शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हरभरा डाळीेचे भाव ८०० रुपयांनी गडगडले; ग्राहकांना दिलासा, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:05 IST

प्रचंड आवक

ठळक मुद्देमागणी वाढली तरी भाववाढ ऐवजी घसरणहरभरा खरेदी बंदचाही परिणाम नाही

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - हरभऱ्याचे उत्पादन वाढण्यासह दोन वर्षांपासून माल शिल्लक असल्याने बाजारपेठेत हरभरा डाळीचीही आवक वाढून डाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकºयांच्या मालाला भाव मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. यंदा मागणी वाढली तरी डाळीमध्ये भाववाढ होण्याऐवजी घसरण झाल्याचे चित्र प्रथमच दिसून येत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. दरम्यान, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा खरेदी बंद असली तरी जिल्ह्यातील इतर भागातून माल येत असल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.रब्बी हंगाम संपून बाजारपेठेत हरभरा येत आहे. यंदा हरभºयाची मोठ्या प्रमाणात लागवड होऊन उत्पादन साधारण २५ ते ३० टक्क्याने वाढले आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत हरभºयाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात भरात भर म्हणजे दोन वर्षापासूनचा माल शेतकरी, व्यापारी, दालमिल येथे शिल्लक असल्याने सर्वत्र हरभºयाचा बफर स्टॉक असल्याचेच चित्र आहे.डाळींचीही आवक वाढलीहरभºयाचे उत्पादन चांगले असल्याने दालमिलमध्ये पुरेसा कच्चा माल उपलब्ध होत आहे. डाळ उत्पादन अग्रेसर असलेल्या जळगावातील दालमिलमध्ये जिल्ह्यातील व्यापाºयांकडून मोठ्या प्रमाणात माल येत आहे. यामुळे डाळींचे उत्पादन वाढले आहे. या सोबतच विदर्भातील मलकापूर, अकोला, अमरावती तर मध्यप्रदेशातील इंदूर, खंडवा येथून तयार डाळही जळगाव बाजारपेठेत येत आहे.भाव गडगडलेआवक वाढल्याने डाळीचे भाव ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी ५४०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असलेली हरभरा डाळीचे भाव आज ४७०० ते ५२०० रुपयांवर आले आहेत.मागणीही वाढलीसध्या धान्य खरेदीचा हंगाम सुरू असून या सोबत डाळीचीही खरेदी केली जात आहे. यामध्ये हरभरा डाळीला चांगलीच मागणी आहे. असे असले तरी भाव वाढण्याऐवजी ते कमी झाल्याचे चित्र यंदा बाजारपेठेत आहे.व्यापाºयांची द्विधा स्थितीहरभºयाच्या बाबतीत शेतकºयांच्या पदरी निराशा असून त्यांच्या मालाला भाव नाही. यासोबतच व्यापाºयांचीही द्विधा स्थिती निर्माण झाली आहे. हमी भावात माल घेतला तर त्या तुलनेत बाजारपेठेत भाव मिळत नाही तर दुसरीकडे कमी भावाने माल खरेदी केला तर कारवाईची भीती आहे, त्यामुळे व्यापारीदेखील संकाटत सापडले आहेत.हरभºयाची आवक चांगली असून डाळ उत्पादनही यंदा चांगले आहे. यामुळे डाळीचे भाव कमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून हरभºयाची आवक होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.हरभºयाचे उत्पादन वाढल्याने यंदा आवक चांगली असण्यासह बाजारपेठेत तयार डाळीचीही आवक वाढली आहे. यामुळे हरभरा डाळीच्या भावात घसरण झाली आहे. डाळीला मागणीही चांगली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन.यंदा हरभरा डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले असून इतके कमी भाव अनेक वर्षांत पाहिलेले नाही.- अनिक कांकरिया, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव