शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

प्रा. रवींद्र शोभणे यांना विद्रोही साहित्य संमेलनात रोखले; आधी रोखले नंतर भरवला गोड घास

By विलास बारी | Updated: February 4, 2024 17:54 IST

अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे.

अमळनेर (जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यास गेले असता, पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणत आहात म्हणत तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. त्यामुळे थोडावेळ गोंधळ उडाला, हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात घडला. हा प्रकार घडल्यानंतर निमंत्रक रणजित शिंदे यांनी प्रा. शोभणे यांना गोड घास भरवत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शोभणे हे दुपारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात पोहोचले. तिथे त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांची गळाभेट घेतली. यावेळी राज्य विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना चला, चला असे म्हणत रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निमत्रंक रणजित शिंदे यांनी शोभणे यांना चुरमा भरवून तोंड गोड करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना शोभणे म्हणाले की, जसा गोड पदार्थ खाऊ घातला तशी मनेही गोड करा. मात्र तरीही हा अनुभव वाईट होता. चला, चला म्हणजे काय आम्ही अस्पृश्य आहोत का? असा सवालही त्यांनी केला. यानंतर प्रा. शोभणे तिथून निघून गेले. अ.भा.म.सा. मंडळाचे सदस्य मिलिंद जोशी व नरेंद्र निकम हेही त्यांच्यासमवेत होते.

मुलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची उराउरी भेट घेतली. मात्र त्यापूर्वीच चला-चला असे काहीजण म्हणाले. सर्वच आमचे आहेत म्हणून आलो होतो. पण हा प्रकार वाईट आहे. आम्ही स्वागतशील आहोत, त्यांनीही असावे. मुलाटे कार्यक्रमात व्यस्त असल्याने जाताना भेटायला आले नाही. ते का आले नाही तो त्यांचा प्रश्न आहे. माझे लेखनही ग्रामीण, प्रादेशिक आणि विद्रोही स्वरूपाचेच आहे. मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. मतभेदाचे संवादात रूपांतर व्हावे आणि या संवादातून सुसंवाद घडावा. - डॉ. रवींद्र शोभणे, अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन.

आपण शोभणे यांचे स्वागत केले. मी संमेलनाचा अध्यक्ष असून माझ्यासाठी कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तो सोडून मी त्यांना निरोप देण्यासाठी जाऊ शकत नाही. कोणी जर म्हणत असेल घरापर्यंत सोडा तर ते कसे काय शक्य आहे. -डॉ. वासुदेव मुलाटे, अध्यक्ष, विद्रोही साहित्य संमेलन.

पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणला. तुमच्या व्यवस्थेने आम्हाला नाकारलं आहे. महामानव महात्मा फुलेंनी सांगितले आहे, की आमचा विचार आम्ही करू. त्यानंतर आमचे लोक एकीचे बीज शोधून काढतील. त्या फुलेंच्या पत्रावर आधारित हे साहित्य संमेलन आहे. तुुमचं कशासाठी स्वागत करायचं, कोण तुम्ही. ही गोष्ट आम्ही शांततेने विचारत आहोत. - कॉ. किशोर ढमाले, राज्य संघटक, विद्रोही साहित्य चळवळ.

टॅग्स :Jalgaonजळगाव