शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात केळीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:48 IST

संचारबंदीतील अडचणींचे निमित्त : दररोज १५० ते २०० ट्रकची केळी वाहतूक मात्र सुरूच

रावेर : देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असतांना नाशवंत फळ म्हणून केळीची देशांतर्गत वाहतूक करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने दररोज १५० ते २०० ट्रक केळीची उत्तर भारतात निर्यात केली जात आहे. मात्र, दुसरीकडे पाच सहा दिवस केळी वाहतूक न झाल्याने केळीबागेत साठलेल्या केळीमालाची ४०० ते ४५० रूपये प्रतिक्विंटल अशा कमी भावाने खरेदी झाली होती. आता मात्र नियमित व गुणात्मक दर्जाच्या केळीमालालाही तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा कमी भावात अर्थात उत्पादन खचार्पेक्षाही कमी भावात व्यापारीवर्गाने भाव देत कोरोनाचे भूत नाचवून केळीची लयलूट सुरू केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक मणका मोडला जात आहे.संचारबंदीत आरंभीच्या पाच -सहा दिवसात कापणीवरील नवती केळी बागांमध्ये केळी माल संचित झाला होता. केळी मजूरांना घराबाहेर पडता येत नसल्याने व जिल्हा व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने वाहतूकीअभावी केळी मालाची धुळघाण होते की काय? अशी आशंका होती. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार शिरीष चौधरी तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून केळी वर्गाने बागांमध्ये संचित झालेल्या केळीमालाची गुणवत्ता ढासळल्याने केळी बाजार समितीचे भाव ११७० रू प्रतिक्विंटल असतांना ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल एवढ्या कमी दरात खरेदी करून उत्तर भारतात केळी निर्यात केली.या तीन- चार दिवसात ५०० ट्रक वा अवजड ट्रेलरद्वारे आठ हजार ७५० टन केळीमालाची उत्तर भारतात निर्यात झाली. परिणामत: केळी बागांमध्ये आता पुर्वसंचित केळीमालाची उपलब्धता संपून नियमीत कापणीवरील गुणात्मक दर्जाची केळी कापणीवर आल्याने केळीच्या बाजारभावांची परिस्थिती कोरोनाच्या संचारबंदीतील संभाव्य धोके गृहीत धरून केळी उत्पादकांच्या पदरात दोन पैसे पडतील या हेतूने सुधारण्याची गरज होती. मात्र, कोरोनाचा मोठा बाऊ करत व्यापारी हे केळीमाल उतरवणारा मजूर उपलब्ध नसल्याने तसेच परतीचे भाडे नसल्याने ट्रकवाल्यांना जादा भाडे देवून केळी माल उतरवण्याची शाश्वती नसल्याने केळी ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल भावातच खरेदी करणे परवडत असल्याचे सांगत आहेत. मात्र आजही रावेर तालूक्यातून १५० ते २०० ट्रक रवाना झाल्याचे चित्र असल्याने बाजारपेठेत केळीची मागणीही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.संचारबंदीत शिथीलता मिळाल्यानंतरच्या फळ -भाज्या चढ्या भावाने विकल्या जात असतांना व त्यात केळी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ असल्याची बाजारपेठेत चर्चा असतांना, केळीला मागणी नसल्याबाबत कृत्रिम मंदीचे चित्र रंगवून केळी उत्पादकांची लयलूट होत असल्याची भीषण वास्तवता आहे. तत्संबंधी स्थानिक केळी व्यापाºयांनी जगावर कोरोनाच्या कोसळलेल्या संकटात केळी उत्पादकांना किमान उत्पादन खर्च त्याच्या पदरात पडेल एवढा तरी केळी भाव मिळवून देण्यासाठी घाऊक खरेदीदार व्यापाºयांशी भांडून राष्ट्रीय आपत्तीत केळी उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.मजूर जिल्हाबंदीत सोलापूरला अडकलेरावेर तालूक्यात निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाच्या केळीमालाची उपलब्धता होवून आखाती राष्ट्रात केळी निर्यातीची संधी असतांना मात्र कोरोनाच्या शटडाऊन मुळे जिल्हा बंदीत केळी निर्यातीचा तंत्रकुशल मजूर सोलापूर जिल्ह्यात अडकून पडला आहे. सदर २०० मजूर सोलापूर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी द्यावी अशी मागणी केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी केली आहे.