शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. रवींद्र शोभणे यांना विद्रोही साहित्य संमेलनात रोखले; आधी रोखले नंतर भरवला गोड घास

By विलास बारी | Updated: February 4, 2024 17:54 IST

अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे.

अमळनेर (जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यास गेले असता, पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणत आहात म्हणत तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. त्यामुळे थोडावेळ गोंधळ उडाला, हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात घडला. हा प्रकार घडल्यानंतर निमंत्रक रणजित शिंदे यांनी प्रा. शोभणे यांना गोड घास भरवत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शोभणे हे दुपारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात पोहोचले. तिथे त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांची गळाभेट घेतली. यावेळी राज्य विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना चला, चला असे म्हणत रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निमत्रंक रणजित शिंदे यांनी शोभणे यांना चुरमा भरवून तोंड गोड करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना शोभणे म्हणाले की, जसा गोड पदार्थ खाऊ घातला तशी मनेही गोड करा. मात्र तरीही हा अनुभव वाईट होता. चला, चला म्हणजे काय आम्ही अस्पृश्य आहोत का? असा सवालही त्यांनी केला. यानंतर प्रा. शोभणे तिथून निघून गेले. अ.भा.म.सा. मंडळाचे सदस्य मिलिंद जोशी व नरेंद्र निकम हेही त्यांच्यासमवेत होते.

मुलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची उराउरी भेट घेतली. मात्र त्यापूर्वीच चला-चला असे काहीजण म्हणाले. सर्वच आमचे आहेत म्हणून आलो होतो. पण हा प्रकार वाईट आहे. आम्ही स्वागतशील आहोत, त्यांनीही असावे. मुलाटे कार्यक्रमात व्यस्त असल्याने जाताना भेटायला आले नाही. ते का आले नाही तो त्यांचा प्रश्न आहे. माझे लेखनही ग्रामीण, प्रादेशिक आणि विद्रोही स्वरूपाचेच आहे. मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. मतभेदाचे संवादात रूपांतर व्हावे आणि या संवादातून सुसंवाद घडावा. - डॉ. रवींद्र शोभणे, अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन.

आपण शोभणे यांचे स्वागत केले. मी संमेलनाचा अध्यक्ष असून माझ्यासाठी कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तो सोडून मी त्यांना निरोप देण्यासाठी जाऊ शकत नाही. कोणी जर म्हणत असेल घरापर्यंत सोडा तर ते कसे काय शक्य आहे. -डॉ. वासुदेव मुलाटे, अध्यक्ष, विद्रोही साहित्य संमेलन.

पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणला. तुमच्या व्यवस्थेने आम्हाला नाकारलं आहे. महामानव महात्मा फुलेंनी सांगितले आहे, की आमचा विचार आम्ही करू. त्यानंतर आमचे लोक एकीचे बीज शोधून काढतील. त्या फुलेंच्या पत्रावर आधारित हे साहित्य संमेलन आहे. तुुमचं कशासाठी स्वागत करायचं, कोण तुम्ही. ही गोष्ट आम्ही शांततेने विचारत आहोत. - कॉ. किशोर ढमाले, राज्य संघटक, विद्रोही साहित्य चळवळ.

टॅग्स :Jalgaonजळगाव