शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

रघुनायका सारीखा स्वामी शिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:57 IST

समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून ...

समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून बसतो. भूतस्मरण, भविष्यचिंतन अन् या दोन्हीमुळे वर्तमान विस्मरण. आम्हास वर्तमानात जगताच येत नाही.खरंतर कालचा दिवस हातातून निघून गेला आहे. उद्याचा दिवस आपल्या हातात नाहीे. फक्त आणि फक्त आजचा दिवस आपल्या हाती असतो, तो आम्हास आनंदात घालवायचा आहे. परंतु आम्ही नको त्या भीतीने ग्रासलेलो असतो आणि आनंद गमावून बसतो. नसलेल्या भितीचे दोर आम्ही स्वत:च्या गळ्याभोवती बांधून घेतो ते नसलेले दोर, आम्हास सोडायचे आहे..राज्यस्थानातल्या वाळवंटात काही लोकांचा काफिला, आपल्या उंटासह रात्री मुक्कामाला थांबतो. एका उंटाला बांधण्यासाठी ठोकायला खुंटीही नसते अन् दोरही नसतो. उंटाला बांधले नाही तर तो रात्रीतून कुठेतरी निघून जाईल, या काळजीत सगळे असतात. एक वृध्द व अनुभवी व्यक्ती सांगते की, सोपा उपाय आहे. त्या उंटासाठी नसलेली खुंटी ठोका अन् नसलेला दोर त्याच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे करा. सग्ळ्यांना आश्चर्य वाटते. त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे, नसलेला खुंटा जमिनीत ठोकल्यासारखे केले जाते अन् नसलेला दोर त्या उंटाच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे केले जाते.दुसऱ्या दिवशी बाकी सगळे उंट पुढच्या प्रवासासाठी जाण्यास निघतात. परंतु हा उंट काही जागचा उठत नाही. यावर अनुभवी वृध्द व्यक्ती सांगते की, या उंटासाठी जी नसलेली खुंटी ठोकलेली आहे आणि नसलेला दोर जो त्याच्या गळ्याभोवती बांधला आहे, ती खुंटी आणि दोर सोडल्यासारखे करा. त्याप्रमाणे केले जाते. उंट ताबडतोब जागीचा उठतो आणि पुढचा प्रवास सुरु होतो.आम्हीसुध्दा भीतीचे नसलेले दोर आमच्याभोवती बांधून घेतले आहेत आणि त्यामुळे आपण शांती गमावून बसलो आहोत. आम्हालासुध्दा भीती, चिंता, काळजीचा नसलेला खुंटा आणि गळ्याभोवती बांधलेला दोर काढायचा आहे. तरच आनंदात जगता येईल. त्यासाठी सद्गुरुनाथांना शरण जायला हवे. अनिती, अधर्माने न वागता, गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करायला हवे. तरच नसलेल्या भीतीचे दोर गळ्याभोवतीचे सोडले जातील.- राया महाराज उपासनी, निजामपूरकर.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव