शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे ट्रॅकमनचे पंतप्रधानांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 01:09 IST

रेल्वे प्रशासनातर्फे कार्यस्थळी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना रेल्वे रुळावर जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.

भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे कार्यस्थळी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना रेल्वे रुळावर जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. त्यामुळे या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅकमन कामगारांनी गांधी जयंतीपासून अभियान राबविण्यात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले जात आहे.ट्रॅकमन हा भारतीय रेल्वेतील महत्वाचा घटक आहे आणि इतर विभागांच्या तुलनेत ट्रॅकमन आपला जीव धोक्यात घालून कठोर परिश्रम करतात. भारतीय रेल्वेच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणूनच ट्रॅकमनला सन्मान देऊन, समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रेल्वे कामगार ट्रॅकमन असोसिएशनचे भुसावळ मंडल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात आतापर्यंत भुसावळ येथील तीन हजार कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे.या आहेत मागण्याजुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी. कठोर / जोखीम भत्ता ४१००- ६००० ताबडतोब लागू करावा. की मेन आणि पेट्रोलमेनच्या ड्युटीचे अंतर कमी केले पाहिजे. वैद्यकीय सुविधेत आई आणि वडील दोघांचा समावेश करावा. संरक्षक उपकरणे त्वरित वाटप करण्यात यावे. वरिष्ठ ट्रॅकमनला ४२०० ग्रेट वेतन द्यावे. मल्टि स्कील केडर पॉलिसी ट्रॅकमेनसाठीदेखील त्वरीत लागू करावी. ट्रॅकमनसाठी कोरोना वॉरियर विमा पॉलिसी प्रदान केली जावी. ग्रेड पे १८०० लेव्हल -१ पदावरील कर्मचाऱ्यांना कमीत कमी पाच वर्षे सेवा ट्रॅकमेंटनेरसाठी घ्यावे. गेटमन आणि ट्रॅकमनची ड्युटी आठ तास करावी आणि ड्युटीसाठी गणवेशासह सैनिकांसारखी सुरक्षा साधने दिली पाहिजेत.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ