शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
2
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
3
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
4
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
5
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
6
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
7
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
8
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
9
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
10
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
11
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
12
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
13
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
14
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
15
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
16
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
18
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
19
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
20
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न

डाळींच्या उत्पादनात २५ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:42 IST

कडधान्याची आवक घटली

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणामआयात बंदीची भर

जळगाव : कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून आतापासूनच दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यात विदेशातून होणारी कच्च्या मालाची आवकही बंद असल्याने डाळ उत्पादनावर मोठा परिणाम होऊन डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे. सलग तीन आठवड्यांपासून डाळींचे भाव वाढतच असून या तीन आठवड्यात डाळींचे भाव थेट ८०० ते ९०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाला शेवटच्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालाची चणचण भासू लागली आहे.उत्पादन ७५ टक्क्यांवरदेशातील डाळ उत्पादनात जळगावचा मोठा वाटा असून येथील डाळ देशातील विविध भागासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे.आयात बंदीची भरदेशात एकतर कडधान्याचे उत्पादन कमी आल्याने त्यात विदेशातून येणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी असल्याने कच्च्या मालाची कमतरता भासण्यास अधिकच मदत होत आहे. त्यामुळे या सर्वांचा जळगावातील ५५ ते ६० दालमिलला फटका बसत आहे. परिणामी दालमिलचालक चिंतीत झाले असून २००६मधील निर्यातबंदी नंतर झालेल्या स्थितीची आठवण या निमित्ताने दालमिल चालकांना होत आहे.मागणी वाढलीपावसाळ््यामध्ये डाळींना मागणी कमी असल्याने तिचे भावदेखील स्थिर होते. मात्र सध्या आवक कमी असताना मागणीही वाढल्याने डाळींचे भाव वाढण्यास अधिक मदत होत आहे. कमी पावसामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची चिन्हे असल्याने रब्बी हंगामातील हरभºयाच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे संकट दालमिलवरदेखील राहणार असल्याचे सांगितले जात आहे.मोठी भाववाढतीन आठवड्यांपूर्वी ६२०० ते ६६०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ५५० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ४७०० ते ४८०० रुपयांवरून ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. अशाच प्रकारे ५२०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५४०० ते ५५५० तर तूरडाळदेखील ५५०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवरून ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.कडधान्याची आवक घटल्याने दालमिलमधील उत्पादन २५ टक्क्याने कमी झाले आहे. त्यात कच्च्या मालाची आयात बंद असल्याने अधिकच परिणाम होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.डाळींची आवक कमी व मागणी जास्त असल्याने डाळींचे भाव वाढत आहे. त्यात उडीद व मुगाच्या डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव