शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रघुनायका सारीखा स्वामी शिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:57 IST

समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून ...

समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून बसतो. भूतस्मरण, भविष्यचिंतन अन् या दोन्हीमुळे वर्तमान विस्मरण. आम्हास वर्तमानात जगताच येत नाही.खरंतर कालचा दिवस हातातून निघून गेला आहे. उद्याचा दिवस आपल्या हातात नाहीे. फक्त आणि फक्त आजचा दिवस आपल्या हाती असतो, तो आम्हास आनंदात घालवायचा आहे. परंतु आम्ही नको त्या भीतीने ग्रासलेलो असतो आणि आनंद गमावून बसतो. नसलेल्या भितीचे दोर आम्ही स्वत:च्या गळ्याभोवती बांधून घेतो ते नसलेले दोर, आम्हास सोडायचे आहे..राज्यस्थानातल्या वाळवंटात काही लोकांचा काफिला, आपल्या उंटासह रात्री मुक्कामाला थांबतो. एका उंटाला बांधण्यासाठी ठोकायला खुंटीही नसते अन् दोरही नसतो. उंटाला बांधले नाही तर तो रात्रीतून कुठेतरी निघून जाईल, या काळजीत सगळे असतात. एक वृध्द व अनुभवी व्यक्ती सांगते की, सोपा उपाय आहे. त्या उंटासाठी नसलेली खुंटी ठोका अन् नसलेला दोर त्याच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे करा. सग्ळ्यांना आश्चर्य वाटते. त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे, नसलेला खुंटा जमिनीत ठोकल्यासारखे केले जाते अन् नसलेला दोर त्या उंटाच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे केले जाते.दुसऱ्या दिवशी बाकी सगळे उंट पुढच्या प्रवासासाठी जाण्यास निघतात. परंतु हा उंट काही जागचा उठत नाही. यावर अनुभवी वृध्द व्यक्ती सांगते की, या उंटासाठी जी नसलेली खुंटी ठोकलेली आहे आणि नसलेला दोर जो त्याच्या गळ्याभोवती बांधला आहे, ती खुंटी आणि दोर सोडल्यासारखे करा. त्याप्रमाणे केले जाते. उंट ताबडतोब जागीचा उठतो आणि पुढचा प्रवास सुरु होतो.आम्हीसुध्दा भीतीचे नसलेले दोर आमच्याभोवती बांधून घेतले आहेत आणि त्यामुळे आपण शांती गमावून बसलो आहोत. आम्हालासुध्दा भीती, चिंता, काळजीचा नसलेला खुंटा आणि गळ्याभोवती बांधलेला दोर काढायचा आहे. तरच आनंदात जगता येईल. त्यासाठी सद्गुरुनाथांना शरण जायला हवे. अनिती, अधर्माने न वागता, गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करायला हवे. तरच नसलेल्या भीतीचे दोर गळ्याभोवतीचे सोडले जातील.- राया महाराज उपासनी, निजामपूरकर.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव