शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

शेतकऱ्यांची समस्या कायमच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 19:34 IST

वार्तापत्र-महसूल

सुशील देवकरकर्जमाफी होऊनही ‘सातबारा कोरा’ झालेला नसल्याने कर्जमाफीस पात्र शेतकरीही बँकेचे थकबाकीदार दिसत आहेत. आणि थकबाकीदाराला कर्ज न देण्याचे बँकांचे धोरण असल्याने यंदाच्या खरीप हंगामात या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना नवीन पीककर्जापासून वंचीत रहावे लागण्याची भिती व्यक्त होत आहे. कारण अनेक महिन्यांपासून कर्जमाफीचा सुरू असलेला घोळ कायम असून तो लवकर मिटण्याची चिन्ह नाहीत. त्यातच कर्जमाफी जाहीर झाल्याच्या तारखेपासून आजपर्यंतचे कर्जमाफी झालेल्या रक्कमेवरील व्याज शेतकºयांकडून न आकारण्याच्या शासनाच्या सूचनेमुळेही घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सातबारा कोरा करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीच्या बियाणाचा, बोंडअळीचा विषय गंभीर आहे. यापूर्वी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. पालकमंत्र्यांनी तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बियाणांच्या विषयावर तर बैेठकीतूनच थेट कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. दुसºयाच दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी देऊनही त्याची चर्चाही बैठकीत झाली नाही. त्यानंतर शनिवार, ५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. त्यात पीककर्जाबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांनी पीककर्जाबाबतच्या नियोजनात पुढाकार घेण्याच्या सूचना करत जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर टाकली आहे. मात्र हा विषय धोरणात्मक असल्याने शासनाच्या ठोस आदेशांशिवाय जिल्हा बँका त्यावर अंमलबजावणी करण्याची शक्यता कमीच आहे. राष्टÑीयकृत बँकातर रिझर्व्ह बँकेच्या आदेशाशिवाय कोणताही आदेश पाळत नसल्याने शासनाचे आदेश केराच्या टोपलीत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात राष्टÑीयकृत बँकांकडून पिककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी असूनही त्याकडे दूर्लक्ष होत आहे. याबाबत ९ किंवा १० मे रोजी जिल्हास्तरावर बैठक घेण्याचे जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे. मात्र या बैठकीचा कितपत उपयोग होईल? याबाबत साशंकताचा आहे. जिल्हा बँकेने तर थकबाकीदार सोडाच ज्या शेतकºयांनी पूर्ण परतफेड केली आहे. त्या शेतकºयांनाही केवळ ५० टक्केच पीककर्ज देण्याचे धोरण निश्चित केले आहे. याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने ठिय्या देत निधी उपलब्ध होईल, तसतसे पूर्ण कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन घेतले असले तरी तो निव्वळ फार्स ठरणार असल्याचे दिसते. या सगळ्या घोळात शेतकºयांच्या मूळ समस्या मात्र कायमच आहेत. कपाशीच्या देशी वाणांचा प्रश्नही मिटलेला नाही. शासन, प्रशासन कुणालाच गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.