शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात केळीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:48 IST

संचारबंदीतील अडचणींचे निमित्त : दररोज १५० ते २०० ट्रकची केळी वाहतूक मात्र सुरूच

रावेर : देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असतांना नाशवंत फळ म्हणून केळीची देशांतर्गत वाहतूक करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने दररोज १५० ते २०० ट्रक केळीची उत्तर भारतात निर्यात केली जात आहे. मात्र, दुसरीकडे पाच सहा दिवस केळी वाहतूक न झाल्याने केळीबागेत साठलेल्या केळीमालाची ४०० ते ४५० रूपये प्रतिक्विंटल अशा कमी भावाने खरेदी झाली होती. आता मात्र नियमित व गुणात्मक दर्जाच्या केळीमालालाही तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा कमी भावात अर्थात उत्पादन खचार्पेक्षाही कमी भावात व्यापारीवर्गाने भाव देत कोरोनाचे भूत नाचवून केळीची लयलूट सुरू केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक मणका मोडला जात आहे.संचारबंदीत आरंभीच्या पाच -सहा दिवसात कापणीवरील नवती केळी बागांमध्ये केळी माल संचित झाला होता. केळी मजूरांना घराबाहेर पडता येत नसल्याने व जिल्हा व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने वाहतूकीअभावी केळी मालाची धुळघाण होते की काय? अशी आशंका होती. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार शिरीष चौधरी तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून केळी वर्गाने बागांमध्ये संचित झालेल्या केळीमालाची गुणवत्ता ढासळल्याने केळी बाजार समितीचे भाव ११७० रू प्रतिक्विंटल असतांना ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल एवढ्या कमी दरात खरेदी करून उत्तर भारतात केळी निर्यात केली.या तीन- चार दिवसात ५०० ट्रक वा अवजड ट्रेलरद्वारे आठ हजार ७५० टन केळीमालाची उत्तर भारतात निर्यात झाली. परिणामत: केळी बागांमध्ये आता पुर्वसंचित केळीमालाची उपलब्धता संपून नियमीत कापणीवरील गुणात्मक दर्जाची केळी कापणीवर आल्याने केळीच्या बाजारभावांची परिस्थिती कोरोनाच्या संचारबंदीतील संभाव्य धोके गृहीत धरून केळी उत्पादकांच्या पदरात दोन पैसे पडतील या हेतूने सुधारण्याची गरज होती. मात्र, कोरोनाचा मोठा बाऊ करत व्यापारी हे केळीमाल उतरवणारा मजूर उपलब्ध नसल्याने तसेच परतीचे भाडे नसल्याने ट्रकवाल्यांना जादा भाडे देवून केळी माल उतरवण्याची शाश्वती नसल्याने केळी ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल भावातच खरेदी करणे परवडत असल्याचे सांगत आहेत. मात्र आजही रावेर तालूक्यातून १५० ते २०० ट्रक रवाना झाल्याचे चित्र असल्याने बाजारपेठेत केळीची मागणीही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.संचारबंदीत शिथीलता मिळाल्यानंतरच्या फळ -भाज्या चढ्या भावाने विकल्या जात असतांना व त्यात केळी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ असल्याची बाजारपेठेत चर्चा असतांना, केळीला मागणी नसल्याबाबत कृत्रिम मंदीचे चित्र रंगवून केळी उत्पादकांची लयलूट होत असल्याची भीषण वास्तवता आहे. तत्संबंधी स्थानिक केळी व्यापाºयांनी जगावर कोरोनाच्या कोसळलेल्या संकटात केळी उत्पादकांना किमान उत्पादन खर्च त्याच्या पदरात पडेल एवढा तरी केळी भाव मिळवून देण्यासाठी घाऊक खरेदीदार व्यापाºयांशी भांडून राष्ट्रीय आपत्तीत केळी उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.मजूर जिल्हाबंदीत सोलापूरला अडकलेरावेर तालूक्यात निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाच्या केळीमालाची उपलब्धता होवून आखाती राष्ट्रात केळी निर्यातीची संधी असतांना मात्र कोरोनाच्या शटडाऊन मुळे जिल्हा बंदीत केळी निर्यातीचा तंत्रकुशल मजूर सोलापूर जिल्ह्यात अडकून पडला आहे. सदर २०० मजूर सोलापूर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी द्यावी अशी मागणी केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी केली आहे.