शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मुख्यमंत्र्यांनी धुतलेल्या गाईची धार काढून शेतकरी असल्याचे सिद्ध करून दाखवावे- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 15:33 IST

शेतकर्‍यांचे गळ्यात गट नंबर, नुकसानग्रस्त पिकांची माहिती लिहिलेली आरोपीसारखी पाटी टांगून पंचनामा करणार्‍या या सरकारसारखे शेतकर्‍यांना चोर समजणारे सरकार जगाच्या पाठीवर कुठेही नसून शेतकर्‍यांचा घोर अपमान करणार्‍या या सरकारविरुद्ध अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही हल्लाबोल करीत आहोत.

रावेर - शेतकर्‍यांचे गळ्यात गट नंबर, नुकसानग्रस्त पिकांची माहिती लिहिलेली आरोपीसारखी पाटी टांगून पंचनामा करणार्‍या या सरकारसारखे शेतकर्‍यांना चोर समजणारे सरकार जगाच्या पाठीवर कुठेही नसून शेतकर्‍यांचा घोर अपमान करणार्‍या या सरकारविरुद्ध अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही हल्लाबोल करीत आहोत. या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही मंत्री शेतकर्‍याचे मूल नसल्याचे मोठे दुर्भाग्य असून, असे वेडेवाकडे निकष काढणार्‍या सरकारच्या मुख्यमंत्री फडणवीसांना खुले आव्हान करतो की, आपण धुऊन आणलेल्या गाईला नुसती खाली बसून धार फोडून दाखवावी अन् पाच पिढ्यांपासून पिढीजात शेतकरी असल्याचे सिद्ध करून दाखवावे ? असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात सरकारविरुद्ध तोफ डागताना ते बोलत होते.खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार जयंत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील, रंगनाथ काळे, सुरेखा ठाकरे, संग्राम पाटील आदींच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल यात्रेचे स्वागत झाले. माजी आमदार अरुण पाटील यांनी या हल्लाबोल यात्रेचे स्वागत केले.यापुढे हल्लाबोल करताना धनंजय मुंडे म्हणाले, या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने १७१ कोटींची कर्जमाफी घरपोच दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकच प्रश्न विचारायचा की, कर्जमाफीच्या ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांची पत्नी सोबत बोलावून काय तुमच्या घरच्या सत्यनारायण पूजेचा महाप्रसाद देणार होतात काय? शेतकर्‍यांना कर्जासाठी बोजा नको, आधारकार्ड नको अन् मोठमोठ्या धेंडांना ४० - ४०, ५०-५० कोटी रुपये कर्ज विनाबोजाने अन् बिना जप्तीच्या कारवाईने कर्जाची खिरापत वाटणार्‍या सरकारने फसवणूक केल्याची तोफ त्यांनी डागली.नीरव मोदीला छोटा मोदी म्हणणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाते. मात्र छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी ना भाजपाचे जिल्हाध्यक्ष वा प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्र्यांनी ना साधी खंत मानली ना दिलगीरी व्यक्त केली. छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ अशा छत्रपती शिवरायांच्या नावावर सत्तेवर येऊन भाजपा सेनेवाल्यांनो आपण या महाराष्ट्रात शिवरायांचा घोर अपमान करत असाल तर, या महाराष्ट्राच्या सत्तेतच काय या महाराष्ट्राच्या १० वर्षांच्या राजकारणात आपल्या राजकारणाची बी पण दिसणार नाही, असा सज्जड दमही मुंडे यांनी बोलताना दिला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे