शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

पावसाने डोळे वटारल्याने डाळींना महागाईचा ‘तडका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सलग व जोरदार पाऊस नसल्याने त्याचा परिणाम उडीद-मुगाच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हंगाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सलग व जोरदार पाऊस नसल्याने त्याचा परिणाम उडीद-मुगाच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हंगाम येण्यापूर्वीच डाळींचे भाव कडाडले आहेत. यामध्ये उडीद व तूरडाळ १०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत तर मूगडाळ ९० रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे सध्या जास्त मागणी नसली तरी भाववाढ होत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर जून, जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यात मध्येच मोठा खंड पडत असून, ऑगस्ट महिन्यातही काही दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस पुन्हा गायब होत आहे. सलग व पुरेसा पाऊस नसल्याने त्यांचा विविध पिकांसह उडीद-मुगावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे ही पिके हातची जाण्याची भीती असून, हंगाम येण्यापूर्वीच बाजारात तेजी येऊ लागली आहे.

नवीन मालाची शाश्वती कमी

राज्यात पावसाची स्थिती पाहिली तर अनेक भागांत पाऊस कमी असून पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात जास्त पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे पिके कोमेजली तर जास्त पावसामुळे ती नष्ट झाली आहेत. या दोन्ही घटकांचा परिणाम कडधान्यावर होऊन काढणीनंतरही नवीन मालाची आवक किती राहील, याची शाश्वती राहिलेली नाही.

भाववाढीस सुरुवात

नवीन माल किती येईल, याची शाश्वती नसल्याने बाजारपेठेत मागणी नसताना तेजी येत आहे. यामध्ये १० दिवसांत डाळींचे भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. ९० ते ९४ रुपये प्रति किलोवर असलेली उडीदडाळ आता ९५ ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचली असून, ८४ ते ८५ रुपयांवर असलेली मूगडाळ ८६ ते ९० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तूरडाळ ९० ते ९५ रुपयांवरून ९६ ते १०० रुपये, हरभराडाळ ६२ ते ६६ रुपयांवरून ६८ ते ७२ रुपये, मसूरडाळ ७८ ते ८२ रुपयांवरून ९० ते ९४ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.