शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

पावसाने डोळे वटारल्याने डाळींना महागाईचा ‘तडका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सलग व जोरदार पाऊस नसल्याने त्याचा परिणाम उडीद-मुगाच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हंगाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सलग व जोरदार पाऊस नसल्याने त्याचा परिणाम उडीद-मुगाच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हंगाम येण्यापूर्वीच डाळींचे भाव कडाडले आहेत. यामध्ये उडीद व तूरडाळ १०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत तर मूगडाळ ९० रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे सध्या जास्त मागणी नसली तरी भाववाढ होत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर जून, जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यात मध्येच मोठा खंड पडत असून, ऑगस्ट महिन्यातही काही दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस पुन्हा गायब होत आहे. सलग व पुरेसा पाऊस नसल्याने त्यांचा विविध पिकांसह उडीद-मुगावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे ही पिके हातची जाण्याची भीती असून, हंगाम येण्यापूर्वीच बाजारात तेजी येऊ लागली आहे.

नवीन मालाची शाश्वती कमी

राज्यात पावसाची स्थिती पाहिली तर अनेक भागांत पाऊस कमी असून पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात जास्त पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे पिके कोमेजली तर जास्त पावसामुळे ती नष्ट झाली आहेत. या दोन्ही घटकांचा परिणाम कडधान्यावर होऊन काढणीनंतरही नवीन मालाची आवक किती राहील, याची शाश्वती राहिलेली नाही.

भाववाढीस सुरुवात

नवीन माल किती येईल, याची शाश्वती नसल्याने बाजारपेठेत मागणी नसताना तेजी येत आहे. यामध्ये १० दिवसांत डाळींचे भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. ९० ते ९४ रुपये प्रति किलोवर असलेली उडीदडाळ आता ९५ ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचली असून, ८४ ते ८५ रुपयांवर असलेली मूगडाळ ८६ ते ९० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तूरडाळ ९० ते ९५ रुपयांवरून ९६ ते १०० रुपये, हरभराडाळ ६२ ते ६६ रुपयांवरून ६८ ते ७२ रुपये, मसूरडाळ ७८ ते ८२ रुपयांवरून ९० ते ९४ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.