शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

जळगावातील समांतर रस्त्याचा प्रश्न : ‘नही’च्या एककल्ली कारभारामुळे असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:26 IST

माहिती ठेवली जातेय गोपनीय

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींकडून श्रेयाच्या नादात चुकीची माहिती

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआर मंजुरीच्या प्रक्रियेबाबत सातत्याने सुरू असलेला घोळ व त्यातच ‘नही’कडून (राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणकडून) सुरू असलेला एककल्ली कारभारामुळे जनमानसात विनाकारण असंतोष पसरत आहे. ‘नही’ने लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतलेले नसल्याने लोकप्रतिनिधींकडूनही श्रेय घेण्याच्या नादात चुकीची माहिती पसरविली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या चुुकीमुळेच गोपनीय पत्र उघड होऊन या समांतर रस्त्याच्या ‘डीपीआर’चा अजूनही घोळ सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘डीपीआर’मध्ये तीनवेळा बदलगेल्या काही वर्षांपासून या समांतर रस्त्यांचे काम डीपीआर मंजुरीच्या घोळातच अडकले आहे. एखाद्या कामासाठी तीन-तीन वेळा डीपीआरमध्ये बदल करीत वर्षानुवर्ष कसे घालविले जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शहरातून जाणारा हा महामार्ग अत्यंत धोकादायक बनला असून निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना ‘नही’कडून कासवगतीने काम सुरु असल्याचे यावरुन स्पष्ट दिसते.कधीपर्यंत कागदपत्रे रंगविणार?१३९ कोटींच्या डीपीआरला मंजुरी अंतीम टप्प्यात असताना ‘नही’च्या मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रीक) यांनी जळगावला भेट देऊन तपासणी (इन्स्पेक्शन) केले. त्यात त्यांनी डीपीआरमध्ये बदल सुचविले. त्यामुळे पुन्हा सुधारीत डीपीआर करून तो आधी नागपूर कार्यालय व व तेथून दिल्ली मुख्यालयात पाठविण्यात आला. त्यानंतरही मुख्य महाव्यस्थापकांनी सांगितलेल्या मुद्यांपैकी काही मुद्यांचा समावेश नसल्याने त्या मुद्यांचा समावेश करून सुधारीत अहवाल १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचना नागपूर विभागीय कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. ती पूर्तता झाल्यानंतरच अंतीम मंजुरी मिळेपर्यंतच्या काळात निविदा मागविण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्या निविदा मंजुरी या डीपीआरच्या अंतीम मंजुरीनंतरच होणार आहे. तेच पत्र खासदार ए.टी. पाटील यांनी प्रसिद्धीस देत डीपीआर मंजुर झाल्याचा आभास निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तसेच सोशल मिडियावर स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, नही कधीपर्यंत कागदपत्रांचा हा खेळ सुरु ठेवले? असा प्रश्न आहे.‘नही’च्या अधिकाºयांपुढे लोकप्रतिनिधींचेही काही चालेना...या सर्व घोळातून एक बाब स्पष्ट झाली आहे की, भाजपाच्या लोकप्रतिनिधी, राज्यातील, केंद्रातील मंत्री यांचेही ‘नही’च्या अधिकाºयांपुढे काहीच चालत नाही. ‘नही’च्या अधिकाºयांना त्यांना अपेक्षित असल्यानुसारच डीपीआर करून हवा आहे. हा समांतर रस्ता करताना सर्वच समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य तसेच स्थानिक संबंधीत विभाग, रेल्वे यांच्याशी समन्वय साधून त्यांची मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे, दिरंगाई टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने हे काम करण्याचेही नहीच्या प्रशासनाने सूचित केले आहे.पहिल्या टप्प्यात अंडरपास व चौकांची कामे, रस्ता रूंदीकरण, त्यानंतर रेल्वे व इतर अ‍ॅथॉरिटी आल्यानंतर रस्ता रूंदीकरणाच्या संदर्भात कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य महाव्यवस्थापक अतुल कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार काम होण्यासंदर्भात २९ आॅगस्ट २०१८ रोजी जळगाव ‘नही’ कार्यालयाने नकाशे व अंदाजपत्रक सादर केले. मात्र ते अचूक व बरोबर नसल्याचा उल्लेख १ आॅक्टोबर व १९ नोव्हेंबरच्या पत्रात आहे. मात्र भाजपाच्या लोकप्रतिनिधी या पत्राचा, अहवालांचा अभ्यास व त्यानुसार पाठपुरावा करत नसल्याने काम लांबत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये रोष वाढत चालला आहे. येत्या काही दिवसात निवडणुका होणार असल्याने लोकप्रतिनिधींचाही श्रेयासाठी खटाटोप सुरु आहे.‘नही’ने विश्वासात घेतले असते तर...‘नही’कडून हे सर्व प्रक्रिया गोपनियपद्धतीने सुरु आहे. त्यांच्याकडून लोकप्रतिनिधी, समांतर रस्ते कृती समिती, जिल्हा प्रशासन यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे. जर ‘नही’ने आतापर्यंत विश्वासात घेत त्यांच्याकडून सुरु असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली असती तर संभ्रमही निर्माण झाला नसता. लोकप्रतिनिधींनाही काय चालले आहे, याची माहिती नसल्याने ते अपूर्ण माहितीच्या आधारावर श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कालच्या प्रकारावरुन स्पष्ट झाले. हे काम लवकर व्हावे ही नागरिकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव