शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

वीज पुरवठ्याची समस्या पिकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:10 IST

भडगाव तालुक्यातील महिंदळेसह परिसरात वीज पुरवठा समस्येने उग्र स्वरुप धारण केले असून विहिरींना पाणी असतांनाही विजेअभावी ते पिकांंना देता येत नाही. त्यामुळे कापूस पिकावर संकट घोंघावू लागले आहे.

ठळक मुद्देविजेच्या लपंडावामुळे उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. विजेचा लपंडाव व कमी दाबाचा पुरवठा यात पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत.

महिंदळे ता. भडगाव : महिंदळेसह परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन ते तीन दमदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील विहीरींना ब-यापैकी पाणी आहे. त्यामुळे परिसरात आजपर्यंत ज्वारी, बाजरी व कडधान्ये वगळता कपासी पिक जोमात आहे . परंतु विजेच्या लपंडावामुळे उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.चाळीसगाव तालुक्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती जाणवत असतांंना महिंदळे परिसरातील विहीरींना आजही ब-यापैकी पाणी आहे . परंतु विजेचा लपंडाव पाहता हा परिसरही संकटात येऊ शकतो, असे बोलले जात आहे.येथे सिंचनासाठी आठ तास वीज पुरवठा दिल्याचे सांगितले जाते, पण आठ तासात एक तासही वीज सुरळीत चालत नाही. परिणामी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. ऐन बहरात आलेली पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर मरणासन्न अवस्थेत उन्हांच्या झळा सहन करत आहेत.कमी दाबाचा वीज पुरवठापरिसरात भाद्रपदाचे कडक ऊन पडत आहे. उन्हाच्या तिव्रतेने पिकांची लाही लाही होत आहे. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करतांना दिसत आहेत. रात्री जिवाची पर्वा न करता पिकांना पाणी देण्यासाठी जातात. परंतु विजेचा लपंडाव व कमी दाबाचा पुरवठा यात पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक शेतक-यांचे पंप आजपर्यंत कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे जळाले आहेत. आणि निकामी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने डिझेल इंजिनचा सहारा घेत आहेत, परंतु डिझेलचेही भाव वाढल्यामुळे हे परवडणारे नाही. त्यामुळे पिके जगवायची कशी असा पेच शेतकºयांना पडला आहे.‘लाल्या’ रोग काढतोय डोके वरपरिसरात कापूस पिक जोमात असतांना भाद्रपदाच्या उन्हांची तीव्रता वाढत असल्याने व पाणी कमी असल्यामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण होताना दिसत आहे. जणू काही ‘दुष्काळात तेरावा महिना‘ अशी स्थिती अनुवभास येत आहे. अतोनात पैसा पिकांसाठी खर्च झाला आहे. त्यात वीज वितरणाचा कारभार शेतक-यांच्या मुळावर उठले आहे. दिवसभर विजेचा लपंडाव व कमी दाबाचा विज पुरवठ्यामुळे पिके कशी वाचतील या विवंचनेत शेतकरी आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे तर दुसरीकडे पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील वीज समस्या त्वरीत सोडवावी व पिकांना जीवदान द्यावे, वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

टॅग्स :Waterपाणी