शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

शेतकऱ्यांची समस्या कायमच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 19:34 IST

वार्तापत्र-महसूल

सुशील देवकरकर्जमाफी होऊनही ‘सातबारा कोरा’ झालेला नसल्याने कर्जमाफीस पात्र शेतकरीही बँकेचे थकबाकीदार दिसत आहेत. आणि थकबाकीदाराला कर्ज न देण्याचे बँकांचे धोरण असल्याने यंदाच्या खरीप हंगामात या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना नवीन पीककर्जापासून वंचीत रहावे लागण्याची भिती व्यक्त होत आहे. कारण अनेक महिन्यांपासून कर्जमाफीचा सुरू असलेला घोळ कायम असून तो लवकर मिटण्याची चिन्ह नाहीत. त्यातच कर्जमाफी जाहीर झाल्याच्या तारखेपासून आजपर्यंतचे कर्जमाफी झालेल्या रक्कमेवरील व्याज शेतकºयांकडून न आकारण्याच्या शासनाच्या सूचनेमुळेही घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सातबारा कोरा करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीच्या बियाणाचा, बोंडअळीचा विषय गंभीर आहे. यापूर्वी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. पालकमंत्र्यांनी तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बियाणांच्या विषयावर तर बैेठकीतूनच थेट कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. दुसºयाच दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी देऊनही त्याची चर्चाही बैठकीत झाली नाही. त्यानंतर शनिवार, ५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. त्यात पीककर्जाबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांनी पीककर्जाबाबतच्या नियोजनात पुढाकार घेण्याच्या सूचना करत जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर टाकली आहे. मात्र हा विषय धोरणात्मक असल्याने शासनाच्या ठोस आदेशांशिवाय जिल्हा बँका त्यावर अंमलबजावणी करण्याची शक्यता कमीच आहे. राष्टÑीयकृत बँकातर रिझर्व्ह बँकेच्या आदेशाशिवाय कोणताही आदेश पाळत नसल्याने शासनाचे आदेश केराच्या टोपलीत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात राष्टÑीयकृत बँकांकडून पिककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी असूनही त्याकडे दूर्लक्ष होत आहे. याबाबत ९ किंवा १० मे रोजी जिल्हास्तरावर बैठक घेण्याचे जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे. मात्र या बैठकीचा कितपत उपयोग होईल? याबाबत साशंकताचा आहे. जिल्हा बँकेने तर थकबाकीदार सोडाच ज्या शेतकºयांनी पूर्ण परतफेड केली आहे. त्या शेतकºयांनाही केवळ ५० टक्केच पीककर्ज देण्याचे धोरण निश्चित केले आहे. याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने ठिय्या देत निधी उपलब्ध होईल, तसतसे पूर्ण कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन घेतले असले तरी तो निव्वळ फार्स ठरणार असल्याचे दिसते. या सगळ्या घोळात शेतकºयांच्या मूळ समस्या मात्र कायमच आहेत. कपाशीच्या देशी वाणांचा प्रश्नही मिटलेला नाही. शासन, प्रशासन कुणालाच गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.