शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्हाधिकारी मंजुळेंविरोधात उद्यापासून कार्यवाहीची प्रक्रिया; राज्य शासनाचे आदेश प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2023 17:16 IST

नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून सेवेत असताना बालाजी मंजुळे यांनी कायद्यांसह प्रशासकीय संहिता तुडवत राज्य शासनाचे पावणे अकरा कोटींचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कुंदन पाटील

जळगाव: नंदुरबारचे तत्कालिन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी कायद्याला तुडवत राज्य शासनाने १० कोटी ८२ लाख ६४ हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी शासन आदेशानुसार सोमवारपासून कार्यवाहीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘लोकमत’ला दिली. नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून सेवेत असताना बालाजी मंजुळे यांनी कायद्यांसह प्रशासकीय संहिता तुडवत राज्य शासनाचे पावणे अकरा कोटींचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार महसुल व वन विभागाने मंजुळे यांच्याविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी विभागीय आयुक्त गणे यांना सक्षम अधिकारी म्हणून आदेश दिले आहेत.

 यासंदर्भात गमे यांच्याशी संपर्क साधला असता, राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. सुट्या असल्याने सोमवारपासून फौजदारी कार्यवाहीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. अहवालानुसार काही प्रकरणांची पडताळणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आंध्रप्रदेशचे ‘केडर’ प्राप्त मंजुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आलेल्या मंजुळे यांनी नंदुरबार जिल्हाधिकारीसह आदिवासी संशोधन विभागातही सेवा बजावली आहे. मात्र त्यांच्या प्रतिनियुक्तीला राज्य शासनाने मुदतवाढ न दिल्याने त्यांना पुन्हा आंध्र प्रदेशात रुजू व्हावे लागले होते.

पहिलीच कारवाईभारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई व्हावी, ही बाब खान्देशात पहिल्यांदाच होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच राज्यातही अशा स्वरुपाची कारवाईदेखिल ऐकिवात नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव