शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

हरभरा डाळीेचे भाव ८०० रुपयांनी गडगडले; ग्राहकांना दिलासा, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:05 IST

प्रचंड आवक

ठळक मुद्देमागणी वाढली तरी भाववाढ ऐवजी घसरणहरभरा खरेदी बंदचाही परिणाम नाही

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - हरभऱ्याचे उत्पादन वाढण्यासह दोन वर्षांपासून माल शिल्लक असल्याने बाजारपेठेत हरभरा डाळीचीही आवक वाढून डाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकºयांच्या मालाला भाव मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. यंदा मागणी वाढली तरी डाळीमध्ये भाववाढ होण्याऐवजी घसरण झाल्याचे चित्र प्रथमच दिसून येत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. दरम्यान, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा खरेदी बंद असली तरी जिल्ह्यातील इतर भागातून माल येत असल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.रब्बी हंगाम संपून बाजारपेठेत हरभरा येत आहे. यंदा हरभºयाची मोठ्या प्रमाणात लागवड होऊन उत्पादन साधारण २५ ते ३० टक्क्याने वाढले आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत हरभºयाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात भरात भर म्हणजे दोन वर्षापासूनचा माल शेतकरी, व्यापारी, दालमिल येथे शिल्लक असल्याने सर्वत्र हरभºयाचा बफर स्टॉक असल्याचेच चित्र आहे.डाळींचीही आवक वाढलीहरभºयाचे उत्पादन चांगले असल्याने दालमिलमध्ये पुरेसा कच्चा माल उपलब्ध होत आहे. डाळ उत्पादन अग्रेसर असलेल्या जळगावातील दालमिलमध्ये जिल्ह्यातील व्यापाºयांकडून मोठ्या प्रमाणात माल येत आहे. यामुळे डाळींचे उत्पादन वाढले आहे. या सोबतच विदर्भातील मलकापूर, अकोला, अमरावती तर मध्यप्रदेशातील इंदूर, खंडवा येथून तयार डाळही जळगाव बाजारपेठेत येत आहे.भाव गडगडलेआवक वाढल्याने डाळीचे भाव ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी ५४०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असलेली हरभरा डाळीचे भाव आज ४७०० ते ५२०० रुपयांवर आले आहेत.मागणीही वाढलीसध्या धान्य खरेदीचा हंगाम सुरू असून या सोबत डाळीचीही खरेदी केली जात आहे. यामध्ये हरभरा डाळीला चांगलीच मागणी आहे. असे असले तरी भाव वाढण्याऐवजी ते कमी झाल्याचे चित्र यंदा बाजारपेठेत आहे.व्यापाºयांची द्विधा स्थितीहरभºयाच्या बाबतीत शेतकºयांच्या पदरी निराशा असून त्यांच्या मालाला भाव नाही. यासोबतच व्यापाºयांचीही द्विधा स्थिती निर्माण झाली आहे. हमी भावात माल घेतला तर त्या तुलनेत बाजारपेठेत भाव मिळत नाही तर दुसरीकडे कमी भावाने माल खरेदी केला तर कारवाईची भीती आहे, त्यामुळे व्यापारीदेखील संकाटत सापडले आहेत.हरभºयाची आवक चांगली असून डाळ उत्पादनही यंदा चांगले आहे. यामुळे डाळीचे भाव कमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून हरभºयाची आवक होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.हरभºयाचे उत्पादन वाढल्याने यंदा आवक चांगली असण्यासह बाजारपेठेत तयार डाळीचीही आवक वाढली आहे. यामुळे हरभरा डाळीच्या भावात घसरण झाली आहे. डाळीला मागणीही चांगली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन.यंदा हरभरा डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले असून इतके कमी भाव अनेक वर्षांत पाहिलेले नाही.- अनिक कांकरिया, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव