शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डाळीच्या भावात ३०० ते ४०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:50 IST

गेल्या महिन्याच्या तुलनेत बाजारातील स्थिती

जळगाव : सरकारकडे असलेला डाळीचा चार लाख टन साठा विक्रीला काढण्याची घोषणा केंद्र सरकारने करताच डाळीचा बाजार अस्थिर झाला असून दररोज २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने डाळीच्या भावात चढ-उतार होत आहे. याच अस्थिरतेमुळे पाऊस नसला तरी डाळींचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत.गेल्या वर्षी कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला होता. मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटली होती व डाळींमध्येही तेजी आली होती. यंदाही पावसाळाच्या सुरुवातीलाच पाऊस लांबल्याने कडधान्याची पेरणी लांबली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली व शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यांनतर पावसाची ओढ अद्यापही कायम असल्याने यंदाही पिकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे डाळी आतापासूनच कडाडणार असे वाटत होते. मात्र यंदा उलटेच चित्र बाजारपेठेत आहे.सरकारच्या घोषणेने बाजार डळमळलागेल्या आठवड्यात केंद्र सरकारने त्यांच्याकडे असलेला डाळीचा चार लाख टन साठा विक्रीला काढण्याची घोषणा केली आहे. हा माल बाजारात आल्यास डाळींचे भाव आणखी कमी होणार आहे. त्यामुळे व्यापारी बांधवदेखील होलसेल माल खरेदी करताना हात आखडता घेत आहे. एकीकडे डाळीचा साठा बाहेर येणार व दुसरीकडे पावसाचा परिणाम यामुळे डाळींचे भाव कमी-जास्त होत आहेत. डाळींचे भाव दररोज २०० ते ३०० रुपयांनी कमी-जास्त होत आहेत. त्यात २४ रोजी तूर डाळीचे भाव ८१०० ते ८४०० रुपये प्रती क्विंटल होते. अशाच प्रकारे हरभरा डाळ ५५०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटल, उडीद डाळ ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल व मूग डाळीचे भाव ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर होते. दोन दिवसांपूर्वी हे भाव २०० रुपयांनी जास्त होते. दररोज भावात असाच चढ-उताराचा अनुभव येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.गेल्या महिन्याच्या तुलनेत भावात घसरणपाऊस नसताना गेल्या महिन्याच्या तुलनेत डाळीचे भाव घसरले आहेत. यामध्ये गेल्या महिन्यात तूर डाळ ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल होते ते आता ८१०० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेले हरभरा डाळीचे भाव ५५०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. तर उडीद डाळ ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवरून ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आणि मूग डाळ ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवरून ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे.शेतकºयांवर दुहेरी संकटजून महिन्यात उशिरा आलेल्या पावसामुळे लागवड लांबली. कशीबशी लागवड झाली व आहे त्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाऊस झाला व पेरण्या वाढल्या. मात्र मध्येच पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला. त्यानंतर शनिवारी रात्री पाऊस आल्याने पुन्हा आशा पल्लवित झाल्या. मात्र जोरदार पावसाने शेतांमधील पिके वाहून गेल्याने दुहेरी संकट शेतकºयांवर ओढावले आहे. त्यामुळे कोठे पावसाअभावी पिके जळत आहे तर कोठे अति पावसाने ते वाहून जात आहे. त्यामुळे सरकारने डाळीचा साठा बाहेर विक्रीला काढला तरी भाव कमी होतील मात्र कडधान्य उत्पादकांना ना भाव मिळणार व पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनही हाती येणार नसल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.केंद्र सरकारने त्यांच्याकडे असलेला डाळीचा साठा विक्रीला काढण्याची घोषणा केल्याने बाजारात अस्थिरता आली आहे. दररोज भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने कमी-जास्त होत आहेत. त्यात पावसाने चिंता वाढविली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव