शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

कार्यालयात बसू नका, गोठ्यांत फिरा; राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना सुनावले

By आकाश नेवे | Updated: September 8, 2022 19:58 IST

सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव : सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. मात्र पाहणी दौऱ्यानंतर लक्षात आले की अधिकारी आकडेवारी देण्यासाठी कार्यालयातच बसून असतात. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन पाहणी करावी आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशा शब्दांत राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कानउघडणी केली. नियोजन भवनात पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला जळगाव, धुळे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देखील केल्या. या बैठकीला आमदार एकनाथ खडसे, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, आमदार अनिल पाटील, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया आणि महापालिका आयुक्त विद्या गायकवाड उपस्थित होते.

दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी सुरूवातीलाच जिल्ह्यात फक्त १२ पेक्षा जास्त जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला असूनही आकडा कमी असल्याचा दावा केला. त्यावर नंतर बोलतांना माजी मंत्री एकनाथ खड़से यांनीही दुजोरा दिला. खडसे यांनी सांगितले की, एकट्या न्हावी गावात १२ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आकडा योग्य वाटत नाही. तर खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यात जनावरांच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी शासनाच्या योजना एकत्रित करून त्याची मदत पुरवण्याची सुचना केली.

लोकप्रतिनिधींच्या या सुचनानंतर बोलताना विखे पाटील म्हणाले की, सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामे तातडीने करणार. तसेच जनावरांचे लसीकरणही केले जाईल. शेतकऱ्यांना त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल. औषधेही शासनाकडूनच दिली जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून आकडेवारी टाकत बसू नये, तातडीने पंचनामे करावेत तसेच उणिवा दूर केल्या जाव्यात. जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. काही काळासाठी जनावरांची आंतर तालुका वाहतुकही बंद करण्यात आली आहे. जनावरांच्या विम्याबाबतही विचार केला जाईल. शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये दिले जाणार आहेत. उर्वरीत आणखी मदत करण्याचा विचार केला जाईल. तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या कामावर असमाधानी आहोत. अधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल देण्यासाठी इतरांना बसवावे, अधिकाऱ्यांनी फिल्डवर गेलेच पाहिजे., अशा शब्दात त्यांनी ठणकावले.

नैसर्गिक आपत्ती घोषित करा - खडसेराज्यात लम्पी या आजाराला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ३५ हजार रुपये मदत मिळु शकते. तसेच न्हावीला जनावरे पुरण्यासाठी शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागत आहे. त्यामुळे लम्पीने मृत झालेल्या जनावरांना पुरण्यासाठी तातडीने जिल्हा प्रशासनाने मदत करावी, असेही खडसे यांनी सांगितले. जळगावला पशु वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्याकडेही तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलeknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगाव