शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कार्यालयात बसू नका, गोठ्यांत फिरा; राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना सुनावले

By आकाश नेवे | Updated: September 8, 2022 19:58 IST

सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव : सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. मात्र पाहणी दौऱ्यानंतर लक्षात आले की अधिकारी आकडेवारी देण्यासाठी कार्यालयातच बसून असतात. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन पाहणी करावी आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशा शब्दांत राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कानउघडणी केली. नियोजन भवनात पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला जळगाव, धुळे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देखील केल्या. या बैठकीला आमदार एकनाथ खडसे, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, आमदार अनिल पाटील, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया आणि महापालिका आयुक्त विद्या गायकवाड उपस्थित होते.

दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी सुरूवातीलाच जिल्ह्यात फक्त १२ पेक्षा जास्त जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला असूनही आकडा कमी असल्याचा दावा केला. त्यावर नंतर बोलतांना माजी मंत्री एकनाथ खड़से यांनीही दुजोरा दिला. खडसे यांनी सांगितले की, एकट्या न्हावी गावात १२ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आकडा योग्य वाटत नाही. तर खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यात जनावरांच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी शासनाच्या योजना एकत्रित करून त्याची मदत पुरवण्याची सुचना केली.

लोकप्रतिनिधींच्या या सुचनानंतर बोलताना विखे पाटील म्हणाले की, सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामे तातडीने करणार. तसेच जनावरांचे लसीकरणही केले जाईल. शेतकऱ्यांना त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल. औषधेही शासनाकडूनच दिली जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून आकडेवारी टाकत बसू नये, तातडीने पंचनामे करावेत तसेच उणिवा दूर केल्या जाव्यात. जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. काही काळासाठी जनावरांची आंतर तालुका वाहतुकही बंद करण्यात आली आहे. जनावरांच्या विम्याबाबतही विचार केला जाईल. शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये दिले जाणार आहेत. उर्वरीत आणखी मदत करण्याचा विचार केला जाईल. तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या कामावर असमाधानी आहोत. अधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल देण्यासाठी इतरांना बसवावे, अधिकाऱ्यांनी फिल्डवर गेलेच पाहिजे., अशा शब्दात त्यांनी ठणकावले.

नैसर्गिक आपत्ती घोषित करा - खडसेराज्यात लम्पी या आजाराला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ३५ हजार रुपये मदत मिळु शकते. तसेच न्हावीला जनावरे पुरण्यासाठी शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागत आहे. त्यामुळे लम्पीने मृत झालेल्या जनावरांना पुरण्यासाठी तातडीने जिल्हा प्रशासनाने मदत करावी, असेही खडसे यांनी सांगितले. जळगावला पशु वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्याकडेही तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलeknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगाव