शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्याची समस्या पिकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:10 IST

भडगाव तालुक्यातील महिंदळेसह परिसरात वीज पुरवठा समस्येने उग्र स्वरुप धारण केले असून विहिरींना पाणी असतांनाही विजेअभावी ते पिकांंना देता येत नाही. त्यामुळे कापूस पिकावर संकट घोंघावू लागले आहे.

ठळक मुद्देविजेच्या लपंडावामुळे उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. विजेचा लपंडाव व कमी दाबाचा पुरवठा यात पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत.

महिंदळे ता. भडगाव : महिंदळेसह परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन ते तीन दमदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील विहीरींना ब-यापैकी पाणी आहे. त्यामुळे परिसरात आजपर्यंत ज्वारी, बाजरी व कडधान्ये वगळता कपासी पिक जोमात आहे . परंतु विजेच्या लपंडावामुळे उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.चाळीसगाव तालुक्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती जाणवत असतांंना महिंदळे परिसरातील विहीरींना आजही ब-यापैकी पाणी आहे . परंतु विजेचा लपंडाव पाहता हा परिसरही संकटात येऊ शकतो, असे बोलले जात आहे.येथे सिंचनासाठी आठ तास वीज पुरवठा दिल्याचे सांगितले जाते, पण आठ तासात एक तासही वीज सुरळीत चालत नाही. परिणामी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. ऐन बहरात आलेली पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर मरणासन्न अवस्थेत उन्हांच्या झळा सहन करत आहेत.कमी दाबाचा वीज पुरवठापरिसरात भाद्रपदाचे कडक ऊन पडत आहे. उन्हाच्या तिव्रतेने पिकांची लाही लाही होत आहे. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करतांना दिसत आहेत. रात्री जिवाची पर्वा न करता पिकांना पाणी देण्यासाठी जातात. परंतु विजेचा लपंडाव व कमी दाबाचा पुरवठा यात पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक शेतक-यांचे पंप आजपर्यंत कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे जळाले आहेत. आणि निकामी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने डिझेल इंजिनचा सहारा घेत आहेत, परंतु डिझेलचेही भाव वाढल्यामुळे हे परवडणारे नाही. त्यामुळे पिके जगवायची कशी असा पेच शेतकºयांना पडला आहे.‘लाल्या’ रोग काढतोय डोके वरपरिसरात कापूस पिक जोमात असतांना भाद्रपदाच्या उन्हांची तीव्रता वाढत असल्याने व पाणी कमी असल्यामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण होताना दिसत आहे. जणू काही ‘दुष्काळात तेरावा महिना‘ अशी स्थिती अनुवभास येत आहे. अतोनात पैसा पिकांसाठी खर्च झाला आहे. त्यात वीज वितरणाचा कारभार शेतक-यांच्या मुळावर उठले आहे. दिवसभर विजेचा लपंडाव व कमी दाबाचा विज पुरवठ्यामुळे पिके कशी वाचतील या विवंचनेत शेतकरी आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे तर दुसरीकडे पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील वीज समस्या त्वरीत सोडवावी व पिकांना जीवदान द्यावे, वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

टॅग्स :Waterपाणी