शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

खान्देशातील १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 21:47 IST

नद्यांना पूर : ३ ठार तर अन्य दोघे पुरात बेपत्ता, अनेक मार्ग झाले ठप्प, घरांची पडझड

जळगाव : गेल्या दोन- तीन दिवसांमध्ये खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. २५ पैकी १४ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदी व नाल्यांना पूर आला असून या थैमानात एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २ जणांना पुरात जलसमाधी मिळाली तर एका महिलेचा भिंत पडून मृत्यू झाला. अन्य दोघे पुरात बेपत्ता झाले आहेत.पावसाने विशेषत: धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तर हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर या सर्व ६ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातही सर्व चार तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यांचा समावेश आहे, तर जळगाव जिल्ह्यातील १५ पैकी धरणगाव, यावल, अमळनेर, चोपडा या ४ तालुक्यात अतिवृष्टी झाली.धुळे जिल्ह्यात दोघे वाहून गेलेधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जामखेली नदीच्या पुरात सामोडे येथे गुलाब पांडुरंग घरटे (वय ५७ वर्ष) तर शिरपुरला रशीद जमशेर मेहतर ( वय ५० वर्ष) हे अरुणावतीच्या पुरात वाहून गेले. दोघे पूर पाहण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत त्यांचा तपास लागला नाही. दरम्यान तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, कान आदी नद्यांना महापूर आला आहे. शिरपूर तालुक्यात फत्तेपूर फॉरेस्ट येथील मातीचे धरण (बंधारा) फुटल्याने त्यातील पाणी वाहून गेले. शिंदखेडा तालुक्यातील विखरण व तळवाडे मिळून ४१ घरांची पडझड झाली असून या दोन्ही गावांचा संपर्क तुटला. तेथील १०० तर सावळदे व वडदे येथील ५० अशा एकूण दीडशे जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.नंदुरबार जिल्ह्यात २ ठारजिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने संपुर्ण जिल्हा पाण्याखाली गेला आहे. रायखेड येथे भिंत पडून कालाबाई रायसिंग भिल (३५) या महिलेचा मृत्यू झाला. मौलीपाडा येथील नदीच्या पुरात लिलाबाई विजयसिंग पाडवी (५५) ही महिला वाहून गेली. तर रायखेड येथे भिंत पडल्याने कोपऱ्या विजयसिंग वसावे हा युवक जखमी झाला. अनेक भागात पूल तुटले असून जनजीवन ठप्प झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शुक्रवारी दुपारपर्यंत कायम होता. सर्वच नदी, नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे रस्ते, फरशीपूल वाहून गेले आहेत. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी शहादा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. शहादा शहर, वैजाली, डामरखेडा, आवगे, जुनवणे आणि शहादा तालुक्यातील इतर तालुक्यातील जवळपास २०० कुटूंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. ४०० पेक्षा अधीक घरांची पडझड झाली आहे.जळगाव जिल्ह्यात कळमसरे येथे पाण्याचा वेढागेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जामनेर येथे कांग नदीला आलेल्या पुरात वाहून समाधान सीताराम काळे (वय ६०, रा.जामनेर पुरा) यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. अमळनेर तालुक्यात तीन गावांमध्ये पुुलामुळे धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले असून कळमसरे गावास पाण्याचा वेढा पडला आहे. मुडी- वालखेडा पूल वाहून गेला आहे. बेटावद व सावखेडा पुलालाही पावसाच्या पाण्याचा धोका आहे. यामुळे या ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. तहसीलदारांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर केली आहे. जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आदींना गावातच थांबण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चोपडा तालुक्यातील धानोरा येथे पावसामुळे भिंत कोसळली. मात्र नशिब बलवत्तर म्हणून घरात असलेले आई व दोन मुले बचावले.