शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीनला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:04 IST

तळेगाव तांड्यात वीज पडून महिला ठार

जळगाव : जिल्ह्यात अनेक भागांमध्ये शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस व सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. देशातून १४ आॅक्टोबर रोजी मान्सून परतल्यानंतर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे अवकाळी पाऊस झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शुक्रवारी दुपारी दुपारी ३ वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यानंतर ढगाळ वातावरण देखील कायम होते. सध्या शेतशिवारांमध्ये कापूस वेचणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, शुक्रवारी दुपारून सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह मजूर वर्गाची चांगलीच धावपळ उडाली.शेतात काम करीत असताना पडली वीजचाळीसगाव तालुक्यातील तळेगाव तांडा येथे वीज पडून कौशल्याबाई चव्हाण (५०) ही महिला ठार झाली. तर पाचोरा तालुक्यातील कुºहाड खुर्द येथे भिंत पडून निर्मलाबाई दगडू माळी (वय ४०) ही महिला जखमी झाली.बोदवडसह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत संततधार लावली.या अवकाळी पावसाने ज्वारी पीक काळे पडून कापूस, मका, इतर पिकांना ही नुकसान कारक ठरणार आहे, तर गहू हरभरा या पिकाला फायदेशीर ठरणार आहे.जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी, तोंडापूर, पहूर, नेरी येथे पावसाने हजेरी लावली. पहूरला पावसाने कपाशी व मका पिकांचे नुकसान झाले. खेडी, कढोली ता. एरंडोलला रिपरिप पाऊस झाला. आॅक्टोबर हिटपासून थोडासा दिलासा मिळाला.अरबी सुमद्रालगत कमी दाबाचा पट्टा विकसीत झाल्यामुळे सध्या पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे सध्या होणारा पाऊस अवकाळीच म्हटला जाईल. पावसाची स्थिती दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर परिस्थिती बदलून वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.-शुभांगी भुत्ते, हवामान तज्ज्ञ, कुलाबा वेधशाळा

टॅग्स :Jalgaonजळगाव