शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पु. लं. कलावंतच नाही तर माणूस म्हणूनही खूप मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 11:36 IST

-ना. धो. महानोर

ठळक मुद्दे प्रकट मुलाखतीतून उलगडले विविध पैलू, भार्इंकडून बरेच काही शिकायला मिळाले

जळगाव : पु. ल. देशपांडे हे उत्तुंग कलावंत होते, हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु ते केवळ महान कलावंतच नव्हते तर सामाजिक भान असलेला एक चांगला माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते, असे प्रतिपादन कविवर्य ना. धो. महानोर यांनी केले.विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुलोत्सवात दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी महानोर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम रोटरी हॉलमध्ये झाला. त्यावेळी महानोर यांनी मुलाखतीतून पु. लं. याचे वेगवेगळे पैलू उपस्थितांसमोर उलगडले. लेखक ज्ञानेश्वर शेंडे आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे यांनी ही मुलाखत घेतली.कला क्षेत्र हे जात आणि वैयक्तीक विचारांच्या पलीकडेएखााद्या राज्याची उंची ही त्या राज्याच्या संपन्नतेपेक्षा तेथील कलावंतानी मोजली जाते. कला क्षेत्र हे सामाजिक भान ठेवणारे व जात, धर्म आणि वैयक्तीक विचारांच्या पलिकडील आहे. हाच संदेश गदीमा, सुधीर फडके आणि पुलं यांनी दिला. हे तिघेही वेगवेगवळ्या विचासरणीचे होते मात्र त्यांनी आपले वैयक्तीक विचार कला क्षेत्रात येवू दिले नाही.वाचन आणि अनेकांच्या सानिध्याने घडलो !प्रचंड वाचन आणि पत्रव्यवहार आणि लोकांशी संपर्क तसेच त्यांचा सानिध्य यातून घडत गेलो, असेही महानोर यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीला कविता वृत्तपत्रांना पाठविल्या परंतु त्या परत आल्या. राग न मानता सुधारणा केल्या आणि पुढे नामांकीत मासिकात ४ कविता एकाच वेळी प्रसिद्ध झाल्या. या कविता पु. ल. यांनी पाहिल्या आणि त्यांनी स्वत: मला पत्र पाठवून कौतुक केले. येथून पत्र्यवहार सुरु झाले आणि त्यांच्या सानिध्यात आलो बरेच काही त्यांच्याकडून शिकलो . प्रत्येक नवीन कलावंत आणि साहित्यिकाचे ते कौतुक करायचे हा त्यांचा मोठेपणा होता, हे सांगताना त्यांनी निसर्गाचे सौदर्य कोणत्याही साहित्यात उमटविणे सोपे नाही. मी एक लहान कवी असून स्त्रियांचे दु:ख, शेतकºयांच्या वेदना आपल्या कवितेतून उतरविण्याचा प्रयत्न केला. पण या वेदना व हे दु:ख खूप मोठे आहे, ते मांडणे कधीही अपूर्णच राहील.शेतामध्येही भरविली पु. ल. यांनी मैफलपु. ल. यांच्याशी स्नेह वाढल्यावर एकदा त्यांनी पळासखेड्याला येणार म्हणून सांगितले परंतु माझे घर धाब्याचे एकदम साधे होते. यामुळे मी टाळाटाळ केली परंतु त्यांनी येणारच म्हणून सांगितले. आणि ते आलेही. शेतामध्येच अगदी कमी लोकांमध्ये कवितांची मैफल यावेळी रंगली. निसर्गाचे, शेतीचे सौदर्य या मुक्कामात त्यांना खूपच भावले असेही महानोर यांनी सांगितले.महाराष्ट्रापेक्षाही अमेरिकेत लाभला प्रचंड प्रतिसादपु. ल यांच्यासोबत अमेरिकेत संमेलनाला जाण्याची संधी लाभली. त्यांनी बोरकरांच्या काही कविता सादर केल्या. ५ हजारावर या ठिकाणी लोक उपस्थित होते. महाराष्ट्रात कोठे मिळाली नाही अशी चांगली दाद या ठिकाणी मिळाली. मी शेतीवर मग पाण्यावर कविता सादर केली.. यावेळी पुुु.ल. यांनी माझे कौतुक करताना हे ना. धो. नाही तर धोधो महानोर आहे, असा उल्लेख केला. प्रत्येकच चांगल्या कलावंताचे ते कौतुक करायचे.कोट्यवधीची केली मदतविविध कला प्रकारात तरबेज असलेले बहुआयामी व बहुरुपी पु.ल. यांनी कला क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. पैसेही खूप कमवले परंतु दु:खी व गरजवंतांसाठी कोट्यवधी रुपये दान देवून टाकले. त्यांच्यातील माणूस हा अनेकदा दिसून आल्याचेही महानोर यांनी काही उदाहरणे देत सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल मनोहर यांनी केले. महानोर यांचे स्वागत डॉ.रत्नाकर गोरे यांनी केले. यावेळी रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.चित्रपटासाठी गिते लिहून घेतलीपु. ल. यांची कथा पटकथा असलेल्या ‘एक होता विदुषक’ चित्रपटासाठी मीच गीते लिहावीत असा आग्रह पु. लं. यांचा होता मात्र मी कधी खास चित्रपटासाठी गिते न लिहल्याने नम्र नकार दिला. परंतु त्यांनी माझ्याकडून भूपाळी, लावणी,गौळण अशी विविध गिते लिहून घेतली. गिते लिहीत असताना त्यांच्याकडूनच विविध माहितीचे भंडार मला प्राप्त झाले. यावेळी गावात पाहिलेले तमाशे, जळगावच्या हैदरी थिएटर मध्ये ऐकलेल्या पाहिलेल्या गौळणी आदीचा उपयोगही झाल्याचे महानोर यांनी सांगितले. लावणी गीत लिहताना पु. ल. यांनी स्वत: लावणी कार्यक्रमात नेवून अपेक्षित लावणी लिहून घेतली....आणि संतापही व्यक्त केलावसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कला अकादमी उभारण्याचे लता मंगेशकर यांच्यासह प्रयत्न केले. सरकारकडून जागा देण्याचेही ठरले मात्र अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री बदलले आणि सरकारकडून नकाराचे पत्र आले. हा भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीचा अवमानच होता. मात्र काही काळाने नंतर पुन्हा प्रयत्न केले. मी मुख्यमंत्र्यांना कडक पत्र लिहिले. एक साधा कवी अगदीे कडक शब्दातही लिहू शकतो, हे त्यावेळी दिसले. आणि मंजुरीही मिळाली आग्रहाने पु. ल. यांचे नाव त्या अकादमीला दिले. एक दिलदार व्यक्ती, जगज्जेता, हसविणारा आणि रडविणारही, अष्टपैलू नव्हे तर त्यापेक्षा अधिक कितीतरी पैलू असलेल्या या कलावंताचे समाजावर असलेले ऋण न फिटणारे आहे, असे गौरवोद्गार महानोरांनी काढले.