शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

प्रा. रवींद्र शोभणे यांना विद्रोही साहित्य संमेलनात रोखले; आधी रोखले नंतर भरवला गोड घास

By विलास बारी | Updated: February 4, 2024 17:54 IST

अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे.

अमळनेर (जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यास गेले असता, पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणत आहात म्हणत तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. त्यामुळे थोडावेळ गोंधळ उडाला, हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात घडला. हा प्रकार घडल्यानंतर निमंत्रक रणजित शिंदे यांनी प्रा. शोभणे यांना गोड घास भरवत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शोभणे हे दुपारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात पोहोचले. तिथे त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांची गळाभेट घेतली. यावेळी राज्य विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना चला, चला असे म्हणत रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निमत्रंक रणजित शिंदे यांनी शोभणे यांना चुरमा भरवून तोंड गोड करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना शोभणे म्हणाले की, जसा गोड पदार्थ खाऊ घातला तशी मनेही गोड करा. मात्र तरीही हा अनुभव वाईट होता. चला, चला म्हणजे काय आम्ही अस्पृश्य आहोत का? असा सवालही त्यांनी केला. यानंतर प्रा. शोभणे तिथून निघून गेले. अ.भा.म.सा. मंडळाचे सदस्य मिलिंद जोशी व नरेंद्र निकम हेही त्यांच्यासमवेत होते.

मुलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची उराउरी भेट घेतली. मात्र त्यापूर्वीच चला-चला असे काहीजण म्हणाले. सर्वच आमचे आहेत म्हणून आलो होतो. पण हा प्रकार वाईट आहे. आम्ही स्वागतशील आहोत, त्यांनीही असावे. मुलाटे कार्यक्रमात व्यस्त असल्याने जाताना भेटायला आले नाही. ते का आले नाही तो त्यांचा प्रश्न आहे. माझे लेखनही ग्रामीण, प्रादेशिक आणि विद्रोही स्वरूपाचेच आहे. मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. मतभेदाचे संवादात रूपांतर व्हावे आणि या संवादातून सुसंवाद घडावा. - डॉ. रवींद्र शोभणे, अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन.

आपण शोभणे यांचे स्वागत केले. मी संमेलनाचा अध्यक्ष असून माझ्यासाठी कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तो सोडून मी त्यांना निरोप देण्यासाठी जाऊ शकत नाही. कोणी जर म्हणत असेल घरापर्यंत सोडा तर ते कसे काय शक्य आहे. -डॉ. वासुदेव मुलाटे, अध्यक्ष, विद्रोही साहित्य संमेलन.

पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणला. तुमच्या व्यवस्थेने आम्हाला नाकारलं आहे. महामानव महात्मा फुलेंनी सांगितले आहे, की आमचा विचार आम्ही करू. त्यानंतर आमचे लोक एकीचे बीज शोधून काढतील. त्या फुलेंच्या पत्रावर आधारित हे साहित्य संमेलन आहे. तुुमचं कशासाठी स्वागत करायचं, कोण तुम्ही. ही गोष्ट आम्ही शांततेने विचारत आहोत. - कॉ. किशोर ढमाले, राज्य संघटक, विद्रोही साहित्य चळवळ.

टॅग्स :Jalgaonजळगाव