शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

डाळींच्या भाववाढीस ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:05 IST

मागणी कमी झाल्याने आठवडाभरात ३०० ते ४०० रुपयांनी घसरण

ठळक मुद्देग्राहकांना दिलासामागणी झाली कमी

विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून सतत भाववाढ होत असलेल्या डाळींच्या भावात या आठवड्यात ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत आवक कमी असली तरी मागणी कमी झाल्याने डाळींच्या भाववाढीस ‘ब्रेक’ लागला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटसह दर्जावरही परिणाम झाला आहे. त्यात डाळींसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या उडीद, मुगाला ऐन पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने त्यांचे उत्पादन कमी होऊन कडधान्याची आवक घटली व गेल्या तीन आठवड्यांपासून डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत होती.मागणी झाली कमीबाजारात एक तर आवक कमी व मागणी जास्त असल्याने सर्वच डाळींचे भाव वाढत गेले. तीन आठवड्यात भाव वाढ होत जाऊन उडीदाची डाळ ६९०० रुपये प्रती क्विंटल पोहचली होती. तसेच हरभरा डाळ ६६०० रुपये प्रती क्विंटल, तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र सलग भाववाढीमुळे या आठवड्यात मागणी तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे उडीदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६६०० रुपये प्रती असलेल्या हरभरा डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. तर तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६००० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहेत. मुगाची डाळ मात्र ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.आवक नसताना भावात घसरणतसे पाहता नवीन उडीद-मूग आल्यानंतर या दिवसात नवीन डाळींचीही आवक होते. त्यामुळे जळगावातील दालमिलमधून मोठ्या प्रमाणात डाळी निर्यातही होतात. मात्र यंदा आवकच कमी असल्याने डाळींचे उत्पादनही २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. असे चित्र असताना भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ््यासोबतच या दिवसातही डाळींची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र भाववाढीमुळे या खरेदीच्या हंगामातच यंदा मागणी घटल्याचे चित्र आहे.चार आठवड्यापूर्वीचे भावडाळींमध्ये मोठी भाववाढ होण्यापूर्वी २२ आॅक्टोबर रोजी हरभरा डाळ ५५०० रुपये प्रती क्लिंटल होती. तसेच तूर डाळ ६००० रुपये प्रती क्लिंटल, उडीद डाळ ५२०० रुपये प्रती क्लिंटल व मुगाची डाळ ७५०० रुपये प्रती क्लिंटल होती. त्यात सलग तीन आठवडे भाववाढ होत गेली. चौथ्या आठवड्यात भाववाढ थांबली असली तरी सध्याचे भाव चार आठवड्यांपूर्वीच्या भावापेक्षा जास्तच आहे.गेल्या तीन आठवड्यांपासून डाळींच्या भावात मोठी भाववाढ झाली होती. मात्र याच भाववाढीमुळे ग्राहकांनी खरेदी थांबविल्याने डाळींची मागणी कमी झाली व त्यांचे भाव घसरले आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव. 

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव