शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात केळीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 4:48 PM

संचारबंदीतील अडचणींचे निमित्त : दररोज १५० ते २०० ट्रकची केळी वाहतूक मात्र सुरूच

रावेर : देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असतांना नाशवंत फळ म्हणून केळीची देशांतर्गत वाहतूक करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने दररोज १५० ते २०० ट्रक केळीची उत्तर भारतात निर्यात केली जात आहे. मात्र, दुसरीकडे पाच सहा दिवस केळी वाहतूक न झाल्याने केळीबागेत साठलेल्या केळीमालाची ४०० ते ४५० रूपये प्रतिक्विंटल अशा कमी भावाने खरेदी झाली होती. आता मात्र नियमित व गुणात्मक दर्जाच्या केळीमालालाही तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा कमी भावात अर्थात उत्पादन खचार्पेक्षाही कमी भावात व्यापारीवर्गाने भाव देत कोरोनाचे भूत नाचवून केळीची लयलूट सुरू केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक मणका मोडला जात आहे.संचारबंदीत आरंभीच्या पाच -सहा दिवसात कापणीवरील नवती केळी बागांमध्ये केळी माल संचित झाला होता. केळी मजूरांना घराबाहेर पडता येत नसल्याने व जिल्हा व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने वाहतूकीअभावी केळी मालाची धुळघाण होते की काय? अशी आशंका होती. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार शिरीष चौधरी तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून केळी वर्गाने बागांमध्ये संचित झालेल्या केळीमालाची गुणवत्ता ढासळल्याने केळी बाजार समितीचे भाव ११७० रू प्रतिक्विंटल असतांना ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल एवढ्या कमी दरात खरेदी करून उत्तर भारतात केळी निर्यात केली.या तीन- चार दिवसात ५०० ट्रक वा अवजड ट्रेलरद्वारे आठ हजार ७५० टन केळीमालाची उत्तर भारतात निर्यात झाली. परिणामत: केळी बागांमध्ये आता पुर्वसंचित केळीमालाची उपलब्धता संपून नियमीत कापणीवरील गुणात्मक दर्जाची केळी कापणीवर आल्याने केळीच्या बाजारभावांची परिस्थिती कोरोनाच्या संचारबंदीतील संभाव्य धोके गृहीत धरून केळी उत्पादकांच्या पदरात दोन पैसे पडतील या हेतूने सुधारण्याची गरज होती. मात्र, कोरोनाचा मोठा बाऊ करत व्यापारी हे केळीमाल उतरवणारा मजूर उपलब्ध नसल्याने तसेच परतीचे भाडे नसल्याने ट्रकवाल्यांना जादा भाडे देवून केळी माल उतरवण्याची शाश्वती नसल्याने केळी ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल भावातच खरेदी करणे परवडत असल्याचे सांगत आहेत. मात्र आजही रावेर तालूक्यातून १५० ते २०० ट्रक रवाना झाल्याचे चित्र असल्याने बाजारपेठेत केळीची मागणीही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.संचारबंदीत शिथीलता मिळाल्यानंतरच्या फळ -भाज्या चढ्या भावाने विकल्या जात असतांना व त्यात केळी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ असल्याची बाजारपेठेत चर्चा असतांना, केळीला मागणी नसल्याबाबत कृत्रिम मंदीचे चित्र रंगवून केळी उत्पादकांची लयलूट होत असल्याची भीषण वास्तवता आहे. तत्संबंधी स्थानिक केळी व्यापाºयांनी जगावर कोरोनाच्या कोसळलेल्या संकटात केळी उत्पादकांना किमान उत्पादन खर्च त्याच्या पदरात पडेल एवढा तरी केळी भाव मिळवून देण्यासाठी घाऊक खरेदीदार व्यापाºयांशी भांडून राष्ट्रीय आपत्तीत केळी उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.मजूर जिल्हाबंदीत सोलापूरला अडकलेरावेर तालूक्यात निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाच्या केळीमालाची उपलब्धता होवून आखाती राष्ट्रात केळी निर्यातीची संधी असतांना मात्र कोरोनाच्या शटडाऊन मुळे जिल्हा बंदीत केळी निर्यातीचा तंत्रकुशल मजूर सोलापूर जिल्ह्यात अडकून पडला आहे. सदर २०० मजूर सोलापूर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी द्यावी अशी मागणी केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी केली आहे.