शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात रेल्वे प्रवास ...नको रे बाबा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

पूर्वी रेल्वे स्थानकावर एक वेगळी लगबग दिसत होती. मात्र, कोरोना काळात रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाली व स्थानकावरील ...

पूर्वी रेल्वे स्थानकावर एक वेगळी लगबग दिसत होती. मात्र, कोरोना काळात रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाली व स्थानकावरील प्रवाशांचा राबताही अदृश्य झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना अचानक दुसरी जीवघेणी लाट आली व यातच अनेकांना आपले जीव गमवावे लागले. याचा सरळ परिणाम रेल्वेवरही झाल्याचे दिसून आले, अनेक रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनास रद्द कराव्या लागल्या. तसेच रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या नावाखाली काही गाड्या सुरू केल्या व त्याची भाडे दरवाढ ३५ टक्क्यांनी वाढवली. त्यावरूनही नाराजी आहे.

प्रवास नको रे बाबा ..

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त बिकट परिस्थिती दिसून आली. राज्यातून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आले. याचा परिणामही प्रवाशांची घटती संख्या यात दिसून आला. यातच शासनाने कडक निर्बंध लादले व पहिल्यापेक्षा कितीतरी भयंकरपटीने कोरोनाची दुसरी लाट लोकांनी अनुभवली. अति महत्त्वाच्या कामाशिवाय कोणीही इतर जिल्ह्यासह राज्यामध्ये नागरिकांनी जाणे टाळले, कोरोना काळात प्रवास नको रे बाबा म्हणत अनेकांनी झालेली रेल्वे तिकिटाची बुकिंग रद्द केली. याचा परिणाम रेल्वेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

असे जाणवताहेत परिणाम

११ ते २० एप्रिल या दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकिंग कार्यालयातील खिडकीवरून ८८० तिकीटांतून २ हजार प्रवाशांनी आपले प्रवास रद्द केले. यातून रेल्वेला ६ लाख ५० हजारांचा परतावा करावा लागला. २१ ते ३० एप्रिल दरम्यान ८८५ तिकीटांतून १ हजार ८८६ प्रवाशांनी प्रवास रद्द केले. रेल्वेला ५ लाख ६३ हजारांचा परतावा करावा लागला. १ ते १० मे दरम्यान ५१० तिकीटांतून १ हजार ३१० प्रवाशांनी प्रवास रद्द केले, यातून रेल्वेला ६ लाख ४ हजारांचा परतावा करावा लागला. ११ ते २० या दरम्यान ६५० तिकीटातून २ हजार १५० प्रवाशांनी प्रवास रद्द केले, रेल्वे प्रशासनाला ६ लाख ४७ हजार परतावा करावा लागला.

——-

ऑनलाईनवरून सुद्धा हीच स्थिती

तिकीट काऊंटर या खिडकीवरून जवळपास पन्नास दिवसांमध्ये २५ लाखांचा रेल्वे प्रशासनाला परतावा करावा लागला. हीच स्थिती ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यामुळे, त्याचाही परतावा रेल्वेला वेगळा करावा लागला. याशिवाय विविध एजंटकडूनही काढण्यात आलेले तिकिटाचे रद्दीकरण करण्यात आलेले आहे.

——

सेवाग्राम एक्सप्रेस रद्द

मुंबई- नागपूर ०२१६९ अप व डाऊन सेवाग्राम एक्सप्रेसलाही रेल्वे प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गाडीमुळे विदर्भासह खानदेशातील नागरिक मुंबईशी जोडले जात होते. तूर्तास ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे.