शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

रघुनायका सारीखा स्वामी शिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:57 IST

समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून ...

समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून बसतो. भूतस्मरण, भविष्यचिंतन अन् या दोन्हीमुळे वर्तमान विस्मरण. आम्हास वर्तमानात जगताच येत नाही.खरंतर कालचा दिवस हातातून निघून गेला आहे. उद्याचा दिवस आपल्या हातात नाहीे. फक्त आणि फक्त आजचा दिवस आपल्या हाती असतो, तो आम्हास आनंदात घालवायचा आहे. परंतु आम्ही नको त्या भीतीने ग्रासलेलो असतो आणि आनंद गमावून बसतो. नसलेल्या भितीचे दोर आम्ही स्वत:च्या गळ्याभोवती बांधून घेतो ते नसलेले दोर, आम्हास सोडायचे आहे..राज्यस्थानातल्या वाळवंटात काही लोकांचा काफिला, आपल्या उंटासह रात्री मुक्कामाला थांबतो. एका उंटाला बांधण्यासाठी ठोकायला खुंटीही नसते अन् दोरही नसतो. उंटाला बांधले नाही तर तो रात्रीतून कुठेतरी निघून जाईल, या काळजीत सगळे असतात. एक वृध्द व अनुभवी व्यक्ती सांगते की, सोपा उपाय आहे. त्या उंटासाठी नसलेली खुंटी ठोका अन् नसलेला दोर त्याच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे करा. सग्ळ्यांना आश्चर्य वाटते. त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे, नसलेला खुंटा जमिनीत ठोकल्यासारखे केले जाते अन् नसलेला दोर त्या उंटाच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे केले जाते.दुसऱ्या दिवशी बाकी सगळे उंट पुढच्या प्रवासासाठी जाण्यास निघतात. परंतु हा उंट काही जागचा उठत नाही. यावर अनुभवी वृध्द व्यक्ती सांगते की, या उंटासाठी जी नसलेली खुंटी ठोकलेली आहे आणि नसलेला दोर जो त्याच्या गळ्याभोवती बांधला आहे, ती खुंटी आणि दोर सोडल्यासारखे करा. त्याप्रमाणे केले जाते. उंट ताबडतोब जागीचा उठतो आणि पुढचा प्रवास सुरु होतो.आम्हीसुध्दा भीतीचे नसलेले दोर आमच्याभोवती बांधून घेतले आहेत आणि त्यामुळे आपण शांती गमावून बसलो आहोत. आम्हालासुध्दा भीती, चिंता, काळजीचा नसलेला खुंटा आणि गळ्याभोवती बांधलेला दोर काढायचा आहे. तरच आनंदात जगता येईल. त्यासाठी सद्गुरुनाथांना शरण जायला हवे. अनिती, अधर्माने न वागता, गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करायला हवे. तरच नसलेल्या भीतीचे दोर गळ्याभोवतीचे सोडले जातील.- राया महाराज उपासनी, निजामपूरकर.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव