शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात बसू नका, गोठ्यांत फिरा; राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना सुनावले

By आकाश नेवे | Updated: September 8, 2022 19:58 IST

सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव : सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. मात्र पाहणी दौऱ्यानंतर लक्षात आले की अधिकारी आकडेवारी देण्यासाठी कार्यालयातच बसून असतात. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन पाहणी करावी आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशा शब्दांत राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कानउघडणी केली. नियोजन भवनात पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला जळगाव, धुळे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देखील केल्या. या बैठकीला आमदार एकनाथ खडसे, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, आमदार अनिल पाटील, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया आणि महापालिका आयुक्त विद्या गायकवाड उपस्थित होते.

दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी सुरूवातीलाच जिल्ह्यात फक्त १२ पेक्षा जास्त जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला असूनही आकडा कमी असल्याचा दावा केला. त्यावर नंतर बोलतांना माजी मंत्री एकनाथ खड़से यांनीही दुजोरा दिला. खडसे यांनी सांगितले की, एकट्या न्हावी गावात १२ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आकडा योग्य वाटत नाही. तर खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यात जनावरांच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी शासनाच्या योजना एकत्रित करून त्याची मदत पुरवण्याची सुचना केली.

लोकप्रतिनिधींच्या या सुचनानंतर बोलताना विखे पाटील म्हणाले की, सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामे तातडीने करणार. तसेच जनावरांचे लसीकरणही केले जाईल. शेतकऱ्यांना त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल. औषधेही शासनाकडूनच दिली जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून आकडेवारी टाकत बसू नये, तातडीने पंचनामे करावेत तसेच उणिवा दूर केल्या जाव्यात. जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. काही काळासाठी जनावरांची आंतर तालुका वाहतुकही बंद करण्यात आली आहे. जनावरांच्या विम्याबाबतही विचार केला जाईल. शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये दिले जाणार आहेत. उर्वरीत आणखी मदत करण्याचा विचार केला जाईल. तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या कामावर असमाधानी आहोत. अधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल देण्यासाठी इतरांना बसवावे, अधिकाऱ्यांनी फिल्डवर गेलेच पाहिजे., अशा शब्दात त्यांनी ठणकावले.

नैसर्गिक आपत्ती घोषित करा - खडसेराज्यात लम्पी या आजाराला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ३५ हजार रुपये मदत मिळु शकते. तसेच न्हावीला जनावरे पुरण्यासाठी शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागत आहे. त्यामुळे लम्पीने मृत झालेल्या जनावरांना पुरण्यासाठी तातडीने जिल्हा प्रशासनाने मदत करावी, असेही खडसे यांनी सांगितले. जळगावला पशु वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्याकडेही तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलeknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगाव