शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

डाळींच्या उत्पादनात २५ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:42 IST

कडधान्याची आवक घटली

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणामआयात बंदीची भर

जळगाव : कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून आतापासूनच दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यात विदेशातून होणारी कच्च्या मालाची आवकही बंद असल्याने डाळ उत्पादनावर मोठा परिणाम होऊन डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे. सलग तीन आठवड्यांपासून डाळींचे भाव वाढतच असून या तीन आठवड्यात डाळींचे भाव थेट ८०० ते ९०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाला शेवटच्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालाची चणचण भासू लागली आहे.उत्पादन ७५ टक्क्यांवरदेशातील डाळ उत्पादनात जळगावचा मोठा वाटा असून येथील डाळ देशातील विविध भागासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे.आयात बंदीची भरदेशात एकतर कडधान्याचे उत्पादन कमी आल्याने त्यात विदेशातून येणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी असल्याने कच्च्या मालाची कमतरता भासण्यास अधिकच मदत होत आहे. त्यामुळे या सर्वांचा जळगावातील ५५ ते ६० दालमिलला फटका बसत आहे. परिणामी दालमिलचालक चिंतीत झाले असून २००६मधील निर्यातबंदी नंतर झालेल्या स्थितीची आठवण या निमित्ताने दालमिल चालकांना होत आहे.मागणी वाढलीपावसाळ््यामध्ये डाळींना मागणी कमी असल्याने तिचे भावदेखील स्थिर होते. मात्र सध्या आवक कमी असताना मागणीही वाढल्याने डाळींचे भाव वाढण्यास अधिक मदत होत आहे. कमी पावसामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची चिन्हे असल्याने रब्बी हंगामातील हरभºयाच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे संकट दालमिलवरदेखील राहणार असल्याचे सांगितले जात आहे.मोठी भाववाढतीन आठवड्यांपूर्वी ६२०० ते ६६०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ५५० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ४७०० ते ४८०० रुपयांवरून ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. अशाच प्रकारे ५२०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५४०० ते ५५५० तर तूरडाळदेखील ५५०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवरून ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.कडधान्याची आवक घटल्याने दालमिलमधील उत्पादन २५ टक्क्याने कमी झाले आहे. त्यात कच्च्या मालाची आयात बंद असल्याने अधिकच परिणाम होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.डाळींची आवक कमी व मागणी जास्त असल्याने डाळींचे भाव वाढत आहे. त्यात उडीद व मुगाच्या डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव