शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पारोळ्यात १० दुकानांवर दंडात्मक कारवाई, १२ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 21:39 IST

पारोळा येथे संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत १२ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देमुख्याधिकारी स्वतः कारवाईसाठी रस्त्यावर.

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : अक्षय तृतीया व रमजानच्या पार्श्वभूमीवर साहित्य व किराणा बाजार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी बाजारपेठेत झाली होती. लादण्यात आलेले निर्बंधचे उल्लंघन होत होते. संचारबंदीत अनावश्यक दुकाने बंद ठेवण्याचा नियम असताना पारोळा बाजारपेठेत सर्व प्रकारची दुकाने सर्रास सुरू होती. संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत १२ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यात ३ दुकानांना सीलही लावण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवेत असलेली दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी आहे. त्यानंतर सर्व दुकाने बंद करून कडकडीत बंद पाळावा, असा निर्देश असताना पारोळा बाजारपेठेत सर्व प्रकारची दुकाने सर्रासपणे सुरू होती. यावेळी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील या पालिकेत चारचाकीने येत असताना त्या सर्व प्रकारची दुकाने उघडी दिसली. त्यांनी कजगाव चौफुलीवरून आपल्या वाहनातून उतरून पायी कार्यलयात जाताना जे अनावश्यक दुकान उघडे दिसले. त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत काही दुकाने सील लावली, त्या स्वतः रस्त्यावर कारवाईसाठी उतरल्यावर दुकानदारांनी आपापली दुकाने पटापट बंद करून घेतली. बाजारपेठेत सीईओ आल्यास दुकाने बंद करा, असा आवाज व्यापारी एकमेकांना देत १० मिनिटांतच संपूर्ण बाजारपेठेतील दुकाने बंद झाली. बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट झाला. जे आवश्यक दुकाने ११ वाजेपर्यंत बंद झाली नव्हती, त्यांच्यावर यावेळी कारवाई करण्यात आली.

बाजारपेठेत भाजीपाला, फळे, पाव व इतर साहित्य विक्री करणारे ठेलागाडीधारकांनाही काही मिनिटांत बाजारपेठेतून काढून देत संपूर्ण बाजारपेठ ठेलागाडीमुक्त केली. यावेळी कारवाईसाठी स्वतः मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, अभियंता अभिषेक काकडे, राहुल साळवे, हिंमतराव पाटील, पो. हे. कॉ. सुनील साळुंखे, जितेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, रमेश तीलकर, सचिन चौधरी, किरण खंडारे, विश्वास पाटील इत्यादी होते.

आखाजी सण आहे, सवलत द्या

खान्देशात आखाजी हा सर्वांत मोठा सण आहे. त्यासोबत रमजान ईद आहे. या दोन्ही सणांना दोन्ही धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोनाचे सावट जरी या सणांवर असले तरी बाजार खरेदीसाठी गर्दी मोठ्या प्रमाणात आहे; परंतु वेळेअभावी ग्रामीण भागातील अनेक जणांना साहित्य व बाजार न करता परत जावे लागत आहे. तरी दोन- तीन दिवस वेळेत वाढ करून द्यावी व सर्व प्रकारची दुकाने ९ ते २ यादरम्यान सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाcorona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिका