शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने फिरवली पाठ; उकाड्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST

भुसावळ : जिल्ह्यासह राज्यांमध्ये हाहाकार माजवल्यानंतर आता मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यातच कमाल व किमान तापमानात ...

भुसावळ : जिल्ह्यासह राज्यांमध्ये हाहाकार माजवल्यानंतर आता मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यातच कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

दरवर्षीपेक्षा यंदा पावसाची सुरुवात चांगली झाली. त्यामुळे मे व जून महिना हा फारसा तापदायक गेला नाही. लवकर पाऊस आल्याने उन्हाळासुद्धा लवकर संपला, अशी परिस्थिती होती. मात्र मागील काही दिवसांपासून फक्त भुसावळच नव्हे, तर राज्यातील इतर जिल्ह्यांतही पाऊस नसल्यामुळे पुन्हा उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाची शक्यता खूप कमी आहे.

सकाळी दहापासून बसताहेत चटके

सकाळचे वातावरण हे चांगले असताना सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होत आहे. दुपारी साडेचारपर्यंत उन्हाचा त्रास सुरूच असतो. सायंकाळी पाचनंतर तापमानात घट व्हायला सुरुवात होत आहे. घरात उकाडा जाणवत असल्यामुळे पुन्हा एकदा कूलर आणि एसीचा वापर वाढला आहे.

मागील पाच दिवसांतील तापमान...

दिनांक आणि तापमान

५ ऑगस्ट ३२.५

६ ऑगस्ट ३३.३

७ ऑगस्ट ३४.५

८ ऑगस्ट ३३.७

९ ऑगस्ट ३४

गुरुवारपर्यंत खास पाऊस नाही. मात्र ११ व १२ दरम्यान विविध ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. कोरड्या हवामानामुळे उष्णता वाढली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.