शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

डाळींच्या उत्पादनात २५ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:42 IST

कडधान्याची आवक घटली

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणामआयात बंदीची भर

जळगाव : कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून आतापासूनच दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यात विदेशातून होणारी कच्च्या मालाची आवकही बंद असल्याने डाळ उत्पादनावर मोठा परिणाम होऊन डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे. सलग तीन आठवड्यांपासून डाळींचे भाव वाढतच असून या तीन आठवड्यात डाळींचे भाव थेट ८०० ते ९०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाला शेवटच्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालाची चणचण भासू लागली आहे.उत्पादन ७५ टक्क्यांवरदेशातील डाळ उत्पादनात जळगावचा मोठा वाटा असून येथील डाळ देशातील विविध भागासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे.आयात बंदीची भरदेशात एकतर कडधान्याचे उत्पादन कमी आल्याने त्यात विदेशातून येणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी असल्याने कच्च्या मालाची कमतरता भासण्यास अधिकच मदत होत आहे. त्यामुळे या सर्वांचा जळगावातील ५५ ते ६० दालमिलला फटका बसत आहे. परिणामी दालमिलचालक चिंतीत झाले असून २००६मधील निर्यातबंदी नंतर झालेल्या स्थितीची आठवण या निमित्ताने दालमिल चालकांना होत आहे.मागणी वाढलीपावसाळ््यामध्ये डाळींना मागणी कमी असल्याने तिचे भावदेखील स्थिर होते. मात्र सध्या आवक कमी असताना मागणीही वाढल्याने डाळींचे भाव वाढण्यास अधिक मदत होत आहे. कमी पावसामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची चिन्हे असल्याने रब्बी हंगामातील हरभºयाच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे संकट दालमिलवरदेखील राहणार असल्याचे सांगितले जात आहे.मोठी भाववाढतीन आठवड्यांपूर्वी ६२०० ते ६६०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ५५० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ४७०० ते ४८०० रुपयांवरून ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. अशाच प्रकारे ५२०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५४०० ते ५५५० तर तूरडाळदेखील ५५०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवरून ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.कडधान्याची आवक घटल्याने दालमिलमधील उत्पादन २५ टक्क्याने कमी झाले आहे. त्यात कच्च्या मालाची आयात बंद असल्याने अधिकच परिणाम होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.डाळींची आवक कमी व मागणी जास्त असल्याने डाळींचे भाव वाढत आहे. त्यात उडीद व मुगाच्या डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव