शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात रेल्वे प्रवास ...नको रे बाबा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

पूर्वी रेल्वे स्थानकावर एक वेगळी लगबग दिसत होती. मात्र, कोरोना काळात रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाली व स्थानकावरील ...

पूर्वी रेल्वे स्थानकावर एक वेगळी लगबग दिसत होती. मात्र, कोरोना काळात रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाली व स्थानकावरील प्रवाशांचा राबताही अदृश्य झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना अचानक दुसरी जीवघेणी लाट आली व यातच अनेकांना आपले जीव गमवावे लागले. याचा सरळ परिणाम रेल्वेवरही झाल्याचे दिसून आले, अनेक रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनास रद्द कराव्या लागल्या. तसेच रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या नावाखाली काही गाड्या सुरू केल्या व त्याची भाडे दरवाढ ३५ टक्क्यांनी वाढवली. त्यावरूनही नाराजी आहे.

प्रवास नको रे बाबा ..

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त बिकट परिस्थिती दिसून आली. राज्यातून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आले. याचा परिणामही प्रवाशांची घटती संख्या यात दिसून आला. यातच शासनाने कडक निर्बंध लादले व पहिल्यापेक्षा कितीतरी भयंकरपटीने कोरोनाची दुसरी लाट लोकांनी अनुभवली. अति महत्त्वाच्या कामाशिवाय कोणीही इतर जिल्ह्यासह राज्यामध्ये नागरिकांनी जाणे टाळले, कोरोना काळात प्रवास नको रे बाबा म्हणत अनेकांनी झालेली रेल्वे तिकिटाची बुकिंग रद्द केली. याचा परिणाम रेल्वेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

असे जाणवताहेत परिणाम

११ ते २० एप्रिल या दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकिंग कार्यालयातील खिडकीवरून ८८० तिकीटांतून २ हजार प्रवाशांनी आपले प्रवास रद्द केले. यातून रेल्वेला ६ लाख ५० हजारांचा परतावा करावा लागला. २१ ते ३० एप्रिल दरम्यान ८८५ तिकीटांतून १ हजार ८८६ प्रवाशांनी प्रवास रद्द केले. रेल्वेला ५ लाख ६३ हजारांचा परतावा करावा लागला. १ ते १० मे दरम्यान ५१० तिकीटांतून १ हजार ३१० प्रवाशांनी प्रवास रद्द केले, यातून रेल्वेला ६ लाख ४ हजारांचा परतावा करावा लागला. ११ ते २० या दरम्यान ६५० तिकीटातून २ हजार १५० प्रवाशांनी प्रवास रद्द केले, रेल्वे प्रशासनाला ६ लाख ४७ हजार परतावा करावा लागला.

——-

ऑनलाईनवरून सुद्धा हीच स्थिती

तिकीट काऊंटर या खिडकीवरून जवळपास पन्नास दिवसांमध्ये २५ लाखांचा रेल्वे प्रशासनाला परतावा करावा लागला. हीच स्थिती ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यामुळे, त्याचाही परतावा रेल्वेला वेगळा करावा लागला. याशिवाय विविध एजंटकडूनही काढण्यात आलेले तिकिटाचे रद्दीकरण करण्यात आलेले आहे.

——

सेवाग्राम एक्सप्रेस रद्द

मुंबई- नागपूर ०२१६९ अप व डाऊन सेवाग्राम एक्सप्रेसलाही रेल्वे प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गाडीमुळे विदर्भासह खानदेशातील नागरिक मुंबईशी जोडले जात होते. तूर्तास ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे.