.मोठ्या प्रकल्पांमध्ये वाढतोय पाणीसाठाहतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांवर जिल्ह्यातील अनेक शहरांसह गावांचाही पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा मे अखेरीस शून्य टक्क्यांवर पोहोचला होता. तर वाघूरमध्ये जेमतेम ९ टक्के पाणीसाठा उरला होता. मात्र या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे या मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे हतनूरमध्यये १९.१४ टक्के, गिरणा १२.८२ टक्के तर वाघूरमध्ये २९.८६ टक्के असा एकूण सरासरी १८.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर दूर झाले आहे.पावसामुळे पिकांना फायदागेल्या आठवडाभरापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना फायदाच होणार आहे. मात्र शेतात पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यावी. अन्यथा पिक पिवळे पडण्याची भिती आहे. त्यामुळे पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कपाशी लागवडीला जेमतेम महिना-दीड महिना झाला आहे. तसेच उडीद-मूगही वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्यावरील कीड पावसामुळे वाहून जाणार असल्याचे सांगितले.गिरणाच्या साठ्यात वाढीने दिलासादापोरा, ता. जळगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे व एरंडोल उपविभागाचे उपभियंता एम.आर. अत्तरदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गिरणा धरणाचे उगम क्षेत्रात कसमा पट्ट्यातील कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने गिरणा धरणावरील चणकापूर ६९ टक्के, अर्जुनसागर (पूनंद) ६९ टक्के, हरणबारी १०० टक्के, केळझर ६० टक्के, माणिकपुंज या सारख्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. २५००० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सोमवारी सकाळी सहावाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा २० टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव