शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासने केवळ देण्यासाठीच असतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:29 IST

निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांचा सोयीस्कर विसर; सामान्य माणसाचे जीवन रोज ठरतेय अवघड ; दुर्लक्ष-अवहेलना वाट्याला; राज्य केंद्राकडे तर केंद्र राज्याकडे दाखवतेय बोट

मिलिंद कुलकर्णी२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना लगेच विसर पडला. सगळेच पक्ष कोणत्या ना कोणत्या सत्तेत आहेत. परंतु, नाकर्त्याचा वार या प्रमाणे दोषारोप होत आहेत.दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकालाने विकास कामांमुळेच विजय मिळतो, असा स्पष्ट संदेश दिला आहे. तो सगळ्याच राजकीय पक्षांसाठी धडा आहे.गेल्या सहा महिन्यांपासून देशातील राजकारणात मोठी घुसळण झाली. बहुसंख्यकांना सुखावणारे निर्णय होत असताना अल्पसंख्यकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. राज्य घटनेनुसार हा घटक असंतोष व्यक्त करु लागला, त्यावेळी समाजात दुफळीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जनमानस ‘थांबा आणि पहा’ या भूमिकेत होते. महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही. तीन पक्षांनी एकत्र येत अभूतपूर्व परिस्थितीत सरकार बनवले. परंतु, भाजप समर्थक वगळता जनमानसात या सरकारविषयी विरोधाची भावना किंवा भाजपविषयी समर्थनाची भावना दिसून आली नाही. आता तर दिल्लीच्या निकालाने स्पष्ट कौल दिला आहे. देशहित, राष्टÑवाद महत्त्वाचा आहेच, पण शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज अशा मुलभूत सुविधादेखील जनसामान्यांना जगण्यासाठी हव्या आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपने देशप्रेमाचा मुद्दा तापविला, परंतु दिल्लीतील जनतेने विकासाला मते दिली. महाराष्टÑापाठोपाठ दिल्लीतही भाजपला नाकारले गेले आहे. हे मान्य करुन भाजप स्वत:च्या रणनीतीमध्ये काही बदल करते काय हे बघायला हवे.आपल्या खान्देशचा विचार केला तर भाजपच्या चारही खासदारांनी वर्षभरात काही भरीव कामगिरी केली आहे, असे चित्र नाही. रेल्वे अर्थसंकल्पात तर केवळ निराशा पदरी पडली. राष्टÑीय महामार्गाच्या विषयावर खासदारांचे मौन कायम आहे. केंद्र सरकार आणि खासदार यांच्या कामगिरीवर बोट ठेवत राज्य सरकार आणि त्यातील तिन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते भाजपला कोंडीत पकडत असल्याचे गेल्या काही दिवसात दिसून येत आहे. राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जळगावचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, नामदेवराव चौधरी, योगेश देसले किंवा शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी भाजप लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले आहे. पाच वर्षांतील सत्तेची उब चाखलेला भाजप अजून पराभवाच्या धक्कयातून सावरलेला नाही. माझी आमदारकी संपविण्याची सुपारी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी घेतल्याचे जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे यांचे विधान हे त्या पराभूत मानसिकतेचे निदर्शक आहे. ‘आम्ही दु:खात आहोत’ असे माजी मंत्र्याने खाजगीत केलेले विधान बोलके आहे.अर्थात राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांच्या मंत्री, लोकप्रतिनिधींपुढेही आता विकास करुन दाखविण्याचे आव्हान आहे. दिल्लीच्या निकालातून त्यांनी बोध घेतला नाही, तर भाजपसारखी अवस्था होऊ शकते, हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. सेनेला तर अधिक काळजी घ्यावी लागेल.केंद्र सरकारमध्ये भाजप सत्तेत आहे, तर राज्यात शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस सत्तेत आहे. सत्तेची विभागणी झालेली असताना चारही पक्षांचे लोकप्रतिनिधी आश्वासनांवर काम करताना दिसत नाही. रस्ते, रुग्णालये, अवैध वाहतूक, रोजगार, एस.टी.च्या समस्या, शिक्षणक्षेत्रापुढील अडचणी, औद्योगिक वसाहतींचा विकास या विषयांचा पाठपुरावा होताना दिसत नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव